शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

आॅटोरिक्षा परवाना नूतनीकरणाला थंडा प्रतिसाद

By admin | Updated: October 24, 2015 03:54 IST

राज्यातील १ लाख ४० हजार आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याच्या परिवहन विभागाच्या योजनेला थंडा प्रतिसाद मिळाल्याने आॅक्टोबर महिनाअखेर संपणाऱ्या

- संदीप प्रधान,  मुंबईराज्यातील १ लाख ४० हजार आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याच्या परिवहन विभागाच्या योजनेला थंडा प्रतिसाद मिळाल्याने आॅक्टोबर महिनाअखेर संपणाऱ्या या योजनेला १६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.परवान्याची मुदत संपल्यावर सहा महिन्यांत नूतनीकरणाकरिता अर्ज न केलेल्या व परिणामी परवाने रद्द झालेल्या आॅटोरिक्षांची संख्या १ लाख ४० हजार ६५ असून, सध्या या रिक्षा रस्त्यावर परवान्याखेरीज फिरत आहेत. त्यामुळे परिवहन विभागाने मुंबई महानगर क्षेत्रामध्ये २० हजार रुपये तर इतर क्षेत्रात १५ हजार रुपये सहमत शुल्क आकारणी करून परवान्यांचे नूतनीकरण करण्याची योजना जाहीर केली. १ ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत योजनेला प्रतिसाद देणे अपेक्षित होते. परिवहन आयुक्त कार्यालयाकडे या योजनेला लाभलेल्या प्रतिसादाबाबत विचारणा केली असता नेमक्या किती आॅटोरिक्षा चालकांनी प्रतिसाद दिला त्याची आकडेवारी ३१ आॅक्टोबरला काही दिवसांचा कालावधी बाकी असल्याने लागलीच उपलब्ध नाही. मात्र योजनेला थंडा प्रतिसाद लाभल्याची कबुली उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळेच योजनेला मुदतवाढ दिल्याचे सूत्रांनी सांगितले.शिवाय परवाने नसले तरीही या आॅटोरिक्षा रस्त्यावर धावत असल्याने जेव्हा कारवाईचा बडगा उगारला जाईल तेव्हा पाहू, असाच बहुतांश रिक्षा चालकांचा पवित्रा आहे.परिवहन विभागाने या योजनेची माहिती रिक्षा चालकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवलेली नाही. परवान्याच्या नूतनीकरणाकरिता आपण सरकारकडे गेलो व अन्य काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाले तर आपल्यावर कारवाई होईल अशी भीती या योजनेची माहिती देण्याकरिता बोलावलेल्या बैठकीत रिक्षा चालकांनी व्यक्त केली होती. सरकारने केवळ योजनेला मुदतवाढ न देता योजनेबाबतचे गैरसमज दूर करण्याची गरज आहे. - नितेश राणे, स्वाभिमानी आॅटोरिक्षा चालक संघटनेचे नेतेसरकारने १९९७नंतर नवे रिक्षा परवाने दिले नाहीत. त्यामुळे परवान्याचे नूतनीकरण न करताच रिक्षा रस्त्यांवर धावत आहेत. सरकारच्या योजनेचा लाभ घेण्याकडे रिक्षा चालकांचा कल नाही. मागील सरकारने याच धर्तीवर दंड आकारून बेकायदा रिक्षा कायदेशीर करण्याची योजना आणली होती. त्या वेळी त्याला विरोध झाला होता. न्यायालयातही सरकारची योजना टिकली नाही. - ए.एल. क्वाड्रोस, मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे नेते