शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

लोकशाहीचा आदर करणारा समाज निर्माण केला पाहिजे

By admin | Updated: April 5, 2017 04:01 IST

लोकशाही टिकवायची असेल तर भारतीय घटना मानणारा आणि तिचा आदर करणारा समाज निर्माण केला पाहिजे

डोंबिवली : लोकशाही टिकवायची असेल तर भारतीय घटना मानणारा आणि तिचा आदर करणारा समाज निर्माण केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.कल्याण-डोंबिवली महापालिका व बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘मागोवा आंबडेकरी चळवळीचा’ हा कार्यक्रम रविवारी झाला. आंबडेकरी चळवळीचा साहित्यासाठीचा आधारस्तंभ पुरस्कार प्रा. शुक्राचार्य गायकवाड, समाजसेवक पुरस्कार दीपश्री माने-बलखंडे, कलावंताचा पुरस्कार ललिता गोडबोले, प्रशासकीय अधिकारी पुरस्कार लहू वाघमारे, महिला कार्यकर्ता पुरस्कार भारती जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे यांना दलित मित्र अण्णासाहेब रोकडे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप रोख पाच हजार रुपये आहे. मात्र, ही रक्कम त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांकरता संस्थेकडे सुपूर्द केली. पत्रकारिता पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये ‘लोकमत’चे प्रतिनिधी आकाश गायकवाड आणि मुरलीधर भवार यांचाही समावेश आहे. आंबडेकरी चळवळीचा पत्रकार आधारस्तंभ पुरस्कार संजय कोचरेकर यांना प्रदान करण्यात आला.म्हात्रे म्हणाले, की लोकशाही निर्माण होण्यासाठी भारतरत्न डॉ. आंबडेकर, महात्मा गांधी, पं, जवाहरलाल नेहरू अशा थोर नेत्यांचे फार मोठे योगदान आहे, याची आजच्या तरुणांनी जाणीव ठेवली पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले. या वेळी महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार नरेंद्र पवार, ज्येष्ठ आंबडेकरी नेते अण्णा रोकडे, गटनेते रमेश जाधव, गायक प्रतापसिंग बोदडे, राजरत्न आंबडेकर, निवृत्त सहसचिव आय. एम. मोरे, उपायुक्त दीपक पाटील आदी उपस्थित होते. पुरस्कार निवडीसाठी प्रा. विठ्ठल शिंदे, आय. एम. मोरे, भरत खरे, राजेश शिर्के, संगीता गायकवाड, शांताराम निकम, भिमराव सावंत आणि संस्थेचे उपाध्यक्ष विलास गायकवाड यांनी काम पाहिले. दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप जगताप, विजय सरकटे यांनी केले. ज्येष्ठ कवी प्रतापसिंग बोदडे यांनी शाहीरातून आंबडेकरी चळवळ मांडली. (प्रतिनिधी)>तरुणांनी चळवळीत सहभागी व्हावेडॉ. बाबासाहेब यांचे पणतू राजरत्न आंबडेकर यांनीही पुढील चळवळीची दिशा आणि आपली अवस्था, यावर विचार मांडले. तरुणांना त्यांनी या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.