शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

स्वत:च्या मताचा आदर करा

By admin | Updated: February 19, 2017 02:59 IST

एखाद्या कंपनीच्या मालकानेच सेवक नियुक्ती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार केला किंवा गहाळ राहिला तर सेवक मुजोर होतील, मालकाचे ऐकणार नाहीत आणि ती कंपनी रसातळाला

- विजय कुंभारएखाद्या कंपनीच्या मालकानेच सेवक नियुक्ती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार केला किंवा गहाळ राहिला तर सेवक मुजोर होतील, मालकाचे ऐकणार नाहीत आणि ती कंपनी रसातळाला जाईल यात शंकाच नाही. तसेच काहीसे घडले आहे आपल्या देशाबद्दल. आपल्या देशातील नागरिकांनी लोकशाही स्वीकारली तेव्हाच देशातील प्रत्येक माणूस त्याचा मालक झाला. लोकशाही म्हणजे ‘लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालविलेले राज्य!’ हे जवळपास देशातील प्रत्येकाला तोंडपाठ असेल. परंतु लोक म्हणजे आपण आणि आपण या देशाचे राजे आहोत असे खरेच किती जणांना वाटते? कदाचित शतकानुशतके राजेशाही किंवा हुकूमशाहीची सवय लागली असल्याने असा ‘देशाचा मालकी हक्क’ अनेकांच्या पचनी पडला नसावा. त्याचमुळे ही ‘मालक’ किंवा ‘राजे’मंडळी प्रत्येक निवडणुकीत सेवकांकडेच आपला मालकीहक्क सोपवून मोकळे होत असावेत. हा देश चालविण्यासाठी संसद, विधान मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. सोयीसाठी आपण त्यांना कंपन्या म्हणू. या कंपन्यांसाठी सेवक निवडीची जी प्रक्रिया राबवली जाते तिला ‘निवडणूक’ म्हणतात. निवडणुकीमध्ये आपल्या वतीने हा देश चालविण्यासाठी आपले ‘सेवकङ्क्तप्रतिनिधी’ निवडण्यासाठी नागरिकांनी मतदान करायचे असते. परंतु बऱ्याचदा ही ‘मालक’ किंवा ‘राजे’मंडळी मतदान करीत नाहीत किंवा कोणत्यातरी संभाव्य सेवकाला आपले मत विकून मोकळे होतात. परिणामी, निवड झाल्यानंतर सेवक मुजोर होतात, मनमानी करतात आणि मालकांचे ऐकेनासे होतात.प्रत्येक निवडणुकीत बहुतांश मालकांनी म्हणजे मतदारांनी आपल्या निष्क्रियतेने किंवा भ्रष्टाचाराने सेवकांना जाब विचारण्याचा हक्क गमावलेला असतो. प्रत्येक मतदाराने नेहमी स्वत:ला आपल्या मताची किंमत समजली आहे का आणि स्वत:तरी आपल्या मताचा आदर करतो का हे पाहिले पाहिजे. मताचा आदर करणे म्हणजे मतदान करणे. परंतु मतदानाच्या दिवशी ते न करता सुटी एन्जॉय करणारे, मत विकणारे आपल्या मताचा अनादर करीत असतात. जे लोक स्वत:च्या मताचा आदर करीत नाहीत त्यांच्या मताचा आदर ‘इतरांनी’ तरी का करावा? त्यामुळेच ‘सेवक’ एकदा निवडून आले की जनतेच्या मताला किंमत देत नाहीत आणि मतदारांचे मालक होतात. आपल्या मताचा आदर करून स्वच्छ मनाने आणि निर्भीडपणे मतदान केले तर आपण निवडून दिलेल्या सेवकाला मालक या नात्याने जाब विचारण्याचा अधिकार आपल्याला राहील. लाचार होऊन लोभापोटी मतदान केले तर आपण गुलामगिरी स्वीकारून स्वत:साठी मालक निवडतोय असा त्याचा अर्थ होईल आणि गुलामांना कोणतेही हक्क नसतात. मतदान न करणारे किंवा मत विकणारी मंडळी आपल्या कृत्याने भ्रष्ट व नालायक सेवकाची निवड होण्यास मदत करीत असतात आणि स्वत:वरच नव्हे, तर प्रामाणिकपणे मतदान करणाऱ्यांवरही जबरदस्तीने गुलामगिरी लादत असतात. म्हणूनच गुलामगिरी नको असेल तर मतदान केले पाहिजे.

(लेखक हे ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत.)