शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या मताचा आदर करा

By admin | Updated: February 19, 2017 02:59 IST

एखाद्या कंपनीच्या मालकानेच सेवक नियुक्ती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार केला किंवा गहाळ राहिला तर सेवक मुजोर होतील, मालकाचे ऐकणार नाहीत आणि ती कंपनी रसातळाला

- विजय कुंभारएखाद्या कंपनीच्या मालकानेच सेवक नियुक्ती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार केला किंवा गहाळ राहिला तर सेवक मुजोर होतील, मालकाचे ऐकणार नाहीत आणि ती कंपनी रसातळाला जाईल यात शंकाच नाही. तसेच काहीसे घडले आहे आपल्या देशाबद्दल. आपल्या देशातील नागरिकांनी लोकशाही स्वीकारली तेव्हाच देशातील प्रत्येक माणूस त्याचा मालक झाला. लोकशाही म्हणजे ‘लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालविलेले राज्य!’ हे जवळपास देशातील प्रत्येकाला तोंडपाठ असेल. परंतु लोक म्हणजे आपण आणि आपण या देशाचे राजे आहोत असे खरेच किती जणांना वाटते? कदाचित शतकानुशतके राजेशाही किंवा हुकूमशाहीची सवय लागली असल्याने असा ‘देशाचा मालकी हक्क’ अनेकांच्या पचनी पडला नसावा. त्याचमुळे ही ‘मालक’ किंवा ‘राजे’मंडळी प्रत्येक निवडणुकीत सेवकांकडेच आपला मालकीहक्क सोपवून मोकळे होत असावेत. हा देश चालविण्यासाठी संसद, विधान मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. सोयीसाठी आपण त्यांना कंपन्या म्हणू. या कंपन्यांसाठी सेवक निवडीची जी प्रक्रिया राबवली जाते तिला ‘निवडणूक’ म्हणतात. निवडणुकीमध्ये आपल्या वतीने हा देश चालविण्यासाठी आपले ‘सेवकङ्क्तप्रतिनिधी’ निवडण्यासाठी नागरिकांनी मतदान करायचे असते. परंतु बऱ्याचदा ही ‘मालक’ किंवा ‘राजे’मंडळी मतदान करीत नाहीत किंवा कोणत्यातरी संभाव्य सेवकाला आपले मत विकून मोकळे होतात. परिणामी, निवड झाल्यानंतर सेवक मुजोर होतात, मनमानी करतात आणि मालकांचे ऐकेनासे होतात.प्रत्येक निवडणुकीत बहुतांश मालकांनी म्हणजे मतदारांनी आपल्या निष्क्रियतेने किंवा भ्रष्टाचाराने सेवकांना जाब विचारण्याचा हक्क गमावलेला असतो. प्रत्येक मतदाराने नेहमी स्वत:ला आपल्या मताची किंमत समजली आहे का आणि स्वत:तरी आपल्या मताचा आदर करतो का हे पाहिले पाहिजे. मताचा आदर करणे म्हणजे मतदान करणे. परंतु मतदानाच्या दिवशी ते न करता सुटी एन्जॉय करणारे, मत विकणारे आपल्या मताचा अनादर करीत असतात. जे लोक स्वत:च्या मताचा आदर करीत नाहीत त्यांच्या मताचा आदर ‘इतरांनी’ तरी का करावा? त्यामुळेच ‘सेवक’ एकदा निवडून आले की जनतेच्या मताला किंमत देत नाहीत आणि मतदारांचे मालक होतात. आपल्या मताचा आदर करून स्वच्छ मनाने आणि निर्भीडपणे मतदान केले तर आपण निवडून दिलेल्या सेवकाला मालक या नात्याने जाब विचारण्याचा अधिकार आपल्याला राहील. लाचार होऊन लोभापोटी मतदान केले तर आपण गुलामगिरी स्वीकारून स्वत:साठी मालक निवडतोय असा त्याचा अर्थ होईल आणि गुलामांना कोणतेही हक्क नसतात. मतदान न करणारे किंवा मत विकणारी मंडळी आपल्या कृत्याने भ्रष्ट व नालायक सेवकाची निवड होण्यास मदत करीत असतात आणि स्वत:वरच नव्हे, तर प्रामाणिकपणे मतदान करणाऱ्यांवरही जबरदस्तीने गुलामगिरी लादत असतात. म्हणूनच गुलामगिरी नको असेल तर मतदान केले पाहिजे.

(लेखक हे ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत.)