शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

बोलीभाषांचा आदर करा!

By admin | Updated: April 5, 2016 02:21 IST

हजारो वर्षांच्या अथक परिश्रमांची फलश्रुती म्हणून भाषा उदयाला आली. बोलीभाषांना योग्य आदर देण्याची हीच योग्य वेळ आहे. संमेलनाच्या निमित्ताने विसंवादाच्या भिंतीतून आशेचे किरण डोकावत

प्रज्ञा केळकर-सिंग ,संतश्रेष्ठ नामदेवनगरी (घुमान)हजारो वर्षांच्या अथक परिश्रमांची फलश्रुती म्हणून भाषा उदयाला आली. बोलीभाषांना योग्य आदर देण्याची हीच योग्य वेळ आहे. संमेलनाच्या निमित्ताने विसंवादाच्या भिंतीतून आशेचे किरण डोकावत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचे नवे दालन खुले झाले आहे, असा आशावाद पहिल्या बहुभाषिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी सरहद संस्थेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय बहुभाषिक संमेलनाच्या सांगता सोहळ््यात सोमवारी व्यक्त केला.सुरेखा देवी, साहित्यिक विष्णू सूर्या दास, ज्येष्ठ पत्रकार जतिंदर पन्नू, सरहदचे संजय नहार, भारत देसडला, स्वागताध्यक्ष अरुण नेवासकर, राजन खान आदी मान्यवर उपस्थित होते.‘संत नामदेव महाराज की जय’च्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला. देवी म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात सर्व राज्यांमध्ये एकात्मता, सांस्कृतिक, सामाजिक ऐक्य नांदत होते. गेल्या काही वर्षांमध्ये हे ऐक्य लोप पावले आहे. गेल्या वीस वर्षांत आपल्याला स्वातंत्र्याच्या मार्गाचा विसर पडला आहे. स्वातंत्र्य आणि स्वत:मध्ये विसंवादाची मोठी भिंत उभी राहिली आहे. दोन प्रातांमध्ये संवाद, संस्कृतींची ओळखच उरलेली नाही. आपल्याला एकमेकांची साहित्यिक वैशिष्ट्ये माहीत नाहीत, ही मोठी दु:खद बाब आहे. विसंवादाच्या भिंती उभ्या राहिल्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या भिंतीमध्ये संवादाची खिडकी दिसू लागली आहे. स्वातंत्र्य पुन्हा एकदा टप्प्यात आलेले असताना ते मिळवण्यासाठी धाडसाने पावले उचलायला हवीत. मानवतेचा आणि भाषिक ऐक्याचा वारसा जपायला हवा. भाषांची सरहद तोडून संस्कृती समृद्ध करायला हव्यात.नि. ना. रेळकर यांच्या ‘संत नामदेव विहंग दर्शन’, सिमरत सुमेरा यांच्या ‘पुखराज’ आणि राजवंद राज यांच्या ‘रागनिया’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.