शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

पंतप्रधान मोदींच्या राष्ट्रप्रेमाबद्दल आदर, पत्राद्वारे व्यक्त केली दिलगिरी - श्रीपाल सबनीस

By admin | Updated: January 12, 2016 18:29 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केलेला एकेरी उल्लेख चुकीचा असल्याची जाणीव झाल्याने आपण त्यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली, असे श्रीपाल सबनीस यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १२ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राष्ट्रप्रेमाबद्दल मला आदर आहे, त्यांच्याबाबत केलेला एकेरी उल्लेख चुकीचा असल्याची जाणीव झाल्याने आपण त्यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे' असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 'मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला ' असेही ते म्हणाले. झाले गेले विसरून महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपण हे पाऊल उचलले, असेही नमूद करतानाच त्यांनी जनतेलाही ही घटना विसरून जाण्याचे व संमेलनाला अवश्य येण्याचे आवाहन केले.
'मी मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम असून कोणाचीही माफी मागणार नाही, पण माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो' असे सबनीस यांनी म्हटले. 
आकुर्डी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात सबनीस यांनी मोदींचा एकेरी उल्लेख केला होता. 'दहशतवाद्यांकडून धोका असतानाही शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदी पाकिस्तानमध्ये गेला, तेथे काही झाले असते तर आपल्याला पाडगावकरांच्या आधी मोदीला श्रद्धांजली वहावी लागली असती, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावरून मोठा गदारोळ माजला. या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात होती, उमरगा येथील कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी दिली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन नीट पार पडेल का असा प्रश्नही निर्माण झाला होता. मात्र संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डी पाटील यांच्या मध्यस्थीमुळे सबनीस दिलगिरी व्यक्त करण्यास तयार झाल्याने या वादावर पडदा पडण्याची चिन्हे आहेत.