शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो-३ ला दिलासा

By admin | Updated: May 19, 2017 00:09 IST

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ साठी केल्या जाणाऱ्या झाडांच्या कत्तलीवर घातलेली बंदी उठवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय योग्य आहे, असे

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ साठी केल्या जाणाऱ्या झाडांच्या कत्तलीवर घातलेली बंदी उठवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय योग्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. परिणामी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिलासा मिळाला असून, मेट्रो-३ चा मार्ग मोकळा झाला आहे.मेट्रो-३ प्रकल्पामुळे सुमारे ५ हजार झाडांची कत्तल होणार असल्याने चर्चगेट व कफ परेड येथील रहिवाशांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने सुरुवातीला झाडांच्या कत्तलीला स्थगिती दिली. मात्र मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वकिलांनी हा प्रकल्प कसा जनहिताचा आहे आणि मुंबईकरांसाठी किती महत्त्वाचा आहे, हे पटवून दिल्यानंतर उच्च न्यायालयाने ५ मे रोजी झाडांच्या कत्तलीवर दिलेली स्थगिती हटवली. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा बराच त्रास कमी होणार असून वाहतूककोंडीसारखा गंभीर प्रश्नही सुटणार आहे. पर्यावरणाचे जतन आणि विकासकामे यांमध्ये समन्वय साधण्याची आवश्यकता असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. मात्र नीना वर्मा यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा झाडांच्या कत्तलीवरील स्थगिती हटवण्याचा निर्णय योग्यच असल्याचे म्हणत मेट्रो-३ ला प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयामुळे कॉर्पोरेशनला मोठा दिलासा मिळाला आहे.- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पर्यावरणावर यापूर्वीच ‘उतारा’ शोधून काढला आहे. कॉर्पोरेशनद्वारे ‘प्रकल्प परिसर’ या हरित उपक्रमांतर्गत कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील प्रस्तावित २७ स्थानकांच्या परिसरातील विविध गृहनिर्माण संस्था, शाळा आणि रुग्णालयांमध्ये २५ हजारांहून अधिक वृक्षांच्या रोपांचे वाटप केले जात आहे.- मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाप्रमाणे मेट्रो-३ च्या प्रस्तावित २७ स्थानकांवर एकूण ३ हजार ८९१ झाडे आहेत. त्यापैकी १ हजार ७४ झाडे कापण्यास तर १ हजार ७२७ झाडांचे पुनर्रोपण करण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.- वृक्ष प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार प्रत्येक कापल्या जाणाऱ्या झाडामागे ३ झाडे लावणे बंधनकारक असते. त्याप्रमाणे तोडल्या जाणाऱ्या झाडांची भरपाई म्हणून कॉर्पोरेशन ३ हजार झाडे लावणार आहे.- मेट्रो-३ प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर जवळपास ६ हजार ८०० टन कार्बनडाय आॅक्साइड तसेच इतर हरित गृह वायूंचे प्रमाण कमी होईल, असा दावा केला जात आहे.- मेट्रो-३ या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पामुळे दररोज जवळपास ६.५ लाख वाहनांच्या फेऱ्या कमी होतील.- विमानतळांना जोडण्याकरिता साधारणत: स्वतंत्र मेट्रो वाहिन्या असतात. मात्र मेट्रो-३ विमानतळासह मुंबईतील बीकेसी, दादर, वरळी, महालक्ष्मी, चर्चगेट या प्रमुख केंद्रांना जोडणारा एकमेव मार्ग ठरणार आहे.