शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मेट्रो-३ ला दिलासा

By admin | Updated: May 19, 2017 00:09 IST

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ साठी केल्या जाणाऱ्या झाडांच्या कत्तलीवर घातलेली बंदी उठवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय योग्य आहे, असे

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ साठी केल्या जाणाऱ्या झाडांच्या कत्तलीवर घातलेली बंदी उठवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय योग्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. परिणामी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिलासा मिळाला असून, मेट्रो-३ चा मार्ग मोकळा झाला आहे.मेट्रो-३ प्रकल्पामुळे सुमारे ५ हजार झाडांची कत्तल होणार असल्याने चर्चगेट व कफ परेड येथील रहिवाशांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने सुरुवातीला झाडांच्या कत्तलीला स्थगिती दिली. मात्र मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वकिलांनी हा प्रकल्प कसा जनहिताचा आहे आणि मुंबईकरांसाठी किती महत्त्वाचा आहे, हे पटवून दिल्यानंतर उच्च न्यायालयाने ५ मे रोजी झाडांच्या कत्तलीवर दिलेली स्थगिती हटवली. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा बराच त्रास कमी होणार असून वाहतूककोंडीसारखा गंभीर प्रश्नही सुटणार आहे. पर्यावरणाचे जतन आणि विकासकामे यांमध्ये समन्वय साधण्याची आवश्यकता असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. मात्र नीना वर्मा यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा झाडांच्या कत्तलीवरील स्थगिती हटवण्याचा निर्णय योग्यच असल्याचे म्हणत मेट्रो-३ ला प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयामुळे कॉर्पोरेशनला मोठा दिलासा मिळाला आहे.- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पर्यावरणावर यापूर्वीच ‘उतारा’ शोधून काढला आहे. कॉर्पोरेशनद्वारे ‘प्रकल्प परिसर’ या हरित उपक्रमांतर्गत कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील प्रस्तावित २७ स्थानकांच्या परिसरातील विविध गृहनिर्माण संस्था, शाळा आणि रुग्णालयांमध्ये २५ हजारांहून अधिक वृक्षांच्या रोपांचे वाटप केले जात आहे.- मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाप्रमाणे मेट्रो-३ च्या प्रस्तावित २७ स्थानकांवर एकूण ३ हजार ८९१ झाडे आहेत. त्यापैकी १ हजार ७४ झाडे कापण्यास तर १ हजार ७२७ झाडांचे पुनर्रोपण करण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.- वृक्ष प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार प्रत्येक कापल्या जाणाऱ्या झाडामागे ३ झाडे लावणे बंधनकारक असते. त्याप्रमाणे तोडल्या जाणाऱ्या झाडांची भरपाई म्हणून कॉर्पोरेशन ३ हजार झाडे लावणार आहे.- मेट्रो-३ प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर जवळपास ६ हजार ८०० टन कार्बनडाय आॅक्साइड तसेच इतर हरित गृह वायूंचे प्रमाण कमी होईल, असा दावा केला जात आहे.- मेट्रो-३ या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पामुळे दररोज जवळपास ६.५ लाख वाहनांच्या फेऱ्या कमी होतील.- विमानतळांना जोडण्याकरिता साधारणत: स्वतंत्र मेट्रो वाहिन्या असतात. मात्र मेट्रो-३ विमानतळासह मुंबईतील बीकेसी, दादर, वरळी, महालक्ष्मी, चर्चगेट या प्रमुख केंद्रांना जोडणारा एकमेव मार्ग ठरणार आहे.