शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
4
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
5
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
6
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
7
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
8
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
9
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
10
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
11
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
13
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
14
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
15
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
16
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
17
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
19
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार

समस्यांच्या निराकरणासाठी राज्यपालांना साकडे

By admin | Updated: June 7, 2017 03:43 IST

कर्जत तालुक्यात कातकरी समाजाची लोकवस्ती मोठी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यात कातकरी समाजाची लोकवस्ती मोठी आहे. मात्र आजही हा समाज मूलभूत सोयी- सुविधांपासून वंचित आहे. या समाजाच्या समस्यांचे निराकरण व्हावे याकरिता रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नारायण डामसे यांनी सोमवारी राजभवनात राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, निवारा आदी सुविधांपासून अद्यापि बहुतांश कातकरी समाज वंचित आहे. कर्जत तालुक्यातील तीनशेच्यावर आदिवासी वस्तींपर्यंत रस्ते पोहचले नाहीत. कधी वनविभागाचा अडथळा तर कधी बिगर आदिवासी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रस्त्यांची कामे रखडली. परिणामी जंगलातून पाच ते दहा किलोमीटर पायपीट करत मजुरीसाठी यावे लागते. रु ग्णांना झोळीतून न्यावे लागते. दळणवळणाची सोय नसल्याने या आदिवासी वाड्या-पाड्यांचा विकास खुंटला आहे. तरी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या व प्रस्तावित केलेल्या रस्त्यांबाबत सरकारला आदेशित करावे अशी मागणी डामसे यांनी केली. तालुक्यात एक ग्रामीण रु ग्णालय, सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे, बत्तीस उप केंद्रे आणि कर्जत शहरात उपजिल्हा रु ग्णालय आहे . परंतु डॉक्टरचा, औषधांचा अभाव यामुळे ही आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे. त्यामुळे आदिवासींना आरोग्य सेवा मिळत नाही. तालुक्यात एकावन्न ग्रामपंचायती आहेत. त्यातील सहा ग्रामपंचायतीला दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय पेण येथे आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा कार्यभार या कार्यालयावर आहे. त्यामुळे पेण कार्यालय स्वतंत्र करून कर्जत येथे स्थलांतरित करावे, तसेच ते सध्या भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू आहे त्यासाठी हक्काची इमारत उभारावी आदी मागण्या रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नारायण डामसे यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना सादर केलेल्या निवेदनात केल्या आहेत.