शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

समस्यांच्या निराकरणासाठी राज्यपालांना साकडे

By admin | Updated: June 7, 2017 03:43 IST

कर्जत तालुक्यात कातकरी समाजाची लोकवस्ती मोठी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यात कातकरी समाजाची लोकवस्ती मोठी आहे. मात्र आजही हा समाज मूलभूत सोयी- सुविधांपासून वंचित आहे. या समाजाच्या समस्यांचे निराकरण व्हावे याकरिता रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नारायण डामसे यांनी सोमवारी राजभवनात राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, निवारा आदी सुविधांपासून अद्यापि बहुतांश कातकरी समाज वंचित आहे. कर्जत तालुक्यातील तीनशेच्यावर आदिवासी वस्तींपर्यंत रस्ते पोहचले नाहीत. कधी वनविभागाचा अडथळा तर कधी बिगर आदिवासी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रस्त्यांची कामे रखडली. परिणामी जंगलातून पाच ते दहा किलोमीटर पायपीट करत मजुरीसाठी यावे लागते. रु ग्णांना झोळीतून न्यावे लागते. दळणवळणाची सोय नसल्याने या आदिवासी वाड्या-पाड्यांचा विकास खुंटला आहे. तरी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या व प्रस्तावित केलेल्या रस्त्यांबाबत सरकारला आदेशित करावे अशी मागणी डामसे यांनी केली. तालुक्यात एक ग्रामीण रु ग्णालय, सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे, बत्तीस उप केंद्रे आणि कर्जत शहरात उपजिल्हा रु ग्णालय आहे . परंतु डॉक्टरचा, औषधांचा अभाव यामुळे ही आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे. त्यामुळे आदिवासींना आरोग्य सेवा मिळत नाही. तालुक्यात एकावन्न ग्रामपंचायती आहेत. त्यातील सहा ग्रामपंचायतीला दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय पेण येथे आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा कार्यभार या कार्यालयावर आहे. त्यामुळे पेण कार्यालय स्वतंत्र करून कर्जत येथे स्थलांतरित करावे, तसेच ते सध्या भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू आहे त्यासाठी हक्काची इमारत उभारावी आदी मागण्या रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नारायण डामसे यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना सादर केलेल्या निवेदनात केल्या आहेत.