शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

‘स्मार्ट सिटी’पेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा!

By admin | Updated: December 21, 2015 02:23 IST

कर्जबाजारी शेतकरी जीवन संपवत आहेत. बसच्या पाससाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीवर आत्महत्येची वेळ येते, असे असताना शहरे स्मार्ट करण्याच्या योजना कशाला राबविता?

जळगाव : कर्जबाजारी शेतकरी जीवन संपवत आहेत. बसच्या पाससाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीवर आत्महत्येची वेळ येते, असे असताना शहरे स्मार्ट करण्याच्या योजना कशाला राबविता? त्यापेक्षा सामान्यांना, शेतकऱ्यांना जगविण्याच्या योजना राबवा, त्यांचे प्रश्न सोडवा, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील जाहीर सभेत भाजपावर टीकास्त्र सोडले. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी ते रविवारी येथे आले होते. खान्देशातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या २२२ वारसांना प्रत्येकी १० हजार रुपये मदतीचे वाटप त्यांच्या हस्ते झाले. केळी, कापूस, कांदा व द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न मार्गी लागावे, यासाठी आपण स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. शिवसेना स्टाईलने ते मार्गी लावण्यात येतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, उपनेते आ. गुलाबराव पाटील आदी त्यांच्यासोबत दौऱ्यात होते. दिल्लीतील घडामोडींकडे अंगुलीनिर्देश करीत ते म्हणाले की, ‘सध्या सुडाचे राजकारण चालले आहे. निर्भया प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेविरोधात आंदोलन करणाऱ्या पीडित मुलीच्या आई-वडिलांनाच अटक केली जाते. आरोपी मोकाट व पीडितेचे आई वडील अटकेत, हा कुठला न्याय? सुडाचे राजकारण तुम्हालाच लखलाभ,’ अशी टीका त्यांनी भाजपावर केली.