शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

राज्यपालांकडून संकल्पांचा पाऊस

By admin | Updated: March 10, 2015 01:58 IST

राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संयुक्त सभागृहासमोर केलेल्या अभिभाषणात

मुंबई : राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संयुक्त सभागृहासमोर केलेल्या अभिभाषणात दुष्काळी आणि अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असल्याचे सांगत विविध क्षेत्रात सरकार हाती घेणार असलेल्या योजना निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील, असे सांंगितले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील स्मारक, लंडनमधील घर शासनाने विकत घेणे, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे औरंगाबाद येथील स्मारक उभारण्यास शासन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील स्मारकाबाबत मात्र राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख नव्हता. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे वाटप सुरु केले आहे. प्रत्येक वर्षी ५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याची योजना असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ४०० कोटी रु.चे कर्ज नाबार्डकडून घेतले जाईल. पाण्याची मागणी व सिंचनेतर पाणी वापरकर्त्यांना शासनाची मंजुरी देणे या सुविधा आॅनलाइन करण्यात येतील. येत्या वर्षांत ग्रामीण भागात १४ लाख ५० हजार प्रसाधनगृहे बांधण्यात येतील. पीक विमा योजनेची व्यापी पुढील वर्षी वाढविली जाईल,मेळघाट व नवेगाव -नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये विशेष व्याघ्र संरक्षण दल निर्माण करण्यात येईल, असे राज्यपाल म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवताली ६०० चौ.कि.मी.च्या क्षेत्रात ‘नयना’ हे नवीन अत्याधुनिक शहर उभारण्याचे ठरविले आहे.राज्यात ३० स्मार्ट शहरे उभारण्या येतील. राज्याला औद्योगिक, पर्यटन व सेवा क्षेत्रातील प्रकल्पांची कामे हाती घेण्यासाठी एमएसआरडीसी इंडिया इंटरनॅशनल अशी शासकीय कंपनी स्थापन करण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याचे काम येत्या ९० आठवड्यांमध्ये पूर्ण केले जाईल. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत माझे शासन अत्यंत गंभीर व संवेदनशील असून या प्रश्नावर प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणाचा सक्रि य पाठपुरावा करून त्याद्वारे वादग्रस्त सीमा भागातील मराठी भाषिक जनतेच्या पाठीशी सदैव उभे राहील, असे ते म्हणाले.