शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
4
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
5
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
6
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
7
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
8
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
9
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
10
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
11
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
12
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
13
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
14
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
15
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

राज्यपालांकडून संकल्पांचा पाऊस

By admin | Updated: March 10, 2015 01:58 IST

राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संयुक्त सभागृहासमोर केलेल्या अभिभाषणात

मुंबई : राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संयुक्त सभागृहासमोर केलेल्या अभिभाषणात दुष्काळी आणि अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असल्याचे सांगत विविध क्षेत्रात सरकार हाती घेणार असलेल्या योजना निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील, असे सांंगितले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील स्मारक, लंडनमधील घर शासनाने विकत घेणे, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे औरंगाबाद येथील स्मारक उभारण्यास शासन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील स्मारकाबाबत मात्र राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख नव्हता. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे वाटप सुरु केले आहे. प्रत्येक वर्षी ५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याची योजना असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ४०० कोटी रु.चे कर्ज नाबार्डकडून घेतले जाईल. पाण्याची मागणी व सिंचनेतर पाणी वापरकर्त्यांना शासनाची मंजुरी देणे या सुविधा आॅनलाइन करण्यात येतील. येत्या वर्षांत ग्रामीण भागात १४ लाख ५० हजार प्रसाधनगृहे बांधण्यात येतील. पीक विमा योजनेची व्यापी पुढील वर्षी वाढविली जाईल,मेळघाट व नवेगाव -नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये विशेष व्याघ्र संरक्षण दल निर्माण करण्यात येईल, असे राज्यपाल म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवताली ६०० चौ.कि.मी.च्या क्षेत्रात ‘नयना’ हे नवीन अत्याधुनिक शहर उभारण्याचे ठरविले आहे.राज्यात ३० स्मार्ट शहरे उभारण्या येतील. राज्याला औद्योगिक, पर्यटन व सेवा क्षेत्रातील प्रकल्पांची कामे हाती घेण्यासाठी एमएसआरडीसी इंडिया इंटरनॅशनल अशी शासकीय कंपनी स्थापन करण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याचे काम येत्या ९० आठवड्यांमध्ये पूर्ण केले जाईल. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत माझे शासन अत्यंत गंभीर व संवेदनशील असून या प्रश्नावर प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणाचा सक्रि य पाठपुरावा करून त्याद्वारे वादग्रस्त सीमा भागातील मराठी भाषिक जनतेच्या पाठीशी सदैव उभे राहील, असे ते म्हणाले.