शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

राजीनामे खिशातच

By admin | Updated: February 10, 2017 05:28 IST

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक आचारसंहितेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेणे शक्य नाही, हे माहिती असूनही राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे

यदु जोशी, मुंबईमहापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक आचारसंहितेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेणे शक्य नाही, हे माहिती असूनही राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे चार मंत्री गुरुवारी रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला कसे गेले? की मुख्यमंत्र्यांना द्यावयाचे राजीनामे त्यांच्या खिशातच राहिले, असे सवाल उपस्थित केले जात आहेत.विश्वसनीय सूत्रांनुसार, शिवसेनेचे चार मंत्री राजीनामे देण्यासाठीच निघाले होते. मात्र, राजीनाम्याचा निर्णय अर्ध्या वाटेतच बारगळल्यानंतर कर्जमाफीची मागणी पुढे आली. त्यासाठी दोन ओळींचे निवेदन एका मंत्र्याला ‘मातोश्री’वरून मेल करण्यात आले आणि त्यातीलमजकूर मग अन्य एका मंत्र्याच्या लेटरहेडवर त्यांच्या वर्षा बंगल्यानजीकच्या घरी टाईप करून निवेदन तयार करण्यात आले. त्यानंतर ते निवेदन घेऊन चार मंत्री ‘वर्षा’वर पोहोचले. गुरुवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस हे मुलुंडच्या प्रचारसभेत असताना शिवसेनेचे दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, डॉ. दीपक सावंत आणि दीपक केसरकर हे चार मंत्री वर्षावर भेटायला येऊ इच्छितात, असा निरोप धाडण्यात आला. मात्र, भेटीचा विषय सांगितला गेला नाही. राजीनामे देण्याबाबत ऐनवेळी मतभिन्नता निर्माण झाल्याने राजीनामा पत्रांचे रुपांतर कर्जमाफीच्या दोन ओळींच्या पत्रात झाले. खिशातले राजीनामे मग माध्यमांना दाखविण्यापुरते उरले, असे म्हटले जाते. मात्र, शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी ही माहिती चुकीची असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आम्ही कर्जमाफीच्या मागणीसाठीच वर्षावर गेलो होतो. भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. मग, महाराष्ट्रात कर्जमाफी का नको, असा आमचा सवाल आहे, असे शिवसेनेच्या एका मंत्र्याने सांगितले. भाजपाला वगळून सरकारशिवसेनेने पाठिंबा काढला तर आमचे १५० आमदार राहतील आणि त्यांच्याकडे (भाजपा) १३८ आमदार राहतील, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले. भाजपाला वगळून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेनचे सरकार स्थापन करण्याचे संकेत त्यांनी दिले. सेनेने पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार नाही, असेही सूचित केलेशिवजयंतीचा मुहूर्त?शिवजयंतीच्या मुहूर्तावर १९ फेब्रुवारी रोजी शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल, असा तर्क आहे. बीएमसीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान आहे. त्याच्या दोन दिवस आधी सेना मंत्र्यांनी राजीनामे दिल्यास फायदा मिळेल, असा मतप्रवाह सेनेत आहे.भाजपाचा प्लॅन बी काय? शिवसेनेने पाठिंबा काढलाच तर भाजपाकडून आमदारांची फोडाफोडी होऊ शकते. पक्षांतर बंदी कायद्याचा बडगा असल्याने बहुमतासाठी आवश्यक तेवढे आमदार गळाला लावायचे आणि राजीनामे देऊन त्यांना पुन्हा निवडून आणायचे असा हा प्लॅन बी असल्याचे म्हटले जाते.