शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

राजीनामे खिशातच

By admin | Updated: February 10, 2017 05:28 IST

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक आचारसंहितेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेणे शक्य नाही, हे माहिती असूनही राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे

यदु जोशी, मुंबईमहापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक आचारसंहितेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेणे शक्य नाही, हे माहिती असूनही राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे चार मंत्री गुरुवारी रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला कसे गेले? की मुख्यमंत्र्यांना द्यावयाचे राजीनामे त्यांच्या खिशातच राहिले, असे सवाल उपस्थित केले जात आहेत.विश्वसनीय सूत्रांनुसार, शिवसेनेचे चार मंत्री राजीनामे देण्यासाठीच निघाले होते. मात्र, राजीनाम्याचा निर्णय अर्ध्या वाटेतच बारगळल्यानंतर कर्जमाफीची मागणी पुढे आली. त्यासाठी दोन ओळींचे निवेदन एका मंत्र्याला ‘मातोश्री’वरून मेल करण्यात आले आणि त्यातीलमजकूर मग अन्य एका मंत्र्याच्या लेटरहेडवर त्यांच्या वर्षा बंगल्यानजीकच्या घरी टाईप करून निवेदन तयार करण्यात आले. त्यानंतर ते निवेदन घेऊन चार मंत्री ‘वर्षा’वर पोहोचले. गुरुवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस हे मुलुंडच्या प्रचारसभेत असताना शिवसेनेचे दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, डॉ. दीपक सावंत आणि दीपक केसरकर हे चार मंत्री वर्षावर भेटायला येऊ इच्छितात, असा निरोप धाडण्यात आला. मात्र, भेटीचा विषय सांगितला गेला नाही. राजीनामे देण्याबाबत ऐनवेळी मतभिन्नता निर्माण झाल्याने राजीनामा पत्रांचे रुपांतर कर्जमाफीच्या दोन ओळींच्या पत्रात झाले. खिशातले राजीनामे मग माध्यमांना दाखविण्यापुरते उरले, असे म्हटले जाते. मात्र, शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी ही माहिती चुकीची असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आम्ही कर्जमाफीच्या मागणीसाठीच वर्षावर गेलो होतो. भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. मग, महाराष्ट्रात कर्जमाफी का नको, असा आमचा सवाल आहे, असे शिवसेनेच्या एका मंत्र्याने सांगितले. भाजपाला वगळून सरकारशिवसेनेने पाठिंबा काढला तर आमचे १५० आमदार राहतील आणि त्यांच्याकडे (भाजपा) १३८ आमदार राहतील, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले. भाजपाला वगळून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेनचे सरकार स्थापन करण्याचे संकेत त्यांनी दिले. सेनेने पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार नाही, असेही सूचित केलेशिवजयंतीचा मुहूर्त?शिवजयंतीच्या मुहूर्तावर १९ फेब्रुवारी रोजी शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल, असा तर्क आहे. बीएमसीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान आहे. त्याच्या दोन दिवस आधी सेना मंत्र्यांनी राजीनामे दिल्यास फायदा मिळेल, असा मतप्रवाह सेनेत आहे.भाजपाचा प्लॅन बी काय? शिवसेनेने पाठिंबा काढलाच तर भाजपाकडून आमदारांची फोडाफोडी होऊ शकते. पक्षांतर बंदी कायद्याचा बडगा असल्याने बहुमतासाठी आवश्यक तेवढे आमदार गळाला लावायचे आणि राजीनामे देऊन त्यांना पुन्हा निवडून आणायचे असा हा प्लॅन बी असल्याचे म्हटले जाते.