शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

रेल्वे व्यवस्थापनासमोर रहिवासी मांडणार व्यथा

By admin | Updated: April 30, 2016 02:34 IST

जुईनगरमधील रेल्वे कॉलनीची दुरवस्था झाली आहे. मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये जीव मुठीत घेवून राहावे लागत आहे.

नवी मुंबई : जुईनगरमधील रेल्वे कॉलनीची दुरवस्था झाली आहे. मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये जीव मुठीत घेवून राहावे लागत आहे. येथील रहिवासी शनिवारी रेल्वे व्यवस्थापनाची भेट घेवून त्यांच्यासमोर व्यथा मांडणार आहेत.रेल्वे प्रशासनाने सानपाडामध्ये कारशेड तयार केल्यानंतर जुईनगरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी वसाहत उभारली परंतु येथील इमारतीची योग्य डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे अनेक इमारतीचे काम अर्धवट अवस्थेत राहिले आहे. अनेक इमारती धोकादायक बनल्या आहेत. रेल्वे कर्मचारी या धोकादायक इमारतींमध्ये परिवारासह जीव मुठीत घेवून रहात आहेत. लोकमतने येथील समस्यांना वाचा फोडल्यानंतर प्रशासन काही प्रमाणात जागे झाले. स्थानिक नगरसेविका रुपाली भगत व निशांत भगत यांनी खासदार राजन विचारे व रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करुन येथील समस्या सोडविण्याची मागणी केली. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक ३० एप्रिलला आयोजित केली आहे. या बैठकीला खासदार राजन विचारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दशरथ भगत व रहिवाशांचे शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे.रेल्वे कॉलनीमधील धोकादायक व अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्यात यावा. वसाहतीमधील रस्ते व गटारांची डागडुजी करण्यात यावी मलनि:सारण वाहिन्या नवीन टाकून त्या महापालिकेच्या वाहिन्यांना जोडण्यात याव्या. कॉलनीमधील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात यावे व इतर समस्यांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती निशांत भगत यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)