शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

रहिवाशांनी विकास प्रस्ताव समजून घ्यावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2016 01:56 IST

अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाबाबत रहिवाशांच्या मनातील शंकांचे निरसन करू, असा दावा अभ्युदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था संघाने केला

मुंबई : अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाबाबत रहिवाशांच्या मनातील शंकांचे निरसन करू, असा दावा अभ्युदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था संघाने केला आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचे अध्यक्ष नंदकुमार काटकर बोलत होते.काटकर म्हणाले की, येथील ३३ एकर परिसरात पसरलेल्या ४७ गृहनिर्माण संस्थांनी मिळून संघाची स्थापना केली आहे. संपूर्ण नगराचा विकास सामुदायिक पद्धतीने करण्याचा ठराव सर्व संस्थांनी एकत्र येत याआधीच केला आहे. त्यासाठी विकासक निवडीच्या प्रक्रियेत ५० टक्क्यांहून अधिक बहुमताची अट ठेवण्यात आली होती. त्याप्रमाणे चार विकासकांपैकी एका विकासकाची निवड निविदा प्रक्रियेद्वारे बहुमताने केली. या विकासकाने दिलेल्या प्रस्तावाबाबत रहिवाशांना माहिती मिळावी, म्हणून प्रत्येक गृहनिर्माण संस्थेतील चार प्रतिनिधींना आमंत्रित केले होते. यापुढेही अभ्युदय नगरमधील सर्व गृहनिर्माण संस्थांना २९ सप्टेंबरपर्यंत प्रस्तावाबाबत मार्गदर्शन करणार असल्याचे संघाने स्पष्ट केले. दरम्यान, प्रस्तावित प्रकल्पानुसार येथील ३ हजार ४१० गाळेधारकांमध्ये ३ हजार २४० निवासी आणि १७० अनिवासी गाळ्यांची नोंद आहे. मात्र गेल्या ९ वर्षांपासून या सर्व गृहनिर्माण संस्थांचा एकत्रित विकासाचा प्रकल्प भिजत घोंगड्यात आहे. सुरुवातीच्या विकासकाला बाजूला सारून सर्व गृहनिर्माण संस्थांनी संघाची स्थापना केली आहे. त्यानंतर सुरू झालेल्या नव्या प्रक्रियेत नवा विकासक निवडण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित केला होता. मात्र प्रत्यक्षात शासकीय मंजुरींअभावी या प्रक्रियेला २५ महिने लागले. आता विकासकाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, प्रत्येक रहिवाशाला शासनाच्या डीसीआर ३३(५)च्या धोरणानुसार ५३२ चौरस फूट अधिक विकासकाच्या नफ्यातून ५० चौरस फूट असे एकूण ५८२ चौरस फुटांचे घर मिळणार आहे. याउलट शासनाचे नवे धोरण प्रस्तावित असून, ते मंजूर झाल्यास रहिवाशांना नव्या प्रस्तावानुसार ६३४ चौरस फूट अधिक विकासकाच्या नफ्यातून ५० चौरस फूट असे ६८४ चौरस फुटांचे घर मिळणार आहे. (प्रतिनिधी)