शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लघु, मध्यम उद्योगांसाठी राखीव जागा

By admin | Updated: May 5, 2016 01:39 IST

लघु आणि मध्यम उद्यागांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकरता एमआयडीसीमध्ये विशिष्ट क्षेत्र राखीव ठेवण्याची तरतूद असलेले धोरण राज्य सरकार लवकरच आणणार आहे. उद्योग मंत्री सुभाष

मुंबई : लघु आणि मध्यम उद्यागांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकरता एमआयडीसीमध्ये विशिष्ट क्षेत्र राखीव ठेवण्याची तरतूद असलेले धोरण राज्य सरकार लवकरच आणणार आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज पत्र परिषदेत ही माहिती दिली. मेक इन महाराष्ट्र अंतर्गत झालेल्या गुंतवणूक करारांपैकी ६० टक्के करारांची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे तसेच चार स्मार्ट सिटींना परवाने देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. मेक इन इंडियामध्ये झालेल्या करारांच्या अंमलबजावणीत इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र पुढे आहे. आपल्याकडे ६० टक्के करारांवर अंमल सुरू झालेला असताना गुजरातमध्ये हे प्रमाण केवळ सहा टक्केच आहे. अन्य राज्यांमध्ये ते १० टक्क्यांहून अधिक नाही, असे देसाई यांनी सांगितले. मेक इन महाराष्ट्रच्या आढाव्याची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीनंतर देसाई यांनी सांगितले की, एकूण २०६३ करार करण्यात आले होते. त्यापैकी २०९७ करार सूक्ष्म, लघु व मध्यम आणि मोठ्या उद्योगांसाठी होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत भूखंड मिळावा म्हणून २८९ सामंजस्य करार केलेल्या कंपन्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १९८ कंपन्यांना भूखंड देण्यात आले. सामंजस्य करार वास्तवात यावेत यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कृतीदल स्थापन करण्यात आले असून प्रत्येक टप्प्याचा पाठपुरावा केला जात आहे. छोट्या उद्योगांना एमआयडीसीमध्ये तयार गाळे देण्याचा विचार केला जात आहे असेही ते म्हणाले. राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या चार स्मार्ट सिटींमध्ये नवी मुंबई स्मार्ट सिटी (आॅरेंज सिटी) १९९९८९ कोटी रु, सनस्ट्रिम सिटी प्रा.लि. ११९०० कोटी रु, रिनायन्स इंड्स प्रा.लि. ८५७० कोटी रु आणि ब्रॉडवे इंटिग्रेटेड पार्क १२०० कोटी रु. यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते वापरणे उद्योगांसाठी बंधनकारक करण्याचा विचार सुरू आहे. कोणीही स्वेच्छेने प्रक्रि या केलेले सांडपाणी वापरणार नाही मात्र बंधनकारक केल्यास असे पाणी वापरले जाईल, असे देसाई म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)