शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

लघु, मध्यम उद्योगांसाठी राखीव जागा

By admin | Updated: May 5, 2016 01:39 IST

लघु आणि मध्यम उद्यागांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकरता एमआयडीसीमध्ये विशिष्ट क्षेत्र राखीव ठेवण्याची तरतूद असलेले धोरण राज्य सरकार लवकरच आणणार आहे. उद्योग मंत्री सुभाष

मुंबई : लघु आणि मध्यम उद्यागांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकरता एमआयडीसीमध्ये विशिष्ट क्षेत्र राखीव ठेवण्याची तरतूद असलेले धोरण राज्य सरकार लवकरच आणणार आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज पत्र परिषदेत ही माहिती दिली. मेक इन महाराष्ट्र अंतर्गत झालेल्या गुंतवणूक करारांपैकी ६० टक्के करारांची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे तसेच चार स्मार्ट सिटींना परवाने देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. मेक इन इंडियामध्ये झालेल्या करारांच्या अंमलबजावणीत इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र पुढे आहे. आपल्याकडे ६० टक्के करारांवर अंमल सुरू झालेला असताना गुजरातमध्ये हे प्रमाण केवळ सहा टक्केच आहे. अन्य राज्यांमध्ये ते १० टक्क्यांहून अधिक नाही, असे देसाई यांनी सांगितले. मेक इन महाराष्ट्रच्या आढाव्याची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीनंतर देसाई यांनी सांगितले की, एकूण २०६३ करार करण्यात आले होते. त्यापैकी २०९७ करार सूक्ष्म, लघु व मध्यम आणि मोठ्या उद्योगांसाठी होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत भूखंड मिळावा म्हणून २८९ सामंजस्य करार केलेल्या कंपन्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १९८ कंपन्यांना भूखंड देण्यात आले. सामंजस्य करार वास्तवात यावेत यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कृतीदल स्थापन करण्यात आले असून प्रत्येक टप्प्याचा पाठपुरावा केला जात आहे. छोट्या उद्योगांना एमआयडीसीमध्ये तयार गाळे देण्याचा विचार केला जात आहे असेही ते म्हणाले. राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या चार स्मार्ट सिटींमध्ये नवी मुंबई स्मार्ट सिटी (आॅरेंज सिटी) १९९९८९ कोटी रु, सनस्ट्रिम सिटी प्रा.लि. ११९०० कोटी रु, रिनायन्स इंड्स प्रा.लि. ८५७० कोटी रु आणि ब्रॉडवे इंटिग्रेटेड पार्क १२०० कोटी रु. यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते वापरणे उद्योगांसाठी बंधनकारक करण्याचा विचार सुरू आहे. कोणीही स्वेच्छेने प्रक्रि या केलेले सांडपाणी वापरणार नाही मात्र बंधनकारक केल्यास असे पाणी वापरले जाईल, असे देसाई म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)