शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आरक्षण बंद करणार नाही

By admin | Updated: October 12, 2015 05:41 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील दलित, शोषित आणि उपेक्षितांना आरक्षणाच्या रूपाने दिलेली ताकद आमचे सरकार कदापि रोखणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील दलित, शोषित आणि उपेक्षितांना आरक्षणाच्या रूपाने दिलेली ताकद आमचे सरकार कदापि रोखणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच आरक्षणाच्या धोरणाचा फेरविचार करण्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून बराच गदारोळ उठला होता. बिहार विधानसभा निवडणुकीतही विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरल्याने मोदी यांचे वक्तव्य याचसंदर्भात असल्याचे मानले जात आहे. दादर येथील इंदू मिलच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे आणि दहिसर ते डी.एन. नगर व दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) या मार्गावरील मेट्रो रेल्वेचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला. तत्पूर्वी जेएनपीटी येथील पोर्ट उभारणीच्या कामाचा प्रारंभही त्यांनी केला. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार, सामाजिक न्याय मंत्री विजय सांपला तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे, समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, खा. रामदास आठवले आदी मान्यवर उपस्थित होते. वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या जाहीर सभेत बोलताना मोदी म्हणाले, इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे स्मारक आमच्या हातून होणे, हे भाग्यलिखित असावे. आमच्या अगोदरही सरकार होते. पण त्यांना जी गोष्ट जमली नाही ती आम्ही अवघ्या काही दिवसात करून दाखवली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गंगवार यांनी तातडीने इंदू मिलची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून दिली. त्यामुळे हे शक्य झाले. या जगावर जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार यात शंका नाही. आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले, केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना व आताही दलित, उपेक्षितांना मिळणारे आरक्षण बंद होणार, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. तशा टोळ््याही कार्यरत आहेत. वास्तविक, डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाकरिता इंदू मिलची जमीन तातडीने देऊन, संसदेत डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र बसवून भाजपानेच बाबासाहेबांबद्दलच्या निष्ठांचे दर्शन घडवले आहे. त्यामुळेच दलित, इतर मागासवर्गीय, आदिवासी यांची संख्या सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब आदी राज्यांमध्ये या घडीला भाजपाची सत्ता आहे. डॉ. आंबेडकर यांनी दिलेली आरक्षणाची ताकद कोणीही रोखू शकत नाही. आपण स्वत: गरीबी पाहिली असून डॉ. आंबेडकर नसते तर माझ्यासारखा सामान्य घरातील व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचू शकला नसता.डॉ. आंबेडकर यांना आपण दूरदृष्टीच्या अभावी केवळ दलितांचे नेते बनवले तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल, अशा शब्दात मोदींनी आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे विश्वातील दलित, शोषित, पिडीतांचे नेते आहेत. शोषितांच्या संघर्षाचा विषय निघाला की, मार्टीन ल्युथर किंग यांचे नाव घेतले जाते. त्याचप्रमाणे डॉ. आंबेडकर यांचे नाव जगभर घेतले गेले पाहिजे. डॉ. आंबेडकर यांनी आयुष्यभर उपेक्षेचे विष पचवले. मात्र जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी कधीच कुटुतेचे दर्शन घडवले नाही. त्यामुळे त्यांचे विचार जगभर पोहोचविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही मोदींनी दिली.(विशेष प्रतिनिधी)