शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

निवडणुकांसाठी आरक्षण मोर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 03:54 IST

पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून त्यासाठी जातीच्या आधारावरील मोर्चांचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ठाणे : महाराष्ट्रात जातीचे विषय कालवण्याचा उद्योग सुरू आहे. पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून त्यासाठी जातीच्या आधारावरील मोर्चांचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा जातींच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा युपी, बिहार व्हायला वेळ लागणार नाही, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात केली. पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेलाही त्यांनी फटकारले. शिवसेनेने आधी आरक्षणप्रश्नी भूमिका जाहीर करायला हवी आणि नंतरच विशेष अधिवेशनाची मागणी करायला हवी, अशा शब्दांत त्यांनी सेनेला टोलवले.राज्यातील नव्हे, तर देशातील शिस्तबद्ध मोर्चे असे मराठा मोर्चाचे वर्णन त्यांनी केले. त्याचवेळी त्यांनी जातीच्या आधारावर आरक्षणाला विरोध केला. ब्राह्मण मुख्यमंत्री असतानाच यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा का काढावासा वाटला, असा प्रश्न करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू उचलून धरत ते म्हणाले, शरद पवार आता म्हणताहेत आरक्षण द्या. पण त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांना आरक्षण देण्यापासून कोणी रोखले होते? या लोकांना समाजाशी देणे-देणे नाही. समाजाचा वापर निवडणुकांसाठी कसा करायचा इतके कळते. आरक्षण देण्यातील अडचणी त्यांना ठावूक आहेत, तरीही ते या मुद्द्यावरून वातावरण तापवत असल्याबद्दल त्यांनी टीकास्त्र सोडले.पाकिस्तानमधील सर्जिकल अ‍ॅटॅकसंदर्भात सर्व पक्ष एकासुरात बोलत असल्याचे कौतुक करून त्यांनी पाक कलाकारांच्या मुद्द्यावरून मित्र असलेल्या सलमान खानला फटकारले. देशासमोर व महाराष्ट्रासमोर कोणी माझा मित्र नाही. त्याने जपून बोलायला हवे होते, याचा पुनरूच्चार त्यांनी केला. कलाकाराला सीमेचे बंधन नसल्याचे मत मांडणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला. सीमेवरच्या जवानाचे पाकिस्तानशी वैयक्तिक भांडण नाही. तो तेथे लढतो म्हणून आपण येथे सुखात जगतो, याची जाणिव त्यांनी करून दिली. (प्रतिनिधी)>सर्वाधिक परप्रांतीय ठाणे जिल्ह्यातठाणे जिल्ह्यात सात महापालिका आहेत. परप्रांतीय आल्याने लोकसंख्या वाढली आणि नगरपालिकांच्या महापालिका झाल्या. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक परप्रांतीय असल्याचा दावाही राज ठाकरे यांनी केला.