शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

निवडणुकांसाठी आरक्षण मोर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 03:54 IST

पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून त्यासाठी जातीच्या आधारावरील मोर्चांचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ठाणे : महाराष्ट्रात जातीचे विषय कालवण्याचा उद्योग सुरू आहे. पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून त्यासाठी जातीच्या आधारावरील मोर्चांचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा जातींच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा युपी, बिहार व्हायला वेळ लागणार नाही, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात केली. पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेलाही त्यांनी फटकारले. शिवसेनेने आधी आरक्षणप्रश्नी भूमिका जाहीर करायला हवी आणि नंतरच विशेष अधिवेशनाची मागणी करायला हवी, अशा शब्दांत त्यांनी सेनेला टोलवले.राज्यातील नव्हे, तर देशातील शिस्तबद्ध मोर्चे असे मराठा मोर्चाचे वर्णन त्यांनी केले. त्याचवेळी त्यांनी जातीच्या आधारावर आरक्षणाला विरोध केला. ब्राह्मण मुख्यमंत्री असतानाच यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा का काढावासा वाटला, असा प्रश्न करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू उचलून धरत ते म्हणाले, शरद पवार आता म्हणताहेत आरक्षण द्या. पण त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांना आरक्षण देण्यापासून कोणी रोखले होते? या लोकांना समाजाशी देणे-देणे नाही. समाजाचा वापर निवडणुकांसाठी कसा करायचा इतके कळते. आरक्षण देण्यातील अडचणी त्यांना ठावूक आहेत, तरीही ते या मुद्द्यावरून वातावरण तापवत असल्याबद्दल त्यांनी टीकास्त्र सोडले.पाकिस्तानमधील सर्जिकल अ‍ॅटॅकसंदर्भात सर्व पक्ष एकासुरात बोलत असल्याचे कौतुक करून त्यांनी पाक कलाकारांच्या मुद्द्यावरून मित्र असलेल्या सलमान खानला फटकारले. देशासमोर व महाराष्ट्रासमोर कोणी माझा मित्र नाही. त्याने जपून बोलायला हवे होते, याचा पुनरूच्चार त्यांनी केला. कलाकाराला सीमेचे बंधन नसल्याचे मत मांडणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला. सीमेवरच्या जवानाचे पाकिस्तानशी वैयक्तिक भांडण नाही. तो तेथे लढतो म्हणून आपण येथे सुखात जगतो, याची जाणिव त्यांनी करून दिली. (प्रतिनिधी)>सर्वाधिक परप्रांतीय ठाणे जिल्ह्यातठाणे जिल्ह्यात सात महापालिका आहेत. परप्रांतीय आल्याने लोकसंख्या वाढली आणि नगरपालिकांच्या महापालिका झाल्या. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक परप्रांतीय असल्याचा दावाही राज ठाकरे यांनी केला.