शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण धोरणाआड बिल्डरांचे चांगभलं

By admin | Updated: March 7, 2016 03:36 IST

विकास हक्क हस्तांतरणाचे (टीडीआर) धोरण मुंबई वगळता सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांसाठी जाहीर करणाऱ्या राज्य सरकारने त्याच वेळी समावेशक आरक्षणाचे धोरण

यदु जोशी , मुंबईविकास हक्क हस्तांतरणाचे (टीडीआर) धोरण मुंबई वगळता सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांसाठी जाहीर करणाऱ्या राज्य सरकारने त्याच वेळी समावेशक आरक्षणाचे धोरण (अ‍ॅकोमोडेशन रिझर्व्हेशन पॉलिसी) जाहीर का केले नाही, असा प्रश्न उपस्थित झाला असून, आधी अस्तित्वात असलेल्या नियमांचा आधार घेत, अनेक शहरांमध्ये बिल्डरांचं चांगभलं करण्यामागे काय उद्देश होता, असा सवाल केला जात आहे. राज्य सरकारने टीडीआर आणि अ‍ॅकोमोडेशन पॉलिसीबाबतचा प्रारूप आराखडा गेल्या वर्षी एकत्रितपणे जाहीर करीत, त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविल्या होत्या. एखाद्या जमिनीवर सार्वजनिक आरक्षण असेल, तर तेथे बांधकामाला अनुमती देताना विकासकाने वेगवेगळ्या आरक्षणात २० टक्के ते ३० टक्के बांधकाम हे स्थानिक स्वराज्य संस्था वा शासनाला मोफत करून द्यावे, असा नियम आहे. तथापि, नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या प्रारूप आराखड्यात ५० टक्के बांधकाम मोफत करून द्यावे लागेल, अशी अट टाकली. हा निर्णय होत नाही, तोवर आधीच्या २० टक्क्यांच्या नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेने मंजुरी देऊ नये, असे अपेक्षित होते. तथापि, अनेक शहरांमध्ये अस्तित्वात असलेल्या नियमानुसार, २० टक्के मोफत बांधकामाची परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. उद्या ५० टक्के मोफत बांधकामाची अट लागू झाली, तर आपल्याला नुकसान सहन करावे लागेल, हे लक्षात घेऊन विकासकांनी परवानग्या मिळवून घेतल्या. आता ५० टक्क्यांच्या अटीचा समावेश असलेली अ‍ॅकोमोडेशन पॉलिसी जाहीर करण्याचे टाळत आहे. मात्र, २० टक्क्यांच्या नियमाचा लाभ प्रारूप आराखडा जाहीर केल्यानंतरही विकासकांना का देण्यात आला, ५० टक्क्यांचा अंतिम निर्णय होईपर्यंत २० टक्क्यांची परवानगी देताच येणार नाही, अशी सक्त भूमिका नगरविकास विभागाकडून महापालिका आणि नगरपालिकांना का कळविण्यात आली नाही, टीडीआरबरोबरच अ‍ॅकोमोडेशन पॉलिसी जाहीर का करण्यात आली नाही, असे प्रश्न यातून निर्माण झाले आहेत. प्रारूप आराखड्यातील नियम/अटी शासानाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच लागू होतील, अशी भूमिका प्रारूप आराखड्यातच घेण्यात आली होती. त्याचा फायदा विकासकांनी घेतला. उद्या ५० टक्क्यांचे धोरण जाहीर झाले, तरी त्याला कितपत प्रतिसाद मिळेल, या बाबत शंका घेतली जात आहे.