शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

...तरी आरक्षण लागू होणे कठीण!

By admin | Updated: December 24, 2014 02:18 IST

वटहुकुमाला उच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबर रोजी अंतरिम स्थगिती दिली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, न्यायालयाने ज्या दोषांवर व उणिवांवर बोट ठेवून स्थगिती दिली

अजित गोगटे, मुंबईमराठा समाजाला सरकारी नोक-या व शैक्षणिक प्रवेशांमध्ये १६ टक्के आरक्षण देणारा राज्यपालांनी ९ जुलै रोजी काढलेला वटहुकूम आणि त्या वटहुकुमाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधानसभेने मंगळवारी मंजूर केलेले विधेयक यात एका शब्दाचाही फरक नाही.वटहुकुमाला उच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबर रोजी अंतरिम स्थगिती दिली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, न्यायालयाने ज्या दोषांवर व उणिवांवर बोट ठेवून स्थगिती दिली आहे, त्या दूर करून विधिमंडळात कायदा केला जाईल, असे सांगितले होते. यासाठी एक समिती नेमण्याचीही त्यांनी घोषणा केली होती. परंतु विधानसभेने मंगळवारी मंजूर केलेले विधेयक शब्दश: वटहुकुमाबरहुकूम असल्याने मुख्यमंत्र्यांनी केलेले हे वक्तव्य त्यात प्रतिबिंबित झाल्याचे कुठेही दिसत नाही. त्यामुळे हा कायदाही वटहुकुमाप्रमाणेच, पुन्हा त्याच मुद्द्यांवर न्यायालयाच्या कचाट्यात सापडेल, असे तज्ज्ञांना वाटते.न्यायालयाने या आरक्षणाला प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर स्थगिती दिली होती. एक, मराठा समाज शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास आहे, याच पुष्टी देणारी कोणतीही विश्वासार्ह आकडेवारी सरकार सादर करू शकली नाही. दोन, या समाजास सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक प्रवेशांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही म्हणून त्यास आरक्षण देणे आवश्यक आहे, यासही सरकार सबळ आधार दाखवू शकली नाही. तीन, एकूण आरक्षण ५० टक्क्यांहून जास्त असता कामा नये, असा सर्वोच्च न्यायालयातचा दंडक आहे. पण या आरक्षणाने राज्यातील एकूण आरक्षण ६८ टक्क्यांवर पोहोचते. वटहुकुमाऐवजी कायदा करताना यापैकी एकाही मुद्द्याचे ठामपणे निराकरण होईल, असे आणखी काही सरकारने केलेले दिसत नाही.मुख्य म्हणजे न्यायालयाने केवळ वटहुकुमालाच नव्हे तर मराठा समाजाचा शैक्षणिक व सामाजिकदृषट्या मागास प्रवर्गात समावेश करणाऱ्या सरकारच्या १५ जुलैच्या शासन निर्णयासही (जीआर) स्थगिती दिली आहे. त्यामुळे वटहुकुमाची जागा कायद्याने घेतली तरी या ‘जीआर’वरील न्यायालयीन स्थगिती जोपर्यंत कायम राहील तोपर्यंत मराठा समाजास आरक्षण लागू होणार नाही.न्यायालयात ५ जानेवारी रोजी पुढील सुनावणी व्हायची आहे. पण ज्याला आव्हान दिले तो वटहुकुमच, मुदत संपल्याने, त्यावेळी अस्तित्वात नसेल त्यामुळे याचिकाकर्त्यांना, वटहुकुमाची जागा घेणाऱ्या कायद्यास आव्हान देणाऱ्या याचिका नव्याने कराव्या लागतील. अशा परिस्थितीत न्यायालयाने २५ जुलैच्या ‘जीआर’ला दिलेली स्थगिती, नवा कायदा झाल्यावरही कायम राहू शकते. तसे झाले तर मराठा समाजास आरक्षण देणाऱ्या कायद्यास स्थगिती नाही, पण त्या समाजाचा मागास प्रवर्गात समावेश करणारा ‘जीआर’ मात्र लागू नाही, असे होईल. म्हणजेच कायदा झाला तरी मराठा समाजास आरक्षण मिळणार नाही.