शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
5
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
6
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
7
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
8
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
9
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
10
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
11
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
12
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
13
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
14
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
15
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
16
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
17
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
18
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
19
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
20
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   

...तरी आरक्षण लागू होणे कठीण!

By admin | Updated: December 24, 2014 02:18 IST

वटहुकुमाला उच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबर रोजी अंतरिम स्थगिती दिली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, न्यायालयाने ज्या दोषांवर व उणिवांवर बोट ठेवून स्थगिती दिली

अजित गोगटे, मुंबईमराठा समाजाला सरकारी नोक-या व शैक्षणिक प्रवेशांमध्ये १६ टक्के आरक्षण देणारा राज्यपालांनी ९ जुलै रोजी काढलेला वटहुकूम आणि त्या वटहुकुमाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधानसभेने मंगळवारी मंजूर केलेले विधेयक यात एका शब्दाचाही फरक नाही.वटहुकुमाला उच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबर रोजी अंतरिम स्थगिती दिली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, न्यायालयाने ज्या दोषांवर व उणिवांवर बोट ठेवून स्थगिती दिली आहे, त्या दूर करून विधिमंडळात कायदा केला जाईल, असे सांगितले होते. यासाठी एक समिती नेमण्याचीही त्यांनी घोषणा केली होती. परंतु विधानसभेने मंगळवारी मंजूर केलेले विधेयक शब्दश: वटहुकुमाबरहुकूम असल्याने मुख्यमंत्र्यांनी केलेले हे वक्तव्य त्यात प्रतिबिंबित झाल्याचे कुठेही दिसत नाही. त्यामुळे हा कायदाही वटहुकुमाप्रमाणेच, पुन्हा त्याच मुद्द्यांवर न्यायालयाच्या कचाट्यात सापडेल, असे तज्ज्ञांना वाटते.न्यायालयाने या आरक्षणाला प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर स्थगिती दिली होती. एक, मराठा समाज शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास आहे, याच पुष्टी देणारी कोणतीही विश्वासार्ह आकडेवारी सरकार सादर करू शकली नाही. दोन, या समाजास सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक प्रवेशांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही म्हणून त्यास आरक्षण देणे आवश्यक आहे, यासही सरकार सबळ आधार दाखवू शकली नाही. तीन, एकूण आरक्षण ५० टक्क्यांहून जास्त असता कामा नये, असा सर्वोच्च न्यायालयातचा दंडक आहे. पण या आरक्षणाने राज्यातील एकूण आरक्षण ६८ टक्क्यांवर पोहोचते. वटहुकुमाऐवजी कायदा करताना यापैकी एकाही मुद्द्याचे ठामपणे निराकरण होईल, असे आणखी काही सरकारने केलेले दिसत नाही.मुख्य म्हणजे न्यायालयाने केवळ वटहुकुमालाच नव्हे तर मराठा समाजाचा शैक्षणिक व सामाजिकदृषट्या मागास प्रवर्गात समावेश करणाऱ्या सरकारच्या १५ जुलैच्या शासन निर्णयासही (जीआर) स्थगिती दिली आहे. त्यामुळे वटहुकुमाची जागा कायद्याने घेतली तरी या ‘जीआर’वरील न्यायालयीन स्थगिती जोपर्यंत कायम राहील तोपर्यंत मराठा समाजास आरक्षण लागू होणार नाही.न्यायालयात ५ जानेवारी रोजी पुढील सुनावणी व्हायची आहे. पण ज्याला आव्हान दिले तो वटहुकुमच, मुदत संपल्याने, त्यावेळी अस्तित्वात नसेल त्यामुळे याचिकाकर्त्यांना, वटहुकुमाची जागा घेणाऱ्या कायद्यास आव्हान देणाऱ्या याचिका नव्याने कराव्या लागतील. अशा परिस्थितीत न्यायालयाने २५ जुलैच्या ‘जीआर’ला दिलेली स्थगिती, नवा कायदा झाल्यावरही कायम राहू शकते. तसे झाले तर मराठा समाजास आरक्षण देणाऱ्या कायद्यास स्थगिती नाही, पण त्या समाजाचा मागास प्रवर्गात समावेश करणारा ‘जीआर’ मात्र लागू नाही, असे होईल. म्हणजेच कायदा झाला तरी मराठा समाजास आरक्षण मिळणार नाही.