शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

साथीच्या आजाराने रहिवासी त्रस्त

By admin | Updated: April 3, 2017 03:02 IST

शहरातील नाल्यांची वर्षांतून किमान दोन वेळा सफाई करणे गरजेचे आहे

मुंबई : शहरातील नाल्यांची वर्षांतून किमान दोन वेळा सफाई करणे गरजेचे आहे. मात्र, पालिका केवळ पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई करत असल्याने, मुंबईत अनेक ठिकाणी नाले पूर्णपणे तुंबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चेंबूरचा चरई नालादेखील अशाच प्रकारे घाणीने पूर्णपणे तुंबला आहे. परिणामी, नाल्यातील या घाणीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, परिसरात साथीच्या आजारानेदेखील थैमान घातल्याने, रहिवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.चेंबूरच्या तीन तलवापासून सुरू होणारा हा नाला साठेनगर, कोकणनगर आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथून पुढे खाडीला मिळतो. या नाल्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्याने या ठिकाणी नेहमीच मोठी दुर्गंधी असते. त्यामुळे वर्षातून दोन ते तीन वेळा या ठिकाणी नालेसफाई होणे गरजेचे आहे. मात्र, पालिका केवळ पावसाळ्यापूर्वीच इथे नाले सफाई करत असल्याने, सध्या हा नाला पूर्णपणे कचऱ्याने तुंबला आहे. परिणामी, परिसरात दुर्गंधीसह डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सध्या इथे साथीचे आजार पसरले आहेत. याशिवाय नाल्याच्या दोन्ही बाजूला लोकवस्ती असल्याने, अनेक रहिवाशांची घरे ही नाल्यासमोरच आहेत. त्यामुळे नाल्यातील घाण घरात पसरत आहे, असे रहिवासी मनोहर वाघमारे यांनी सांगितले.अनेक वर्षांपासून रहिवाशांना या घाणीचा मनस्ताप होत आहे. या प्रकरणी रहिवाशांनी येथील भाजपाच्या स्थानिक नगरसेवकाकडे अनेकदा तक्रारी दिल्या आहेत. मात्र, नगरसेवक आपल्या या समस्यांना केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे, तसेच पालिकेकडेही रहिवाशांनी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने, येथील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. याबाबत एम/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त हर्षद काळे यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अनेकदा संपर्क करूनदेखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)