शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

साथीच्या आजाराने रहिवासी त्रस्त

By admin | Updated: April 3, 2017 03:02 IST

शहरातील नाल्यांची वर्षांतून किमान दोन वेळा सफाई करणे गरजेचे आहे

मुंबई : शहरातील नाल्यांची वर्षांतून किमान दोन वेळा सफाई करणे गरजेचे आहे. मात्र, पालिका केवळ पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई करत असल्याने, मुंबईत अनेक ठिकाणी नाले पूर्णपणे तुंबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चेंबूरचा चरई नालादेखील अशाच प्रकारे घाणीने पूर्णपणे तुंबला आहे. परिणामी, नाल्यातील या घाणीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, परिसरात साथीच्या आजारानेदेखील थैमान घातल्याने, रहिवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.चेंबूरच्या तीन तलवापासून सुरू होणारा हा नाला साठेनगर, कोकणनगर आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथून पुढे खाडीला मिळतो. या नाल्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्याने या ठिकाणी नेहमीच मोठी दुर्गंधी असते. त्यामुळे वर्षातून दोन ते तीन वेळा या ठिकाणी नालेसफाई होणे गरजेचे आहे. मात्र, पालिका केवळ पावसाळ्यापूर्वीच इथे नाले सफाई करत असल्याने, सध्या हा नाला पूर्णपणे कचऱ्याने तुंबला आहे. परिणामी, परिसरात दुर्गंधीसह डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सध्या इथे साथीचे आजार पसरले आहेत. याशिवाय नाल्याच्या दोन्ही बाजूला लोकवस्ती असल्याने, अनेक रहिवाशांची घरे ही नाल्यासमोरच आहेत. त्यामुळे नाल्यातील घाण घरात पसरत आहे, असे रहिवासी मनोहर वाघमारे यांनी सांगितले.अनेक वर्षांपासून रहिवाशांना या घाणीचा मनस्ताप होत आहे. या प्रकरणी रहिवाशांनी येथील भाजपाच्या स्थानिक नगरसेवकाकडे अनेकदा तक्रारी दिल्या आहेत. मात्र, नगरसेवक आपल्या या समस्यांना केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे, तसेच पालिकेकडेही रहिवाशांनी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने, येथील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. याबाबत एम/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त हर्षद काळे यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अनेकदा संपर्क करूनदेखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)