शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

साथीच्या आजाराने रहिवासी त्रस्त

By admin | Updated: April 3, 2017 03:02 IST

शहरातील नाल्यांची वर्षांतून किमान दोन वेळा सफाई करणे गरजेचे आहे

मुंबई : शहरातील नाल्यांची वर्षांतून किमान दोन वेळा सफाई करणे गरजेचे आहे. मात्र, पालिका केवळ पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई करत असल्याने, मुंबईत अनेक ठिकाणी नाले पूर्णपणे तुंबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चेंबूरचा चरई नालादेखील अशाच प्रकारे घाणीने पूर्णपणे तुंबला आहे. परिणामी, नाल्यातील या घाणीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, परिसरात साथीच्या आजारानेदेखील थैमान घातल्याने, रहिवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.चेंबूरच्या तीन तलवापासून सुरू होणारा हा नाला साठेनगर, कोकणनगर आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथून पुढे खाडीला मिळतो. या नाल्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्याने या ठिकाणी नेहमीच मोठी दुर्गंधी असते. त्यामुळे वर्षातून दोन ते तीन वेळा या ठिकाणी नालेसफाई होणे गरजेचे आहे. मात्र, पालिका केवळ पावसाळ्यापूर्वीच इथे नाले सफाई करत असल्याने, सध्या हा नाला पूर्णपणे कचऱ्याने तुंबला आहे. परिणामी, परिसरात दुर्गंधीसह डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सध्या इथे साथीचे आजार पसरले आहेत. याशिवाय नाल्याच्या दोन्ही बाजूला लोकवस्ती असल्याने, अनेक रहिवाशांची घरे ही नाल्यासमोरच आहेत. त्यामुळे नाल्यातील घाण घरात पसरत आहे, असे रहिवासी मनोहर वाघमारे यांनी सांगितले.अनेक वर्षांपासून रहिवाशांना या घाणीचा मनस्ताप होत आहे. या प्रकरणी रहिवाशांनी येथील भाजपाच्या स्थानिक नगरसेवकाकडे अनेकदा तक्रारी दिल्या आहेत. मात्र, नगरसेवक आपल्या या समस्यांना केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे, तसेच पालिकेकडेही रहिवाशांनी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने, येथील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. याबाबत एम/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त हर्षद काळे यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अनेकदा संपर्क करूनदेखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)