शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या आजाराने रहिवासी त्रस्त

By admin | Updated: April 3, 2017 03:02 IST

शहरातील नाल्यांची वर्षांतून किमान दोन वेळा सफाई करणे गरजेचे आहे

मुंबई : शहरातील नाल्यांची वर्षांतून किमान दोन वेळा सफाई करणे गरजेचे आहे. मात्र, पालिका केवळ पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई करत असल्याने, मुंबईत अनेक ठिकाणी नाले पूर्णपणे तुंबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चेंबूरचा चरई नालादेखील अशाच प्रकारे घाणीने पूर्णपणे तुंबला आहे. परिणामी, नाल्यातील या घाणीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, परिसरात साथीच्या आजारानेदेखील थैमान घातल्याने, रहिवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.चेंबूरच्या तीन तलवापासून सुरू होणारा हा नाला साठेनगर, कोकणनगर आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथून पुढे खाडीला मिळतो. या नाल्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्याने या ठिकाणी नेहमीच मोठी दुर्गंधी असते. त्यामुळे वर्षातून दोन ते तीन वेळा या ठिकाणी नालेसफाई होणे गरजेचे आहे. मात्र, पालिका केवळ पावसाळ्यापूर्वीच इथे नाले सफाई करत असल्याने, सध्या हा नाला पूर्णपणे कचऱ्याने तुंबला आहे. परिणामी, परिसरात दुर्गंधीसह डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सध्या इथे साथीचे आजार पसरले आहेत. याशिवाय नाल्याच्या दोन्ही बाजूला लोकवस्ती असल्याने, अनेक रहिवाशांची घरे ही नाल्यासमोरच आहेत. त्यामुळे नाल्यातील घाण घरात पसरत आहे, असे रहिवासी मनोहर वाघमारे यांनी सांगितले.अनेक वर्षांपासून रहिवाशांना या घाणीचा मनस्ताप होत आहे. या प्रकरणी रहिवाशांनी येथील भाजपाच्या स्थानिक नगरसेवकाकडे अनेकदा तक्रारी दिल्या आहेत. मात्र, नगरसेवक आपल्या या समस्यांना केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे, तसेच पालिकेकडेही रहिवाशांनी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने, येथील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. याबाबत एम/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त हर्षद काळे यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अनेकदा संपर्क करूनदेखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)