शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जैन आगमांवरील संशोधन दिशादर्शक

By admin | Updated: May 9, 2016 03:44 IST

‘भगवती सूत्र’ या प्राचीन ग्रंथासह इतर जैन आगमांमध्ये नमूद केलेल्या विविध तथ्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन करून जगापुढे मांडण्याचा जैन आचार्यांनी हाती

मुंबई : ‘भगवती सूत्र’ या प्राचीन ग्रंथासह इतर जैन आगमांमध्ये नमूद केलेल्या विविध तथ्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन करून जगापुढे मांडण्याचा जैन आचार्यांनी हाती घेतलेला उपक्रम मानवजातीला दिशादर्शक ठरेल, असे सांगत हे ज्ञान जनसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचावे, अशी अपेक्षा राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.‘भगवती सूत्र’ या प्राचीन आगमासंदर्भात ‘जैन तत्त्वज्ञान आणि विज्ञान’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत रविवारी दादर येथील योगी हॉलमध्ये झाले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुनी नम्रमुनी, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.के. तातेड, जैन विश्वभारतीचे अशोक कोठारी या मान्यवरांच्या उपस्थितीत भगवती सूत्र या पुरातन ग्रंथाच्या पाचव्या खंडाचा हिंदी अनुवाद प्रकाशित करण्यात आला.विद्यासागर राव म्हणाले, पारंपरिक शिक्षण व आध्यात्मिक शिक्षण यांची सांगड घालण्याची गरज आहे. असे केल्यास त्यातून चारित्र्य संपन्न समाज निर्माण होईल. महात्मा गांधींवर अहिंसा, अनेकांत व अपरिग्रहाच्या तत्त्वज्ञानाचा मोठा पगडा होता याचा उल्लेख करून गांधीजींनी भगवान महावीरांची शिकवण राजकीय व सामाजिक स्तरावर आचरणात आणली.जैन आगम संशोधन प्रकल्प सुरू केल्याबद्दल राज्यपालांनी दिवंगत आचार्य तुलसी व आचार्य महाप्रज्ञ, सध्याचे आचार्य महाश्रमण तसेच प्रकल्पाचे मार्गदर्शक मुनी महेंद्रकुमार यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. जैन समाजातील युवकांनी हुंडा व व्यसनमुक्ती या अनिष्ट प्रथांविरुद्ध तसेच पर्यावरण संरक्षण यासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)