शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

पालकमंत्री कांबळे यांच्या निषेधार्थ पत्रकारांचे निवेदन

By admin | Updated: May 28, 2017 17:28 IST

पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे शेतकरी शिवार संवाद कार्यक्रमात पत्रकारांबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या घटनेचा निषेध

ऑनलाइन लोकमत

हिंगोली, दि. 28 - पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे शेतकरी शिवार संवाद कार्यक्रमात पत्रकारांबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत रविवारी जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले की, 27 मे रोजी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी शिवार संवाद कार्यक्रमात माळहिवरा येथे पत्रकार व प्रसिद्धी माध्यमांच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीवर भाष्य केले. पत्रकार बांडगुळ आहेत. पाकिट दिले त्याचे असतात, मी कोणाला घाबरत नाही. एखाद्याला बुटाने मारेल, असे बेताल व चिथावणीखोर वक्तव्य केले. यामुळे पत्रकारांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करा. त्यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास यापुढील भाजपच्या व मुख्यमंत्र्यांच्या आगामी दौऱ्याच्या वार्तांकनावरही बहिष्काराचा इशारा दिला. निवेदनावर तुकाराम झाडे, वसंत भट्ट, नंदकिशोर तोष्णीवाल, प्रद्युम्न गिरीकर, योगेश पाटील, कल्याण देशमुख, कन्हैय्या खंडेलवाल, बालाजी पाठक, डॉ. विजय निलावार, संजय कुलकर्णी, मंगेश शेवाळकर, कैलास खिल्लारे, प्रकाश इंगोले, विजय पाटील, दिलीप हाळदे, नंदू कांबळे, शिवाजी जामुंदे, नारायण घ्यार, गजानन वाणी, मो.एजाज नाईक, विलास जोशी, अरुण चव्हाण, गजानन नाईक, शे. इलियास, नारायण काळे, शे.वाजेद, मुजिब पठाण, चंद्रकांत वैद्य, राजकुमार देशमुख, बी.आर. नायक, विठ्ठल देशमुख, अमोल नायक, दिलीप कावरखे, गजानन हमाने, विश्वनाथ देशमुख, गजानन वाखरकर, संतोष भिसे, दयाशिल इंगोले आदींच्या सह्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांना निवेदन दिले. पालकमंत्र्यांनी दौरा गुंडाळलाशेतकरी शिवार संवाद कार्यक्रमात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने पालकमंत्री दिलीप कांबळे दौरा अर्ध्यावर सोडून गेले ते परतलेच नाहीत. सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे तर शेतीमालाला भाव नाही मिळाला की शेतकरी ओरडतात, असे म्हणाल्याने शेतकरी अंगावर जात असल्याने त्यांना पळता भूई थोडी झाली. तर त्याच दिवशी हिंगोलीच्या मोंढ्यात भेट दिल्यावर त्यांनी शेतकऱ्यांचे काहीच ऐकले नसल्याने माध्यमांनीही टीका केली. त्यामुळे वड्याचे तेल वांग्यावर काढत त्यांनी पत्रकारांनाच बुटाने मारण्याची भाषा वापरली अन् नागपूरला निघून गेले. त्यानंतर हिंगोलीला परतणार असे सांगितले जाते होते. मात्र ते तिकडेच पसार झाले.