शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

पालकमंत्री कांबळे यांच्या निषेधार्थ पत्रकारांचे निवेदन

By admin | Updated: May 28, 2017 17:28 IST

पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे शेतकरी शिवार संवाद कार्यक्रमात पत्रकारांबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या घटनेचा निषेध

ऑनलाइन लोकमत

हिंगोली, दि. 28 - पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे शेतकरी शिवार संवाद कार्यक्रमात पत्रकारांबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत रविवारी जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले की, 27 मे रोजी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी शिवार संवाद कार्यक्रमात माळहिवरा येथे पत्रकार व प्रसिद्धी माध्यमांच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीवर भाष्य केले. पत्रकार बांडगुळ आहेत. पाकिट दिले त्याचे असतात, मी कोणाला घाबरत नाही. एखाद्याला बुटाने मारेल, असे बेताल व चिथावणीखोर वक्तव्य केले. यामुळे पत्रकारांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करा. त्यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास यापुढील भाजपच्या व मुख्यमंत्र्यांच्या आगामी दौऱ्याच्या वार्तांकनावरही बहिष्काराचा इशारा दिला. निवेदनावर तुकाराम झाडे, वसंत भट्ट, नंदकिशोर तोष्णीवाल, प्रद्युम्न गिरीकर, योगेश पाटील, कल्याण देशमुख, कन्हैय्या खंडेलवाल, बालाजी पाठक, डॉ. विजय निलावार, संजय कुलकर्णी, मंगेश शेवाळकर, कैलास खिल्लारे, प्रकाश इंगोले, विजय पाटील, दिलीप हाळदे, नंदू कांबळे, शिवाजी जामुंदे, नारायण घ्यार, गजानन वाणी, मो.एजाज नाईक, विलास जोशी, अरुण चव्हाण, गजानन नाईक, शे. इलियास, नारायण काळे, शे.वाजेद, मुजिब पठाण, चंद्रकांत वैद्य, राजकुमार देशमुख, बी.आर. नायक, विठ्ठल देशमुख, अमोल नायक, दिलीप कावरखे, गजानन हमाने, विश्वनाथ देशमुख, गजानन वाखरकर, संतोष भिसे, दयाशिल इंगोले आदींच्या सह्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांना निवेदन दिले. पालकमंत्र्यांनी दौरा गुंडाळलाशेतकरी शिवार संवाद कार्यक्रमात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने पालकमंत्री दिलीप कांबळे दौरा अर्ध्यावर सोडून गेले ते परतलेच नाहीत. सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे तर शेतीमालाला भाव नाही मिळाला की शेतकरी ओरडतात, असे म्हणाल्याने शेतकरी अंगावर जात असल्याने त्यांना पळता भूई थोडी झाली. तर त्याच दिवशी हिंगोलीच्या मोंढ्यात भेट दिल्यावर त्यांनी शेतकऱ्यांचे काहीच ऐकले नसल्याने माध्यमांनीही टीका केली. त्यामुळे वड्याचे तेल वांग्यावर काढत त्यांनी पत्रकारांनाच बुटाने मारण्याची भाषा वापरली अन् नागपूरला निघून गेले. त्यानंतर हिंगोलीला परतणार असे सांगितले जाते होते. मात्र ते तिकडेच पसार झाले.