शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

‘इको सेन्सिटिव्ह’ गावांबाबत गुरुवारपर्यंत हरकती नोंदवा

By admin | Updated: April 25, 2017 00:59 IST

पालकमंत्र्यांचे आवाहन : पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्रात समावेशीत गावांबाबत बैठक

कोल्हापूर : राज्यातील पश्चिम घाट क्षेत्रात परिसंवेदनशील क्षेत्रामध्ये (इको सेन्सिटिव्ह झोन) समाविष्ट असलेल्या गावांसह त्यावर उपजीविका अवलंबून असलेल्या गावांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे या विषयावर गुरुवार (दि. २७) पर्यंत हरकती व सूचनांचे ठराव सादर करावेत, त्याचा पाठपुरावा केला जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.शासकीय विश्रामगृह येथे पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्रात समावेशीत गावांबाबत बैठक झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार संध्यादेवी कुपेकर, जि. प. बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील-पेरिडकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, वन्यजीव विभागीय वन्य अधिकारी सीताराम झुरे, वनविभागाचे पी. पी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्ह्यातील १८४ गावे डॉ. कस्तुरीरंगन समितीच्या शिफारसीनुसार समाविष्ट आहेत. इको सेन्सेटिव्ह झोनची प्रारूप अधिसूचना केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने जारी केली आहे. शेती व शेती संलग्न व्यवसायावर बहुतांश गावांची उपजीविका अवलंबून असल्याने अनेक गावांचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेशासाठी विरोध आहे. त्यामुळे या विषयावर गुरुवारपर्यंत हरकती सादर करणे आवश्यक असल्याने यथोचित कारणांसह वेळेत हरकती व सूचनांचे ठराव सादर करावेत, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये राधानगरी या तालुक्याच्या ठिकाणासह अन्य महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे. त्यामुळे सर्व समावेशीत गावांचा फेर सर्व्हे करून जी गावे वगळणे आवश्यक आहे. ती गावे कोणत्या कारणांसाठी वगळावीत याबाबतची मागणी केंद्र सरकारकडे सादर करून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असेही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.