शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

मारहाण प्रकरणाचा अहवाल २९ मार्चला द्या

By admin | Updated: March 26, 2017 02:55 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील घाटशेंद्रा येथील शेतकरी रामेश्वर हरीभाऊ भुसारे यांना मंत्रालयातील पोलिसांकडून झालेल्या

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील घाटशेंद्रा येथील शेतकरी रामेश्वर हरीभाऊ भुसारे यांना मंत्रालयातील पोलिसांकडून झालेल्या मारहणीची संपूर्ण चौकशी करावी तसेच संपूर्ण घटनाक्रमाचा अहवाल सभागृहात सादर करावा, असे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शनिवारी सरकारला दिले. २९ मार्च रोजी हा चौकशी अहवाल विधान परिषद सभागृहात सादर करण्याची सूचनाही सभापतींनी दिली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर तब्बल तीन आठवडे विधान परिषदेचे कामकाज ठप्प आहे. तर शेतकरी रामेश्वर भुसारे यांना पोलिसांकडून मारहाण झाली. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांच्या हातात या घटनेमुळे आयते कोलित मिळाले आणि त्याचे तीव्र पडसाद शनिवारी सभागृहात उमटले. शेतकरी कर्जमाफी आणि मारहाण प्रकरणावर विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असताना सरकार दिलासा देणारे निर्णय घेत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी केला. तर काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनीही तटकरे यांच्या मागणीला पाठिंबा दिला. मारहाण झालेला शेतकरी सदाभाऊ खोत यांच्याकडे गेला होता पण त्यांनी हात झटकले. परंतु, त्यानंतर पोलिसांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे घेऊन जातो असे सांगत त्याला मारहाण केली. पोलिसांनी या शेतकऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केला, असा आरोप रणपिसे यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी कामकाज सल्लागार समितीत कर्जमाफीबद्दल दिलेला शब्द पाळला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. विधानकार्य मंत्री गिरीश बापट यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली. सरकार याबाबत गंभीर आहे. यात पक्षीय राजकारण करू नये, असे सांगत समिती नेमली असून, ती अहवाल देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)गदारोळातच लेखानुदान मंजूरशेतकरी मारहाणप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर सभापतींनी पुढील कामकाज पुकारले. अर्थसंकल्पावरील चर्चा पूर्ण झाल्याचे जाहीर करत लेखानुदान विधेयक मांडण्याची सूचना अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केली. कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. या गदारोळातच लेखानुदान मंजूर करण्यात आले. गदारोळ सुरूच राहिल्याने सभापतींनी दिवसभराचे कामकाज तहकूब करण्याची घोषणा केली. तत्पूर्वी याच मुद्द्यावर एक तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते.