शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

महापालिकेवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By admin | Updated: April 12, 2016 03:08 IST

देवनार डम्पिंग ग्राउंडला वारंवार लागणाऱ्या आगीस जबाबदार असणाऱ्या मुंबई महापालिकेवर ताबडतोब सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी विधान परिषदेत

मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडला वारंवार लागणाऱ्या आगीस जबाबदार असणाऱ्या मुंबई महापालिकेवर ताबडतोब सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी विधान परिषदेत विरोधकांनी केली, तसेच कचरा उचलण्यासाठी मागील १५ वर्षांत देण्यात आलेल्या कंत्राटांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही केली. सोमवारी विरोधी सदस्यांनी नियम २६० अन्वये देवनार येथील आगीच्या घटना, तसेच डम्पिंग ग्राउंडमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत प्रस्ताव मांडला होता. या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान सर्वच विरोधी सदस्यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीच्या कारभाराचे वाभाडे काढले. चर्चेला सुरुवात करताना राष्ट्रवादी सदस्य किरण पावसकर म्हणाले की, ‘रोज ९ ते १० हजार मेट्रिक टन कचरा टाकला जात असल्याचे महापालिकेकडून दाखविण्यात येते. प्रत्यक्षात मात्र, केवळ ६ ते ७ हजार मेट्रिक टन कचरा टाकला जातो. त्यामुळे प्रतिटन २५० ते ४०० रुपये प्रमाणे कंत्राटदाराला जास्तीचे ९ लाख मिळतात. हा वरचा पैसा कुठे जातो, याचा शोध घ्यायला हवा. कंत्राटदारांवर कारवाई करण्यास अपयशी ठरलेल्या पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी पावसकर यांनी या वेळी केली. पालिकेने विविध बँक खात्यात ४० हजाराच्या ठेवी ठेवल्या आहेत. २०१५-१६ या वर्षात डम्पिंग ग्राउंडसाठी ४१७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यापैकी केवळ २० टक्के रक्कम खर्च करण्यात आली. देवनार येथील आग विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला गेला. आयआयटी पवईने दिलेल्या अहवालानुसार, देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याखाली १२७ लाख मेट्रिक टन मिथेन वायू अडकला आहे. त्यामुळे मोठा धोका निर्माण होणार असल्याचे पावसकर यांनी सांगितले. या वेळी जनार्दन चांदूरकर, राहुल नार्वेकर, विद्या चव्हाण, जयंत पाटील, प्रकाश बिनसाळे, हेमंत टकले आदी सदस्यांनीही आपली मते मांडली. (विशेष प्रतिनिधी)तेव्हा का नाही कारवाई?शिवसेना सदस्या नीलम गोऱ्हे यांनी महापालिकेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. गेली १५ वर्षे राज्यात आघाडी सरकारचे राज्य होते. मग काळात मुख्यमंत्री पदावर असणारे विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे काही शिवसैनिक नव्हते. मग त्यांना पालिकेवर कारवाई का करता आली नाही, असा प्रश्न करत विरोधक राजकारण करत असल्याचा दावा केला.