शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

महापालिकेवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By admin | Updated: April 12, 2016 03:08 IST

देवनार डम्पिंग ग्राउंडला वारंवार लागणाऱ्या आगीस जबाबदार असणाऱ्या मुंबई महापालिकेवर ताबडतोब सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी विधान परिषदेत

मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडला वारंवार लागणाऱ्या आगीस जबाबदार असणाऱ्या मुंबई महापालिकेवर ताबडतोब सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी विधान परिषदेत विरोधकांनी केली, तसेच कचरा उचलण्यासाठी मागील १५ वर्षांत देण्यात आलेल्या कंत्राटांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही केली. सोमवारी विरोधी सदस्यांनी नियम २६० अन्वये देवनार येथील आगीच्या घटना, तसेच डम्पिंग ग्राउंडमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत प्रस्ताव मांडला होता. या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान सर्वच विरोधी सदस्यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीच्या कारभाराचे वाभाडे काढले. चर्चेला सुरुवात करताना राष्ट्रवादी सदस्य किरण पावसकर म्हणाले की, ‘रोज ९ ते १० हजार मेट्रिक टन कचरा टाकला जात असल्याचे महापालिकेकडून दाखविण्यात येते. प्रत्यक्षात मात्र, केवळ ६ ते ७ हजार मेट्रिक टन कचरा टाकला जातो. त्यामुळे प्रतिटन २५० ते ४०० रुपये प्रमाणे कंत्राटदाराला जास्तीचे ९ लाख मिळतात. हा वरचा पैसा कुठे जातो, याचा शोध घ्यायला हवा. कंत्राटदारांवर कारवाई करण्यास अपयशी ठरलेल्या पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी पावसकर यांनी या वेळी केली. पालिकेने विविध बँक खात्यात ४० हजाराच्या ठेवी ठेवल्या आहेत. २०१५-१६ या वर्षात डम्पिंग ग्राउंडसाठी ४१७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यापैकी केवळ २० टक्के रक्कम खर्च करण्यात आली. देवनार येथील आग विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला गेला. आयआयटी पवईने दिलेल्या अहवालानुसार, देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याखाली १२७ लाख मेट्रिक टन मिथेन वायू अडकला आहे. त्यामुळे मोठा धोका निर्माण होणार असल्याचे पावसकर यांनी सांगितले. या वेळी जनार्दन चांदूरकर, राहुल नार्वेकर, विद्या चव्हाण, जयंत पाटील, प्रकाश बिनसाळे, हेमंत टकले आदी सदस्यांनीही आपली मते मांडली. (विशेष प्रतिनिधी)तेव्हा का नाही कारवाई?शिवसेना सदस्या नीलम गोऱ्हे यांनी महापालिकेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. गेली १५ वर्षे राज्यात आघाडी सरकारचे राज्य होते. मग काळात मुख्यमंत्री पदावर असणारे विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे काही शिवसैनिक नव्हते. मग त्यांना पालिकेवर कारवाई का करता आली नाही, असा प्रश्न करत विरोधक राजकारण करत असल्याचा दावा केला.