शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढणार

By admin | Updated: December 13, 2014 02:31 IST

राज्य शासनाकडून अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे. यासंदर्भात माणिकराव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

नागपूर : राज्य शासनाकडून अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे. यासंदर्भात माणिकराव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.
राज्याची सध्याची आर्थिक स्थिती, स्वीकृत दायित्वे, भविष्यातील वाटचाल आणि खर्चात पारदर्शकता आणण्यासाठी उपाययोजना विषद करणारी श्वेतपत्रिका शासनाकडून काढण्यात येईल असे विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनादरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये घोषित करण्यात आले होते. ही श्वेतपत्रिका कधी काढायची हे स्पष्ट नसले तरी यासंदर्भात माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू आहे असे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
अंगणवाडी सेविकांची साडेतीन हजार पदे रिक्त
राज्यात अंगणवाडी सेविकांची सुमारे साडेतीन हजार पदे रिक्त असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली. यासंदर्भात डॉ.सुधीर तांबे, विक्रम काळे, संजय दत्त व भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याच्या लेखी उत्तरादरम्यान महिला व बालविकास मंत्री पंकज मुंडे यांनी ही माहिती दिली.ऑगस्ट 2क्14 च्या मासिक प्रगती अहवालानुसार अंगणवाडी सेविकांची 2 हजार 25क् व मिनी अंगणवाडी सेविकांची 1 हजार 257 पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याबाबत वेळोवेळी आदेश देण्यात आले आहेत. भरतीप्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत.
 
ग्रामपंचायती ‘हायटेक’ करण्याची प्रक्रिया सुरू
राष्ट्रीय विकास योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामपंचायती ‘ब्रॉडबॅन्ड कनेक्टिव्हिटी’शी जोडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती राज्य शासनाने दिली. अब्दुल्लाखान दुर्राणी, अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तरात वरील माहिती दिली.
या योजनेअंतर्गत राज्यातील 28 हजार 6 ग्रामपंचायती जोडल्या जाणार आहेत. यासंदर्भात केंद्र, राज्य शासन आणि बीएसएनएलमध्ये सामंजस्य करार झाला आहे. पहिल्या टप्प्यात 11 हजार 52क् ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ‘ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले.
 
शिकारप्रकरणी राज्यात 
49 आरोपींना अटक
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात वाघ तसेच इतर वन्यप्राण्यांची शिकार करणा:या 49 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शोभाताई फडणवीस यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. 
यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती आहे. वाघ शिकारप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी गठित केलेल्या सूकाणू समितीच्या देखरेखीत चौकशी पथकाने तपास काम पूर्ण केले आहे. 9 वनगुन्ह्यांप्रकरणी राज्यातील 21 तर परराज्यातील 28 आरोपींना अटक करण्यात आली . यातील तीन गुन्हेगारांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठविण्यात आली.(प्रतिनिधी)