शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढणार

By admin | Updated: December 13, 2014 02:31 IST

राज्य शासनाकडून अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे. यासंदर्भात माणिकराव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

नागपूर : राज्य शासनाकडून अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे. यासंदर्भात माणिकराव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.
राज्याची सध्याची आर्थिक स्थिती, स्वीकृत दायित्वे, भविष्यातील वाटचाल आणि खर्चात पारदर्शकता आणण्यासाठी उपाययोजना विषद करणारी श्वेतपत्रिका शासनाकडून काढण्यात येईल असे विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनादरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये घोषित करण्यात आले होते. ही श्वेतपत्रिका कधी काढायची हे स्पष्ट नसले तरी यासंदर्भात माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू आहे असे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
अंगणवाडी सेविकांची साडेतीन हजार पदे रिक्त
राज्यात अंगणवाडी सेविकांची सुमारे साडेतीन हजार पदे रिक्त असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली. यासंदर्भात डॉ.सुधीर तांबे, विक्रम काळे, संजय दत्त व भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याच्या लेखी उत्तरादरम्यान महिला व बालविकास मंत्री पंकज मुंडे यांनी ही माहिती दिली.ऑगस्ट 2क्14 च्या मासिक प्रगती अहवालानुसार अंगणवाडी सेविकांची 2 हजार 25क् व मिनी अंगणवाडी सेविकांची 1 हजार 257 पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याबाबत वेळोवेळी आदेश देण्यात आले आहेत. भरतीप्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत.
 
ग्रामपंचायती ‘हायटेक’ करण्याची प्रक्रिया सुरू
राष्ट्रीय विकास योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामपंचायती ‘ब्रॉडबॅन्ड कनेक्टिव्हिटी’शी जोडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती राज्य शासनाने दिली. अब्दुल्लाखान दुर्राणी, अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तरात वरील माहिती दिली.
या योजनेअंतर्गत राज्यातील 28 हजार 6 ग्रामपंचायती जोडल्या जाणार आहेत. यासंदर्भात केंद्र, राज्य शासन आणि बीएसएनएलमध्ये सामंजस्य करार झाला आहे. पहिल्या टप्प्यात 11 हजार 52क् ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ‘ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले.
 
शिकारप्रकरणी राज्यात 
49 आरोपींना अटक
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात वाघ तसेच इतर वन्यप्राण्यांची शिकार करणा:या 49 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शोभाताई फडणवीस यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. 
यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती आहे. वाघ शिकारप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी गठित केलेल्या सूकाणू समितीच्या देखरेखीत चौकशी पथकाने तपास काम पूर्ण केले आहे. 9 वनगुन्ह्यांप्रकरणी राज्यातील 21 तर परराज्यातील 28 आरोपींना अटक करण्यात आली . यातील तीन गुन्हेगारांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठविण्यात आली.(प्रतिनिधी)