शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढणार

By admin | Updated: December 13, 2014 02:31 IST

राज्य शासनाकडून अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे. यासंदर्भात माणिकराव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

नागपूर : राज्य शासनाकडून अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे. यासंदर्भात माणिकराव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.
राज्याची सध्याची आर्थिक स्थिती, स्वीकृत दायित्वे, भविष्यातील वाटचाल आणि खर्चात पारदर्शकता आणण्यासाठी उपाययोजना विषद करणारी श्वेतपत्रिका शासनाकडून काढण्यात येईल असे विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनादरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये घोषित करण्यात आले होते. ही श्वेतपत्रिका कधी काढायची हे स्पष्ट नसले तरी यासंदर्भात माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू आहे असे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
अंगणवाडी सेविकांची साडेतीन हजार पदे रिक्त
राज्यात अंगणवाडी सेविकांची सुमारे साडेतीन हजार पदे रिक्त असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली. यासंदर्भात डॉ.सुधीर तांबे, विक्रम काळे, संजय दत्त व भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याच्या लेखी उत्तरादरम्यान महिला व बालविकास मंत्री पंकज मुंडे यांनी ही माहिती दिली.ऑगस्ट 2क्14 च्या मासिक प्रगती अहवालानुसार अंगणवाडी सेविकांची 2 हजार 25क् व मिनी अंगणवाडी सेविकांची 1 हजार 257 पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याबाबत वेळोवेळी आदेश देण्यात आले आहेत. भरतीप्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत.
 
ग्रामपंचायती ‘हायटेक’ करण्याची प्रक्रिया सुरू
राष्ट्रीय विकास योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामपंचायती ‘ब्रॉडबॅन्ड कनेक्टिव्हिटी’शी जोडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती राज्य शासनाने दिली. अब्दुल्लाखान दुर्राणी, अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तरात वरील माहिती दिली.
या योजनेअंतर्गत राज्यातील 28 हजार 6 ग्रामपंचायती जोडल्या जाणार आहेत. यासंदर्भात केंद्र, राज्य शासन आणि बीएसएनएलमध्ये सामंजस्य करार झाला आहे. पहिल्या टप्प्यात 11 हजार 52क् ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ‘ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले.
 
शिकारप्रकरणी राज्यात 
49 आरोपींना अटक
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात वाघ तसेच इतर वन्यप्राण्यांची शिकार करणा:या 49 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शोभाताई फडणवीस यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. 
यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती आहे. वाघ शिकारप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी गठित केलेल्या सूकाणू समितीच्या देखरेखीत चौकशी पथकाने तपास काम पूर्ण केले आहे. 9 वनगुन्ह्यांप्रकरणी राज्यातील 21 तर परराज्यातील 28 आरोपींना अटक करण्यात आली . यातील तीन गुन्हेगारांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठविण्यात आली.(प्रतिनिधी)