शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

विजेचा अनुशेष दूर करा

By admin | Updated: January 12, 2015 00:58 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील विजेचा अनुशेष व पायाभूत सुविधांमधील असमतोल दूर करावा, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आली आहे.

अन्याय : विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणीनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील विजेचा अनुशेष व पायाभूत सुविधांमधील असमतोल दूर करावा, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आली आहे.राज्यातील सर्वाधिक वीज विदर्भात तयार होते. यानंतरही विदर्भातील ग्रामीण भागात १८ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. पिकाला पाणी द्यायच्या वेळी वीज नसते. विजेच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीतही विदर्भावर अन्याय झाला आहे. ग्रामीण भागातील ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर दोन-तीन महिने दुरुस्ती केली जात नाही किंवा नवीन ट्रान्सफार्मर लावल्या जात नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. महावितरणतर्फे संरचना विकास योजनेंतर्गत २०१२-१३ ते २०१५-१६ वर्षासाठी ५५५६ कोटी रुपयांचा प्रकल्प खर्च आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी १८९८.९७, उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांसाठी १०७२.१४, तर मुंबई-ठाणेतील तीन जिल्ह्यांसाठी ७५२.८१ कोटी रुपयांचा वाटा निर्धारित करण्यात आला आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी केवळ ८७९ कोटी रुपये मिळणार आहेत.एकट्या बारामतीला ९५५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या आकडेवारीवरून विदर्भावरील अन्याय स्पष्ट होतो, असे समितीने स्पष्ट केले आहे. राज्याच्या वीजनिर्मितीमध्ये ५५ टक्के वाटा विदर्भाचा आहे. विदर्भात ५२६० मेगावॅट कोळसाधारित वीज तयार होत असून यापैकी किमान २२०० आणि कमाल ३००० मेगावॅट वीज विदर्भात वापरली जाते. ३००० मेगावॅट वीज इतर प्रदेशात निर्यात केली जाते. मुंबई, पुणे व नाशिकला कोणतेही भारनियमन न करता २६०० मेगावॅट वीज पुरविली जाते, अशी माहिती समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी कळविली आहे. (प्रतिनिधी)