शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

विजेचा अनुशेष दूर करा

By admin | Updated: January 12, 2015 00:58 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील विजेचा अनुशेष व पायाभूत सुविधांमधील असमतोल दूर करावा, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आली आहे.

अन्याय : विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणीनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील विजेचा अनुशेष व पायाभूत सुविधांमधील असमतोल दूर करावा, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आली आहे.राज्यातील सर्वाधिक वीज विदर्भात तयार होते. यानंतरही विदर्भातील ग्रामीण भागात १८ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. पिकाला पाणी द्यायच्या वेळी वीज नसते. विजेच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीतही विदर्भावर अन्याय झाला आहे. ग्रामीण भागातील ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर दोन-तीन महिने दुरुस्ती केली जात नाही किंवा नवीन ट्रान्सफार्मर लावल्या जात नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. महावितरणतर्फे संरचना विकास योजनेंतर्गत २०१२-१३ ते २०१५-१६ वर्षासाठी ५५५६ कोटी रुपयांचा प्रकल्प खर्च आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी १८९८.९७, उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांसाठी १०७२.१४, तर मुंबई-ठाणेतील तीन जिल्ह्यांसाठी ७५२.८१ कोटी रुपयांचा वाटा निर्धारित करण्यात आला आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी केवळ ८७९ कोटी रुपये मिळणार आहेत.एकट्या बारामतीला ९५५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या आकडेवारीवरून विदर्भावरील अन्याय स्पष्ट होतो, असे समितीने स्पष्ट केले आहे. राज्याच्या वीजनिर्मितीमध्ये ५५ टक्के वाटा विदर्भाचा आहे. विदर्भात ५२६० मेगावॅट कोळसाधारित वीज तयार होत असून यापैकी किमान २२०० आणि कमाल ३००० मेगावॅट वीज विदर्भात वापरली जाते. ३००० मेगावॅट वीज इतर प्रदेशात निर्यात केली जाते. मुंबई, पुणे व नाशिकला कोणतेही भारनियमन न करता २६०० मेगावॅट वीज पुरविली जाते, अशी माहिती समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी कळविली आहे. (प्रतिनिधी)