शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यात जीआर काढणे म्हणजे सांडाचे दूध काढण्याइतके कठीण - राजेंद्र सिंह

By admin | Updated: July 11, 2017 15:56 IST

राज्यात जीआर काढणे म्हणजे सांडाचे दूध काढण्याइतके कठीण काम असल्याचे मत तरुण भारत संघाचे अध्यक्ष आणि जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - राज्यात जीआर काढणे म्हणजे सांडाचे दूध काढण्याइतके कठीण काम असल्याचे मत तरुण भारत संघाचे अध्यक्ष आणि जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. लोकमत वॉटर समिट 2017 या कार्यक्रमात ते बोलत होते. 
यावेळी डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले की, राज्यातील छोट्या नद्या मरत आहेत. त्यामुळे त्यांच्या बचावासाठी समाजाला नद्यांशी जोडले जायला हवे. तसेच, नद्यांतील पाणी तलावात सोडले तर कितीही पूर आला तरी कोणतेही संकंट ओढावणार नाही. नद्यांच्या बाबतीत मध्यप्रदेश सरकारने  चांगले काम केले आहे.  महाराष्ट्रात नमामी चंद्रभागा यात्रा सुरु होणार असून जनतेने या यात्रेत मोठ्याप्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. याचबरोबर, त्यांनी सांगितले की, देशभर जलसाक्षरता यात्राही आम्ही राबवत आहोत. जलसाक्षरता हे अतिशय महत्त्वाचे काम आहे. सुरुवातीला मी फावड्याने तलाव करायचो. मात्र, आता मी लोकांच्या डोक्यात तलाव करण्याचे काम हाती घेतले, त्यामुळे त्यांना पाण्याचे महत्व कळल्याशिवाय राहणार नाही, असेही डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले.  
(समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे गरजेचं - राजेंद्र दर्डा)
(जनसामान्यांचा आवाज म्हणजे लोकमत - राम शिंदे)
(शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पूर यांचा जवळचा संबंध - संजीव मेहता)
समाजाला पाणी संवर्धन करावे लागेल, त्याशिवाय देश पाणीदार बनू शकणार नाही. भारत भाग्यशाली आहे, फोर्स  मायग्रेशन आपल्याकडे नाही. तसेच, पावसाचे चक्र बदलले आहे. मात्र, शेतकरी ते चक्र अजून समजू शकलेला नाही. त्यामुळे पावसाच्या चक्रानुसार पिकांचे नव्याने नियोजन करावे लागणार, असल्याचे मतही डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. 
दरम्यान, जलसमृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत लोकमत समूहातर्फे आज लोकमत वॉटर समिट 2017चे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन करण्यात आले. तर, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांची या समिटला विशेष अतिथी म्हणून उपस्थिती आहे.