शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

कर्जमाफीने वेतन आयोग लांबणीवर

By admin | Updated: June 13, 2017 05:07 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा फटका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना बसू शकतो. या कर्जमाफीमुळे कर्मचाऱ्यांसाठीच्या सातव्या वेतन आयोगाची

- यदु जोशी। लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा फटका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना बसू शकतो. या कर्जमाफीमुळे कर्मचाऱ्यांसाठीच्या सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने ज्या पद्धतीने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे ते पाहता किमान ४० हजार कोटी रुपयांची तजवीज शासनाला त्यासाठी करावी लागणार आहे. अशा आर्थिक कसरतीतून वाटचाल करावी लागणार असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारसमोर सातवा वेतन आयोग देण्याचेही आव्हान आहे. राज्यातील १८ लाख कर्मचारी आणि अधिकारी तसेच साडेसहा लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करायचा तर किमान वार्षिक १८ हजार कोटी रुपयांची आवश्यकता असेल. राज्य शासनाच्या विविध विभागांना २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीला १५ ते २० टक्क्यांचा कट लावावा लागला होता. कर्जमाफी, सातवा वेतन आयोग असा एकत्रित बोजा पडला तर हा कट २५ टक्क्यांच्या घरात जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते अशा सगळ्या परिस्थितीत सातवा वेतन आयोग तातडीने लागू करणे शक्य होणार नाही. कर्जमाफी देण्याचे स्वागतच, पण... केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याची राज्यात अंमलबजावणी करावी, अशी मागणी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संघटनांनी सध्या लावून धरली आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग.दि. कुलथे म्हणाले की, शासनाची आर्थिक अडचण आम्ही समजू शकतो. शासनाने १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करीत असल्याचे तत्काळ जाहीर करावे आणि त्यानुसार पुढील महिन्याच्या वेतनात सुधारणा करावी.१ जानेवारीपासूनची १७ महिन्यांची थकबाकी काही हप्ते पाडून देण्यास आमची हरकत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आम्ही स्वागतच केले आहे; पण वेतन आयोगासाठीची तरतूद शासनाला दर दहा वर्षांनी करायचीच असते. त्यामुळे कर्जमाफीचे कारण देऊन वेतन आयोग लांबणीवर टाकणे योग्य ठरणार नाही, असेही कुलथे म्हणाले. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे ३१ मार्च २०१८ रोजी राज्य सरकारवर तब्बल ४ लाख १० हजार कोटी रुपयांचे कर्ज असेल. या कर्जाच्या परतफेडीसाठी शासनाला वर्षाकाठी ३० हजार कोटी रुपये मोजावे लागतात. वेतन आयोग लागू करण्याबाबत राज्य शासन तत्पर राहिले आहे असा आधीचाही अनुभव नाही. सहावा वेतन आयोग १ जानेवारी २००६ रोजी केंद्र सरकारने लागू केला होता. राज्याने तो तब्बल २००९ मध्ये लागू केला आणि तीन वर्षांची थकबाकी पाच हप्त्यांमध्ये दिलेली होती. कर्मचारी, अधिकारी संघटनांनी ती मान्य केली होती.