शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

निकालाला धीराने सामोरे जा

By admin | Updated: June 8, 2015 06:01 IST

निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळेलच असे होत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी निराश न होता निकालाला धीराने सामोरे जावे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सोमवारी दहावीचा निकाल आॅनलाईन जाहीर होणार आहे. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळेलच असे होत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी निराश न होता निकालाला धीराने सामोरे जावे. तसेच कमी गुण मिळाले म्हणून परंपरागत करिअरचे क्षेत्र न निवडता कल चाचणी करून पुढील अभ्यासक्रमाची निवड करावी, असा सल्ला पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या समुपदेशकांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी अधिक गुण मिळतच असतात. त्यात गेल्या काही वर्षांपासून राज्य शिक्षण मंडळातर्फे सर्वोत्तम पाच पद्धतीने निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. विद्यार्थ्यांनी निकालाच्या भीतीने कोणतेही अनुचित पाऊल उचलू नये. दहावीची परीक्षा म्हणजे जीवनातील शेवटची परीक्षा नाही. त्यामुळे या परीक्षेत अपयश आले तरी खचून जाऊ नका, असा सल्ला समुपदेशकांनी दिला आहे.पुणे विभागीय शिक्षण मंडळाचे समुपदेशक सुधीर खाडे म्हणाले, सर्वोत्तम पाच अर्थात बेस्ट आॅफ फाईव्ह पद्धतीने दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात. शासनाच्या किंवा खासगी संस्थांमधून बुध्यांक किंवा कल चाचणी करून विद्यार्थ्यांनी करिअर निवडावे. (प्रतिनिधी)पाल्याला अधिकाधिक गुण मिळावेत अशी पालकांची इच्छा असते. मात्र, पालकांच्या इच्छेप्रमाणे मुलांना यश मिळाले नाही तर पालक रागावतात. पालकांनी निकालाच्या दिवशी मुलांशी रागावून न बोलता शांतपणे संवाद साधणे आवश्यक आहे.- सुधीर खाडे, समुपदेशक, पुणे विभागीय शिक्षण मंडळ मुलांनी वर्षभर कष्ट करून गुण मिळवलेले असतात. त्यामुळे कितीही टक्के गुण मिळविले, तरी त्यांचे कौतुक केले पाहिजे. अपयश आल्यास पुन्हा नव्याने उभे राहण्याची प्रेरणा द्यायला हवी. त्याचप्रमाणे आपली क्षमता, घरची परिस्थिती आणि आवड लक्षात घेवून करिअरची निवड करावी.- भा. श्री. पुरंदरे, मुख्याध्यापक, डीईएस रमणबाग शाळापुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या समुपदेशकांचे क्रमांक बी.डी.गरुड ८६००५२५९०८पवनकुमार गायकवाड ९९२२४५३२३५विनीत दरेकर ९४२२०८३८८६सायली गायकवाड ९४०४२९४४००