शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

एक धार्मिक उन्माद

By admin | Updated: July 12, 2015 03:23 IST

कोणत्याही धार्मिक सणाचे मूळचे उदात्त हेतू आणि स्वरूप फारच वंदनीय वाटते. मात्र आज त्यांचे दिसणारे बाजारी सादरीकरण पाहिल्यानंतर कोणत्याही सुसंस्कृत माणसाची मान शरमेने खाली जाते.

- ‘राशिचक्र’कार शरद उपाध्येअमृतकुंभ अन् मेळा!समुद्रमंथनावेळी निघालेला अमृतकुंभ स्वर्गात नेत असताना देवांना दैत्यांचा विरोध होऊ लागला. त्याचा प्रतिकार करण्यासाठी देवांनी पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी तो अमृतकुंभ ठेवला, त्या चार ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. ज्या ज्या राशीमध्ये गुरू असता कुंभ ठेवला गेला त्या त्या राशीमध्ये गुरू आला की त्या ठिकाणी कुंभमेळा होतो. कुंभ राशीत गुरू असता हरिद्वार, वृषभ राशीत गुरू असता प्रयाग, सिंह राशीत गुरू असता त्र्यंबकेश्वर आणि गुरू सिंह राशीत असताना मेषेत सूर्य, तुळेत चंद्र व वैशाखी पौर्णिमा असा योग असता उज्जैन येथे कुंभमेळा असतो.कोणत्याही धार्मिक सणाचे मूळचे उदात्त हेतू आणि स्वरूप फारच वंदनीय वाटते. मात्र आज त्यांचे दिसणारे बाजारी सादरीकरण पाहिल्यानंतर कोणत्याही सुसंस्कृत माणसाची मान शरमेने खाली जाते. गणेशोत्सव, नवरात्रौत्सवातील किळसवाणा धांगडधिंगा, दिवाळीतील फटाक्याच्या आवाजाचे प्रदूषण, पुण्यपुरुषांच्या जयंत्या किंवा पुण्यतिथ्या अशा तसेच स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा अनेक अभिमान वाटावा अशा दिवशी लोकांचे बेजबाबदारीचे वर्तन आणि असे अनेक उत्सव मूळ उद्देशापासून खूपच दूर भरकटलेले दिसतात. धार्मिक उत्सव साजरे करतानाही परमेश्वरावरील प्रेमापेक्षा आपला आनंद कसा उपभोगता येईल याकडेच लक्ष असते. व्याकूळ आर्ततेपेक्षा नेत्रदीपक प्रदर्शनाकडेच जास्त लक्ष दिले जाते. आंतरिक प्रेमापेक्षा बाह्य सजावटीची काळजी घेतली जाते.लवकरच येणारा सिंहस्थ कुंभमेळा हे त्याचे आणखी एक उदाहरण. ३१ मे २०१५च्या एका वर्तमानपत्रात अंगावर ४ कोटी रुपयांचे ११ किलो सोन्याचे दागिने घालून त्र्यंबक नगरीत प्रवेश केलेल्या एका गोल्डनबाबाचे फोटो झळकले आहेत. दिल्लीतील एका आखाड्याचे ते सर्वेसर्वा आहेत. अंगावर वैराग्यदर्शक भगवी वस्त्रे आणि गळ्यात, हातात, कमरेला सोन्याचे दागिने हा केवढा विरोधाभास! हे गोल्डनबाबा सिंहस्थ पर्वकालात काही महिने त्र्यंबकेश्वरला राहणार आहेत. त्यांच्या आगमनानंतर त्यांना पाहण्यासाठी खूप गर्दी होत आहे. भक्तांमध्ये बाबांच्या या वागण्याने किती चुकीचा संदेश जाण्याचा संभव आहे आणि वैचारिक गोंधळ होणार आहे याचा विचार बाबांनी करायला नको का?सिंहस्थ पर्वकाळात हजारो साधू, मंडलेश्वर, नंगे बाबा, उग्र चेहऱ्याचे महंत आपल्या दांडगट अनुयायांसह थाटामाटात येऊन कधी कधी दंगामस्ती करून स्नान, दान, मुंडनादी तीर्थविधी करतात. प्रचंड गोंगाट असतो. वेगवेगळ्या आखाड्यांचे मानापमान असतात. खरे अध्यात्म हरवलेले असते. सामान्य भक्तांचे हाल होतात. अध्यात्मिक शांती औषधालाही अनुभवास येत नाही. फक्त धार्मिक उन्माद दिसतो. परमेश्वरावरील प्रेमापेक्षा आपली पापकर्मे धुवून निघावीत, म्हणून निरनिराळे निरर्थक विधी करण्यासाठी येणारी स्वार्थी माणसेच जास्त दिसतात आणि अशा कुंभमेळ्यांसाठी करोडो रुपये शासनाकडून निधी स्वरूपात मंजूर केले जातात, तेव्हा आश्चर्य वाटते. कारण उपासमारीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे शेकडो शेतकरी रोज आत्महत्या करीत असताना, त्यांना मदत करणे अपेक्षित आहे. कर्मठ मंडळींच्या निरर्थक अध्यात्मिक ढोंगाचे लाड नसावेत. तीनशे वर्षांपूर्वीच्या सनातन काळातही निर्भीड, स्पष्टवक्त्या, फटकळ, भक्तश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी ढोंगी भक्तांना सात्विक संतानाने विचारले होते,आली सिंहस्थ पर्वणी। न्हाव्यां भटां झाली धणी।।अंतरी पापाच्या कोडी। वरि वरि बोडी डोई दाढी।।बोडिले ते निघाले । काय पालटले सांग वाहिलें।।पाप गेल्याची काय खूण। नाही पालटले अवगुण।।भक्तिभावेवीण। तुका म्हणे अवघाचि सीण।।खरोखरच भक्तमंडळींनी, समाजाने, राज्यकर्त्यांनी वरील ओव्यांचे सखोल चिंतन करावे म्हणजे कुं भमेळ्याच्या वांझोट्या भक्तीच्या बाजारीकरणाचे ओंगळ स्वरूप लक्षात येईल. शासनाने भलामोठा निधी मंजूर करावा अशी कुठलीही विधायक फलश्रुती कुंभमेळ्यापासून मिळत नाही. भक्तिभावाने ओथंबलेले असे किती भक्त कुंभमेळ्यास येत असतील! निरर्थक कर्मकांड करणारेच बहुतेक जण दिसतात. त्रिकाल स्नान करणाारे साधू असतील तर मासे अखंड गंगेतच राहतात. वायू आहार करणारे संत म्हणावे तर सर्र्प सतत वायू भक्षणच करतो. गुहेत राहणाऱ्याला साधू म्हणावे तर उंदीरही बिळातच राहतात. अंगाला राख फासणारा वैरागी असेल तर सतत उकिरड्यावर लोळणाऱ्या व राखेने माखलेल्या गाढवालाही वैरागी म्हटले पाहिजे. ध्यान करणारा भक्त म्हणावा तर बगळा नित्य ध्यान करतानाच भासतो. बाह्य लक्षणांनी कोणीही मोक्षपदाला गेल्याचे ऐकिवात नाही. अंतर्लक्षण हेच खऱ्या संताचे स्वरूप. अंत:करणाने निर्मल आणि वाचेने रसाळ असलेल्याच्या गळ्यात माळ असो नसो, आत्मसाक्षात्कारी पुरूषाच्या माथ्यावर जटा असोत नसोत, परस्त्रीच्या ठायी नंपुसक असलेल्या आणि परद्रव्याच्या ठिकाणी आंधळा असलेल्याच्या तसेच परनिंदेच्या ठायी मुक्या असलेल्या माणसाच्या अंगाला भस्म लावलेले असो नसो. खरा संत तोच: परमार्थ तो नोहे लेकुराच्या गोष्टी, अनुताप पोटी व्हावा लागे हेच खरे.