शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पुन्हा दोन रुग्णालयांत तणाव

By admin | Updated: April 2, 2017 01:26 IST

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केल्याने शहरातील घाटी रुग्णालयात शनिवारी तणावपूर्ण वातावरण होते

औरंगाबाद : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केल्याने शहरातील घाटी रुग्णालयात शनिवारी तणावपूर्ण वातावरण होते. तर, एशियन सिटीकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही रुग्णाच्या मृत्यूनंतर तशीच स्थिती उद्भवली होती. तर सेव्हन हिल परिसरातील जिल्ला हॉस्पिटलमध्ये रुग्णावर उपचार न झाल्याचा ठपका ठेवत त्याच्या नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड केली.अपघातात गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय तरुणास उपचारासाठी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घाटीतील अपघात विभागात आणल्यानंतर डॉक्टरांनी तासभर दुर्लक्ष केले. त्यानंतर किरकोळ उपचार करून त्याला घरी पाठवले; परंतु रुग्णालयाबाहेर पडताच रुग्णाचा मृत्यू झाला. ट्रॉमा केअरमध्ये दाखल करून केवळ उपचाराचा देखावा केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. संबंधित डॉक्टरांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे घाटीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. शरद महावीर वायकोस (रा. पिंपळवाडी, ता. पैठण) असे मृत तरुणाचे नाव आहे. वेळेवर उपचार दिले असते तर माझा भाऊ प्राणाला मुकला नसता. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून हा सगळा प्रकार समोर येईल. घाटी प्रशासनाने योग्य तो न्याय दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद यांचा भाऊ प्रशांत वायकोस यांनी दिली. (प्रतिनिधी)‘जिल्ला’मध्ये तोडफोडजिल्ला हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मेंदूविकाराचा झटका आल्यानंतर प्रकृती अधिक चिंताजनक होताच संतप्त नातेवाईकांनी धुडगूस घालून रुग्णालयाच्या दरवाजाच्या काचा फोडल्या. याप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंद झाला. रेल्वेस्टेशन परिसरातील ६८ वर्षीय महिलेवर २७ मार्च रोजी गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून हृदयाचे ठोके अनियमित होत असल्याने आवश्यक शस्त्रक्रियेसाठी एशियन सिटीकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या ४० वर्षीय रुग्णाचा शनिवारी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला. शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने हृदयाच्या व्हॉलला इजा झाली. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून व्हॉल बदलला; परंतु या सगळ्यामध्ये रुग्णाला जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. प्रकाश नानाभाऊ गोंडे (रा. नारेगाव) असे मृत रुग्णाचे नाव आहे.