शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गैरहजर, बडतर्फ कर्मचाऱ्यांना एसटीकडून दिलासा

By admin | Updated: August 30, 2016 19:07 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेत गैरहजेरीस्तव बडतर्फ करण्यात आलेले कर्मचारी आणि अपहार प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या वाहकांची पुनर्नेमणूक करण्यात येणार आहे

- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेत गैरहजेरीस्तव बडतर्फ करण्यात आलेले कर्मचारी आणि अपहार प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या वाहकांची पुनर्नेमणूक करण्यात येणार आहे. या कर्मचा-यांना बडतर्फ करण्यात आल्याने त्यांच्या कुटूंबियांची होणारी आर्थिक कुचंबणा थांबावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील महामंडळाच्या हजारो कर्मचा-यांना दिलासा मिळणार आहे, या शिवाय महामंडळासही कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. मात्र, या नेमणूकीसाठी संबधित कर्मचा-याचे वय 45 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहे. 
 
राज्यभरात एसटीचे शेकडो कर्मचारी गैरहजर असल्याने बडतर्फ करण्यात आले आहेत. तर हजारो वाहकांवर अपहाराचे ठपके ठेवण्यात आले असून त्यांना बडतर्फ करून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे संबधित कर्मचा-यांच्या जागा रिक्त असून महामंडळाचे मनुष्यबळही कमी झाले आहे. या शिवाय हे कर्मचारी बडतर्फ केल्याने त्यांचे वेतन बंद होऊन त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच या अपहार प्रकरणांची चौकशी वर्षानुवर्षे निकाली निघत नसल्याने शेकडो कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या कुटूंबियांनी अनेकादा शासनाकडेही दाद मागितली आहे. त्यामुळे या कुटूंबियांची हेळसांड लक्षात घेऊन एसटी कडून या कर्मचा-यांची पुनर्नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे परिपत्रक काढून महामंडळाने हा निर्णय जाहीर केला असून याबाबतची अधिक माहिती कर्मचा-यांना संबधित विभागात दिली जाणार आहे. 
 
माहिती संकलीत करण्याचे काम सुरू 
महामंडळाकडून करण्यात येणारी पुनर्नेमणूक काही अटींच्या आधीन असून असणार आहे. त्यात प्रमुख्याने कर्मचा-याचे वय 45 वर्षपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. संबधित कर्मचा-याची अपहारची तीन पेक्षा कमी प्रकरणे असणे, न्यायालयात दावा सुरू असल्यास न्यायालयाची संमती असणे अशा अनेक अटींचा समावेश आहे. या नेमणूकीबाबत अनेकांनी या पूर्वी अर्ज केलेले असून त्यानुसार, या कर्मचा-यांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरू असल्याचे पुणे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी सांगितले. या नेमणूकीसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत करण़्यात आला असून त्यानुसार, पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे मैंद यांनी स्पष्ट केले.