शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अल्पभूधारकांची अट शिथिल करा - रामदास आठवले

By admin | Updated: June 12, 2017 01:42 IST

राज्य शासन शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा विचार करत आहे, पण यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांची घातलेली अट

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य शासन शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा विचार करत आहे, पण यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांची घातलेली अट शिथिल करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केले. केंद्र शासनाच्या तीन वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. आठवले म्हणाले, की कर्जमाफीसाठी सध्या राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, ही आरपीआय आणि भाजपा दोघांची भूमिका आहे. परंतु त्यासाठी ३० ते ४० हजार कोटी रुपये आणायचे कोठून, हा मोठा प्रश्न आहे. भाजपा सरकार दलितांचे आरक्षण रद्द करणार आहे, संविधान बदलणार असा खोडसाळ प्रचार काही मंडळी करत असल्याचे सांगून आठवले म्हणाले, ‘‘देशाचे पंतप्रधान संविधानाला धर्मगं्रथ मानत असून, ते बदलले जाणार नाही आणि आरक्षणालाही कोणताच धोका नाही. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर हल्ले केले जात आहेत. त्यांना जास्त खुमखुमी असेल तर त्यांना धडा शिकवावा लागेल. एकदाच आरपारची लढाई होऊन जाऊ द्या. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे अशी मागणी करतानाच आमचे धोरण युद्धाकडे नाही तर बुद्धाकडे जाणारे आहे. मात्र वेळ आली तर चोख उत्तर देण्यात येईल.’’मराठी माणूस राष्ट्रपती झाला तर आम्हाला आनंदच वाटेल. शरद पवार यांना राष्ट्रपती व्हायचे असेल तर विरोधात राहून ते शक्य नाही. त्यांनी एनडीएमध्ये यावे, अजून आमचा उमेदवार ठरलेला नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले.