शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अल्पभूधारकांची अट शिथिल करा - रामदास आठवले

By admin | Updated: June 12, 2017 01:42 IST

राज्य शासन शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा विचार करत आहे, पण यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांची घातलेली अट

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य शासन शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा विचार करत आहे, पण यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांची घातलेली अट शिथिल करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केले. केंद्र शासनाच्या तीन वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. आठवले म्हणाले, की कर्जमाफीसाठी सध्या राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, ही आरपीआय आणि भाजपा दोघांची भूमिका आहे. परंतु त्यासाठी ३० ते ४० हजार कोटी रुपये आणायचे कोठून, हा मोठा प्रश्न आहे. भाजपा सरकार दलितांचे आरक्षण रद्द करणार आहे, संविधान बदलणार असा खोडसाळ प्रचार काही मंडळी करत असल्याचे सांगून आठवले म्हणाले, ‘‘देशाचे पंतप्रधान संविधानाला धर्मगं्रथ मानत असून, ते बदलले जाणार नाही आणि आरक्षणालाही कोणताच धोका नाही. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर हल्ले केले जात आहेत. त्यांना जास्त खुमखुमी असेल तर त्यांना धडा शिकवावा लागेल. एकदाच आरपारची लढाई होऊन जाऊ द्या. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे अशी मागणी करतानाच आमचे धोरण युद्धाकडे नाही तर बुद्धाकडे जाणारे आहे. मात्र वेळ आली तर चोख उत्तर देण्यात येईल.’’मराठी माणूस राष्ट्रपती झाला तर आम्हाला आनंदच वाटेल. शरद पवार यांना राष्ट्रपती व्हायचे असेल तर विरोधात राहून ते शक्य नाही. त्यांनी एनडीएमध्ये यावे, अजून आमचा उमेदवार ठरलेला नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले.