शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
3
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
4
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
5
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
6
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
7
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
8
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
9
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
10
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
11
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
12
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
13
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
14
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
15
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
16
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
18
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
19
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
20
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?

पुनर्वसूच्या पावसाने राज्याला तारले

By admin | Updated: July 15, 2017 02:34 IST

गेले काही दिवस ठाणे-मुंबईसह राज्यभरात पावसाने दडी मारली होती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गेले काही दिवस ठाणे-मुंबईसह राज्यभरात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले होते. मात्र, सध्या पुनर्वसू नक्षत्र चालू असून या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला शेतकरी बांधव ‘तरणा पाऊस’ म्हणतात आणि उशिरा का होईना, पुनर्वसू नक्षत्रातच पावसाचे पुनरागमन झाल्याने या ‘तरण्या’ पावसाने सर्वांनाच तारले आहे. १९ जुलैपर्यंत सूर्य पुनर्वसू नक्षत्रात राहणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. शेतकऱ्यांनी प्रत्येक नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला गमतीशीर नावे दिलेली आहेत. त्याविषयी सोमण यांनी सांगितले, १९ जुलै रोजी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करील. पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘म्हातारा पाऊस’ म्हणतात. या काळात पाऊस संथ; पण सतत पडत असतो, म्हणून हे नाव पावसाला देण्यात आले असावे. २ आॅगस्ट रोजी सूर्य आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रातील पावसाला ‘आसळकाचा पाऊस’ म्हणतात. १६ आॅगस्ट रोजी सूर्य मघा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे या पावसाला ‘सासूंचा पाऊस’ म्हणतात. ३० आॅगस्ट रोजी सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात पाऊस अगदी आज्ञाधारकासारखा पडत असल्याने या पावसाला ‘सुनांचा पाऊस’ म्हणतात. त्यानंतर, १३ सप्टेंबर रोजी सूर्य उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करील. या नक्षत्रकाळात पडणारा पाऊस रब्बीच्या पिकांना उपयुक्त असल्याने त्याला ‘रब्बीचा पाऊस’ म्हणतात. २६ सप्टेंबर रोजी सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करील. त्यामुळे या नक्षत्रातील पावसाला ‘हत्तीचा पाऊस’ असे म्हणतात. १० आॅक्टोबर रोजी सूर्य चित्रा व २३ आॅक्टोबर रोजी स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यानंतर, मात्र पावसाळ्याचा मोसम समाप्त होतो.२२ जुलै रोजी सकाळी ११.२० वाजता ४.६२ मीटर उंचीची भरती येणार आहे. २३ जुलै दुपारी १२.०६ वाजता ४.८१ मीटर, २४ जुलै रोजी दुपारी १२.५० वाजता ४.८९ मीटर, २५ जुलै रोजी दुपारी १.३२ वाजता ४.८७ मीटर, २६ जुलै रोजी दुपारी २.१२ वाजता ४.७५ मीटर आणि २७ जुलै रोजी दुपारी २.५४ वाजता ४.५४ मीटर उंचीची भरती येणार आहे. ही लाटांची नव्हे तर भरतीच्या पाण्याची उंची असते, असेही सोमण यांनी स्पष्ट केले.