शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

नापासांसाठी फेरपरीक्षा; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याचे यश

By admin | Updated: June 9, 2015 01:18 IST

‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीने २४ ते २६ मार्चदरम्यान ‘पुरवणी परीक्षा घ्या, नापासांचे वर्ष वाचवा’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध

कोल्हापूर : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लागलीच फेरपरीक्षा घेऊन त्यांचे वाया जाणारे वर्ष वाचविण्यात येईल, येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत सोमवारी केलेली घोषणा म्हणजे ‘लोकमत’ने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे हे यश आहे.दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून जूनमध्येच पुरवणी परीक्षा घेतली जावी यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला. ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीने २४ ते २६ मार्चदरम्यान ‘पुरवणी परीक्षा घ्या, नापासांचे वर्ष वाचवा’ ही तीन भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये कर्नाटकमध्ये गेल्या १४ वर्षांपासून अशी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा तेथील हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. महाराष्ट्रात मात्र आॅक्टोबरमध्ये परीक्षा घेतली जात असल्याने नापास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते. त्यामुळे पुरवणी परीक्षा कशी आवश्यक आहे हे आकडेवारीनिशी मांडले होते.शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या निमित्ताने २२ मे रोजी कोल्हापुरात आले असता या पुरवणी परीक्षेचे फायदे ‘लोकमत’ने त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. महाराष्ट्रातील हजारो नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविण्यासाठी ही परीक्षा कशी गरजेची आहे, हेही त्यांना सांगितले होते. त्यावर त्यांनी सूचना खूप चांगली आहे.याचा निश्चितपणे विचार करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच तावडे यांनी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आणि नापास विद्यार्थ्यांना वर्ष वाया न घालविण्याची संधी देऊन मोठा दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)