शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

नापासांसाठी फेरपरीक्षा; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याचे यश

By admin | Updated: June 9, 2015 01:18 IST

‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीने २४ ते २६ मार्चदरम्यान ‘पुरवणी परीक्षा घ्या, नापासांचे वर्ष वाचवा’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध

कोल्हापूर : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लागलीच फेरपरीक्षा घेऊन त्यांचे वाया जाणारे वर्ष वाचविण्यात येईल, येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत सोमवारी केलेली घोषणा म्हणजे ‘लोकमत’ने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे हे यश आहे.दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून जूनमध्येच पुरवणी परीक्षा घेतली जावी यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला. ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीने २४ ते २६ मार्चदरम्यान ‘पुरवणी परीक्षा घ्या, नापासांचे वर्ष वाचवा’ ही तीन भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये कर्नाटकमध्ये गेल्या १४ वर्षांपासून अशी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा तेथील हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. महाराष्ट्रात मात्र आॅक्टोबरमध्ये परीक्षा घेतली जात असल्याने नापास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते. त्यामुळे पुरवणी परीक्षा कशी आवश्यक आहे हे आकडेवारीनिशी मांडले होते.शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या निमित्ताने २२ मे रोजी कोल्हापुरात आले असता या पुरवणी परीक्षेचे फायदे ‘लोकमत’ने त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. महाराष्ट्रातील हजारो नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविण्यासाठी ही परीक्षा कशी गरजेची आहे, हेही त्यांना सांगितले होते. त्यावर त्यांनी सूचना खूप चांगली आहे.याचा निश्चितपणे विचार करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच तावडे यांनी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आणि नापास विद्यार्थ्यांना वर्ष वाया न घालविण्याची संधी देऊन मोठा दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)