शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

नापासांसाठी फेरपरीक्षा; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याचे यश

By admin | Updated: June 9, 2015 01:18 IST

‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीने २४ ते २६ मार्चदरम्यान ‘पुरवणी परीक्षा घ्या, नापासांचे वर्ष वाचवा’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध

कोल्हापूर : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लागलीच फेरपरीक्षा घेऊन त्यांचे वाया जाणारे वर्ष वाचविण्यात येईल, येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत सोमवारी केलेली घोषणा म्हणजे ‘लोकमत’ने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे हे यश आहे.दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून जूनमध्येच पुरवणी परीक्षा घेतली जावी यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला. ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीने २४ ते २६ मार्चदरम्यान ‘पुरवणी परीक्षा घ्या, नापासांचे वर्ष वाचवा’ ही तीन भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये कर्नाटकमध्ये गेल्या १४ वर्षांपासून अशी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा तेथील हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. महाराष्ट्रात मात्र आॅक्टोबरमध्ये परीक्षा घेतली जात असल्याने नापास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते. त्यामुळे पुरवणी परीक्षा कशी आवश्यक आहे हे आकडेवारीनिशी मांडले होते.शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या निमित्ताने २२ मे रोजी कोल्हापुरात आले असता या पुरवणी परीक्षेचे फायदे ‘लोकमत’ने त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. महाराष्ट्रातील हजारो नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविण्यासाठी ही परीक्षा कशी गरजेची आहे, हेही त्यांना सांगितले होते. त्यावर त्यांनी सूचना खूप चांगली आहे.याचा निश्चितपणे विचार करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच तावडे यांनी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आणि नापास विद्यार्थ्यांना वर्ष वाया न घालविण्याची संधी देऊन मोठा दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)