शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

फेरपरीक्षा हा ‘लोकमत’चाच निर्णय -तावडे

By admin | Updated: June 13, 2015 02:19 IST

इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून निकालानंतर लगेचच फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय केवळ

कोल्हापूर : इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून निकालानंतर लगेचच फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय केवळ ‘लोकमत’मुळेच घेतला, अशी कबुली देत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकात गेल्या १४ वर्षांपासून पुरवणी परीक्षा घेतली जाते. तिचा फायदा दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना होतो. अशीच परीक्षा महाराष्ट्रातही घेण्याबाबत सरकार विचार करेल का, असा प्रश्न विनोद तावडे यांना २२ मे रोजी कोल्हापुरात ‘लोकमत’ने विचारला होता. त्यावर सूचना खूप चांगली आहे. नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण किती आहे, अशी परीक्षा घेणे शक्य आहे का, याचा अभ्यास करू आणि अशी परीक्षा घेण्याबाबत निश्चितपणे विचार करू, असे त्यांनी सांगितले होते. याचवेळी ‘लोकमत’ने कर्नाटकात होणारी पुरवणी परीक्षा आणि महाराष्ट्रात ती कशी आवश्यक आहे, हे सांगणारी वृत्तमालिका प्रसिद्ध केल्याचेही तावडे यांच्या निदर्शनास आणून दिले होते.तावडे यांनी यासंदर्भात सूचना केल्यानंतर तातडीने शिक्षण विभागातील यंत्रणेला कामाला लावले आणि अवघ्या १५ दिवसांत म्हणजेच ८ जूनला महाराष्ट्रातही दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली. (प्रतिनिधी)