शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

‘टॅक्सी-वे’च्या बांधकामात पुनर्वसनाचा अडथळा

By admin | Updated: August 7, 2014 00:57 IST

बोर्इंगच्या एमआरओसाठी बांधण्यात येणारा टॅक्सी-वे शिवणगावातील शेतकऱ्यांच्या कठोर विरोधामुळे बंद पडला आहे. पुनर्वसनाअभावी वर्धा मार्गावरून गावाला जोडणारा रस्ता बंद होण्याची

प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन : एमएडीसीच्या हेतूवर शंकानागपूर : बोर्इंगच्या एमआरओसाठी बांधण्यात येणारा टॅक्सी-वे शिवणगावातील शेतकऱ्यांच्या कठोर विरोधामुळे बंद पडला आहे. पुनर्वसनाअभावी वर्धा मार्गावरून गावाला जोडणारा रस्ता बंद होण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. प्राण गेला तरीही बेहत्तर, पण पुनर्वसन झाल्याशिवाय टॅक्सी-वे होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. मंगळवारी टॅक्सी-वेचे काम बंद होते. शेतकऱ्यांशी चर्चेदरम्यान महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) हेतूवर शंका व्यक्त केली. एमएडीसीने पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित ठेवला आहे. टॅक्सी-वेच्या पूर्णत्वानंतर कंपनी आम्हाला वाऱ्यावर सोडेल, अशी भीती प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली. शासनाने मागण्या पूर्ण कराव्यातटॅक्सी-वेच्या दिरंगाईसाठी एमएडीसीचे अधिकारी पावसाचे कारण पुढे करीत आहेत. टॅक्सी-वेच्या मधोमध असलेल्या शेताचा मोबदला देण्यास एमएडीसीला अपयश आल्याने, गेल्या सहा महिन्यांपासून काम बंद आहे. आधी पुनर्वसन नंतरच टॅक्सी-वे, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. आजच्या बाजारभावानुसार शेतीचा वाढीव मोबदला, १२.५ टक्के विकसित जमीन, संपूर्ण गावाचे पुनर्वसन अशी ताठर भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने बोर्इंगला जोडणारा टॅक्सी-वे केव्हा पूर्ण होणार, यावर प्रश्नचिन्ह आहे. एमएडीसीचे अधिकारी अनुत्सुकछोट्या छोट्या समस्या सोडविण्यात एमएडीसीचे अधिकारी उत्सुक नाहीत. त्याच कारणामुळे गेल्या दहा वर्षांपासून मिहानचा विकास संथ आहे. नवीन कंपन्यांनीही पाठ फिरविली आहे. अस्तित्वातील कंपन्या विस्तार बाहेर करीत आहेत; शिवाय स्थानिक रोजगारापासून वंचित आहेत. राज्यात नवीन सरकार आल्यानंतरच मिहानचा विकास शक्य असल्याचे खुद्द अधिकाऱ्यांनी सांगितले. पायाभूत सुविधायुक्त प्लॉट हवाप्रकल्पग्रस्तांना चिचभुवन येथे विकसित प्लॉट मिळणार आहे. केवळ प्लॉट पाडून होणार नाही, तर त्याठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास हवा. आज काम सुरू झाले तर वर्षभराचा कालावधी लागणार आहे. अद्याप निविदा न निघाल्याने पायाभूत सुविधांच्या प्रत्यक्ष कामासाठी किमान सहा महिने तरी लागतील. यासाठी एमएडीसीचे अधिकारी उशीर करीत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. पुनर्वसनांतर्गत शेतकरी तीन हजार चौ.फूट, बिगर शेतकरी १५०० चौ.फूट आणि अतिक्रमणकर्त्याला ३५० चौ.फूट जागा मिळेल. १५० एकर जागा पुनर्वसनासाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सर्व सोयीसुविधांच्या उपलब्धतेनंतरच गाव सोडणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याआधी कलकुही, तेल्हारा आणि दहेगाव येथील प्रकल्पग्रस्तांनी शंकरपूर येथील घराचे बांधकाम निकृष्ट असल्याचे सांगून ताबा घेण्यास नकार दिला आहे. मिहान प्रकल्पाचा विकास, टॅक्सी-वे, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही मिहानमधील समस्या सोडविण्यात अपयश आले आहे. नवीन सरकार आल्यानंतर यावर तोडगा निघेल, अशी प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्तांनी लोकमतशी बोलताना दिली. (प्रतिनिधी)पुनर्वसनाचे नियोजन नाहीशिवणगाव मनपा हद्दीत असल्याने येथील शेतकऱ्यांचे पुनर्वसन चिंचभुवन येथे होणार असल्याची माहिती एमएडीसीचे अधिकारी गेल्या पाच वर्षांपासून देत आहेत. पण पुनर्वसन कागदपत्रांपलीकडे गेले नाही. दक्ष नियोजन नाही. मुख्यमंत्री आणि अधिकारी बदलले तरी पुनर्वसनाचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. शासनाने पुनर्वसन वगळता शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण केल्यानंतरही टॅक्सी-वे पूर्ण होणे शक्य नाही. कारण वर्धा मार्गावरून शिवणगावला जोडणारा मार्ग टॅक्सी-वे मुळे बंद होईल. येथील नागरिकांना जयताळामार्गे शहरात यावे लागेल.