शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्तीची पुन:प्रतिष्ठापना होणार

By admin | Updated: April 12, 2015 01:05 IST

शिवपत्नी सतीचे नेत्र ज्या ठिकाणी पडले, त्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्ती पुन:प्रतिष्ठापनेला येत्या सप्टेंबरमध्ये ३०० वर्षे पूर्ण होत आहेत.

इंदुमती गणेश ल्ल कोल्हापूरशिवपत्नी सतीचे नेत्र ज्या ठिकाणी पडले, त्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्ती पुन:प्रतिष्ठापनेला येत्या सप्टेंबरमध्ये ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. देवीचा हा त्रिशताब्दी उत्सव वर्षभर भव्य-दिव्य प्रमाणात साजरा व्हावा, यासाठी ‘श्री अंबाबाई मूर्ती पुन:प्रतिष्ठापना त्रिशताब्दी महोत्सव समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. मात्र याला शासनाकडून भक्कम आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे.अंबाबाईची मूर्ती मंदिरात पुन:प्रतिष्ठापित केली, त्या घटनेला २६ सप्टेंबर २०१५ रोजी ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळेच कोल्हापुरामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा उत्सव नियोजनबद्ध होण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, धार्मिक संस्था, श्रीपूजक आणि लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. याअंतर्गत इतिहास परिषद, यज्ञ-होमहवन, भजन-कीर्तन महोत्सव तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नांदेड येथील ‘गुरुदा गद्दी’ला ३०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भरघोस निधी मिळून या शहराचा कायापालट करण्यात आला. तुळजापूर, पंढरपूरसह अक्कलकोटसारख्या लहान-मोठ्या तीर्थक्षेत्रांचा विकास झपाट्याने झाला; पण गेली चार वर्षे अंबाबाई मंदिराचा विकास कागदोपत्री आराखड्यांपुढे गेलाच नाही. मात्र मंदिराची प्राचीन महती आणि ३०० वर्षे पूर्तीचा संदर्भ देऊन भरघोस निधी आणण्यासाठी पुढाकाराची गरज आहे. हा त्रिशताब्दी सोहळा आणि मंदिराचा विकास केला, तरच या क्षेत्राचा धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून जगभरात नावलौकिक पोहोचणार आहे. आदिलशाहीच्या काळात मंदिरावरील आक्रमणांपासून मूर्ती वाचविण्यासाठी १२ ते १६व्या शतकाच्या दरम्यान ती एका पुजाऱ्याच्या घरात सुरक्षित ठेवण्यात आली. ही मूर्ती पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात यावी, असा दृष्टान्त नरहरभट सावगावकर यांना अंबाबाईने दिला. त्यांनी ही गोष्ट महाराणी ताराराणी यांचे सुपुत्र शंभुराजे छत्रपती यांना सांगितली. शंभुराजेंनी सरदार हिंदुराव घोरपडे यांना मूर्तीच्या पुन:प्रतिष्ठापनेची आज्ञा केली. त्यानुसार अश्विन शुद्ध दशमी शके १६३७, राज्याभिषेक शक ५०, दिनांक २६ सप्टेंबर १७१५ रोजी मूर्तीची मंदिरात पुन:प्रतिष्ठापना करण्यात आली. ग.ह. खरे यांच्या महाराष्ट्रातील ४ दैवते, मूर्तिविज्ञान, करवीर सरदारांच्या कैफियती या ग्रंथांमध्ये हा उल्लेख आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई ही आदिशक्तीचे स्वरूप आहे. ती शाक्त सांप्रदायातील देवता आहे. प्रत्येक राजवटीच्या काळात मंदिरात सुधारणा होत आताचे अंबाबाई मंदिराचे बदललेले स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. ‘जो लवाजमा आम्हाला आहे, त्यापेक्षा काकणभर सरस करून देवीला द्या,’ अशी आज्ञापत्रे शाहू महाराजांनी काढली व रोषण नाईक, भालदार-चोपदार, सरदार, तोफेकरी, घोडेस्वार असा लवाजमा देवीच्या चरणी वाहिला.