शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाची नोंदणी...पाहावी करून..

By admin | Updated: June 24, 2016 02:20 IST

लग्न पाहावं करून म्हणतात...त्याऐवजी लग्नाची नोंदणी पाहावी करून..असे म्हणण्याची वेळ आली आहे. विवाह नोंदणी कार्यालयाला असलेला एजंटांचा विळखा

प्रज्ञा केळकर-सिंग/ नम्रता फडणीस,  पुणेलग्न पाहावं करून म्हणतात...त्याऐवजी लग्नाची नोंदणी पाहावी करून..असे म्हणण्याची वेळ आली आहे. विवाह नोंदणी कार्यालयाला असलेला एजंटांचा विळखा आणि त्याला कर्मचाऱ्यांची कथीत छुपा पाठिंबा यामुळे दीडशे रुपयांच्या कामासाठी दोन हजार रुपये मोजण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये विवाह नोंदणी कार्यालयाच्या आवाराला एजंटांचा विळखा असल्याचे दिसून आले. कार्यालयात जाण्याअगोदरच सावज शोधणारे हे एजंट नागरिकांना गाठतात. सरळ पद्धतीने काम होणारच नाही, याची खात्री देतात. त्यामुळे नाइलाजाने नागरिकांना एजंटांशी व्यवहार करावा लागतो. नोकरीमध्ये नाव बदलण्यासाठी तसेच पासपोर्टसाठी ‘मॅरेज सर्टिफिकेट’ जरुरीचे असते. धार्मिक पद्धतीने लग्न झाल्यावर नोंदणी प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे अनेक दाम्पत्यांकडून विवाहाची नोंदणी होत नाही. अचानक गरज पडल्यावर नोंदणीची आठवण होते. वास्तविक महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्येही नोंदणीची सुविधा आहे. मात्र, याची कल्पनाच नागरिकांना नाही. ‘लोकमत’ प्रतिनिधी विवाह नोंदणी करण्यासाठी विवाह निबंधक कार्यालयात चौकशीसाठी गेल्या असता, थेट गाठ पडली ती एजंटशीच. ‘तुम्ही वकील आहात का?’ असा प्रश्न विचारून एजंटने आधी चाचपणी केली. परंतु, मोकळेपणाने बोलत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी सांगायला सुरुवात केली. अर्ज दाखल करणे, कार्यालयाची वेळ घेणे, अर्जदाराला कळवणे, पती-पत्नी तसेच साक्षीदारांनी दिलेल्या वेळी उपस्थित राहण्यास सांगणे ही सगळी कामे एजंट करताना दिसतात. अर्जदार हेरून त्यांना ‘काय काम आहे’ असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे मासा पटकन गळाला लागतो. विवाह नोंदणी कार्यालयाच्या परिसरात सध्या तब्बल ३० एजंट सक्रिय आहेत. याच कामावर उदरनिर्वाह होत असल्याने जास्तीत जास्त अर्जदार मिळण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते.थेट गेलात तर मारावे लागतील हेलपाटे!अर्जदार : मला कंपनीच्या कामासाठी परदेशी जाण्याची संधी मिळालीये पण, मॅरेज सर्टिफिक नसल्याने काम अडलंय. काय करता येईल?एजंट : मॅडम, काहीच अडचण येणार नाही. आवश्यक कागदपत्रे आणून द्या. ३० दिवसांत तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल.अर्जदार : पण, तुमच्याकडून प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळू शकेल का?एजंट : प्रमाणपत्र लवकर हवे असेल, तर तुमच्या परिसरातील क्षेत्रीय कार्यालयामध्ये ‘ड’ प्रभागात ही सोय उपलब्ध केली आहे. आमच्याकडे काढले, तरीही ३० दिवस लागतीलच. पुणे आणि पुण्याबाहेर विवाह झाला असेल तरी इथे काम होईल?अर्जदार : ठीक आहे; तुम्ही तेवढाच कालावधी लावणार, मग एजंटचा फायदा काय? एजंट : मॅडम, एजंटचा फायदा काय माहितीये का, तुम्हाला केवळ सहीसाठी एकदाच यावे लागेल. मागतील ती कागदपत्रे द्यायची, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सह्या करायच्या, झेरॉक्स काढायच्या, अ‍ॅफिडेव्हिट करायचे...तीस दिवसांनंतर प्रमाणपत्र थेट तुमच्या हातात पडेल. त्यात पैसे एकदम द्यावे लागणार नाहीत. सुरुवातीला हजार आणि काम झाल्यावर हजार. तुमचे हेलपाटेही वाचतील.अर्जदार : या कामासाठी किती पैसे लागतील?एजंट : विवाहाचा हंगाम असेल, तर ३००० रुपये आणि आॅफ सिझनला २००० रुपये...अर्जदार : बापरे, एवढे का? थेट कार्यालयामध्ये यापेक्षा स्वस्तात काम होऊ शकते ना!एजंट : मॅडम, थोडं समजून घ्या; आतमध्ये गेलात तरी हजार रुपये लागतीलच. शिवाय, सारखे हेलपाटे मारावे लागणार. आम्ही केवळ १००० रुपयेच जास्त घेतो. त्यात, आतमध्येही चिरीमिरी द्यावी लागतेच ना; आमच्या खिशात जेमतेम ५००-६०० रुपये येणार...एजंटचा इतका मोठ्या प्रमाणावर कार्यालयाच्या बाहेर सुळसुळाट असणे, याला कार्यालयातील अधिकाऱ्यांचाही तितकाच छुपा पाठिंबा आहे, हे एजंटशी साधलेल्या संवादातून समोर आले. आम्हाला जेमतेम ८००-१००० रुपये मिळतात, बाकी काय ते तुम्हीच समजून घ्या’, असे एजंटने नकळतपणे सांगितले.विवाह निबंधक कार्यालयात चौकशी केली असता, विवाह नोंदणीसाठी केवळ १५० रुपये लागतात आणि अगदीच उशीर झाला, तर लग्न झाल्यापासून प्रत्येक महिन्याचा १०० रुपये दंड याप्रमाणे पैसे भरावे लागतात, अशी माहिती मिळाली. इथेही, कागदपत्रे दाखल केल्यानंतर ३० दिवसांनंतर नोंदणीची तारीख मिळते. केवळ, कागदपत्रांचा काही गोंधळ असेल, तर कार्यालयाने सांगितलेल्या दिवशी कागदपत्रे घेऊन हजर राहावे लागते. असे असतानाही, एजंटमार्फत विवाह नोंदणी काढण्याचे प्रमाण वाढत असल्याचे ‘लोकमत’ पाहणीतून समोर आले आहे.आता क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हा अर्ज आणि नोंदणी यासाठी १४० रूपये मोजावे लागतात. याआधी विवाह नोंदणी कधी करावी यासाठी कोणतीही अट नव्हती. आता सहा महिन्यांच्या आत नोंदणी करणे बंधनकारक आहे. अर्जावर विवाह लावलेल्या गुरूजींची सही असणे आवश्यक आहे. वधू-वरांनी लग्नापूर्वीच अर्ज आणून ठेवला असेल, तर तत्काळ सही दिली जाते. मात्र, नसल्यास सहा महिन्यांच्या आत सही घेतली जाते.- संतोष वझे, गुरूजी क्षेत्रीय कार्यालयामध्ये विवाह नोंदणी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. वयाचा दाखला, निवासी पुरावा आदी कागदपत्रे, साक्षीदार यांची जमवाजमव केल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयामध्ये नोंदणी केली जाते. कार्यालयातर्फे ठराविक तारीख दिली जाते. त्यादिवशी उपस्थित राहून नोंदणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच प्रमाणपत्र मिळते. ३ महिन्यांच्या आत नोंदणी केल्यास ११० रुपये, १ वर्षाच्या आत २१० रुपये आणि त्यानंतर नोंदणी केल्यास ३१० रुपये शुल्क आकारले जाते.- विवाह निबंधक, विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय