शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

लग्नाची नोंदणी...पाहावी करून..

By admin | Updated: June 24, 2016 02:20 IST

लग्न पाहावं करून म्हणतात...त्याऐवजी लग्नाची नोंदणी पाहावी करून..असे म्हणण्याची वेळ आली आहे. विवाह नोंदणी कार्यालयाला असलेला एजंटांचा विळखा

प्रज्ञा केळकर-सिंग/ नम्रता फडणीस,  पुणेलग्न पाहावं करून म्हणतात...त्याऐवजी लग्नाची नोंदणी पाहावी करून..असे म्हणण्याची वेळ आली आहे. विवाह नोंदणी कार्यालयाला असलेला एजंटांचा विळखा आणि त्याला कर्मचाऱ्यांची कथीत छुपा पाठिंबा यामुळे दीडशे रुपयांच्या कामासाठी दोन हजार रुपये मोजण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये विवाह नोंदणी कार्यालयाच्या आवाराला एजंटांचा विळखा असल्याचे दिसून आले. कार्यालयात जाण्याअगोदरच सावज शोधणारे हे एजंट नागरिकांना गाठतात. सरळ पद्धतीने काम होणारच नाही, याची खात्री देतात. त्यामुळे नाइलाजाने नागरिकांना एजंटांशी व्यवहार करावा लागतो. नोकरीमध्ये नाव बदलण्यासाठी तसेच पासपोर्टसाठी ‘मॅरेज सर्टिफिकेट’ जरुरीचे असते. धार्मिक पद्धतीने लग्न झाल्यावर नोंदणी प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे अनेक दाम्पत्यांकडून विवाहाची नोंदणी होत नाही. अचानक गरज पडल्यावर नोंदणीची आठवण होते. वास्तविक महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्येही नोंदणीची सुविधा आहे. मात्र, याची कल्पनाच नागरिकांना नाही. ‘लोकमत’ प्रतिनिधी विवाह नोंदणी करण्यासाठी विवाह निबंधक कार्यालयात चौकशीसाठी गेल्या असता, थेट गाठ पडली ती एजंटशीच. ‘तुम्ही वकील आहात का?’ असा प्रश्न विचारून एजंटने आधी चाचपणी केली. परंतु, मोकळेपणाने बोलत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी सांगायला सुरुवात केली. अर्ज दाखल करणे, कार्यालयाची वेळ घेणे, अर्जदाराला कळवणे, पती-पत्नी तसेच साक्षीदारांनी दिलेल्या वेळी उपस्थित राहण्यास सांगणे ही सगळी कामे एजंट करताना दिसतात. अर्जदार हेरून त्यांना ‘काय काम आहे’ असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे मासा पटकन गळाला लागतो. विवाह नोंदणी कार्यालयाच्या परिसरात सध्या तब्बल ३० एजंट सक्रिय आहेत. याच कामावर उदरनिर्वाह होत असल्याने जास्तीत जास्त अर्जदार मिळण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते.थेट गेलात तर मारावे लागतील हेलपाटे!अर्जदार : मला कंपनीच्या कामासाठी परदेशी जाण्याची संधी मिळालीये पण, मॅरेज सर्टिफिक नसल्याने काम अडलंय. काय करता येईल?एजंट : मॅडम, काहीच अडचण येणार नाही. आवश्यक कागदपत्रे आणून द्या. ३० दिवसांत तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल.अर्जदार : पण, तुमच्याकडून प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळू शकेल का?एजंट : प्रमाणपत्र लवकर हवे असेल, तर तुमच्या परिसरातील क्षेत्रीय कार्यालयामध्ये ‘ड’ प्रभागात ही सोय उपलब्ध केली आहे. आमच्याकडे काढले, तरीही ३० दिवस लागतीलच. पुणे आणि पुण्याबाहेर विवाह झाला असेल तरी इथे काम होईल?अर्जदार : ठीक आहे; तुम्ही तेवढाच कालावधी लावणार, मग एजंटचा फायदा काय? एजंट : मॅडम, एजंटचा फायदा काय माहितीये का, तुम्हाला केवळ सहीसाठी एकदाच यावे लागेल. मागतील ती कागदपत्रे द्यायची, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सह्या करायच्या, झेरॉक्स काढायच्या, अ‍ॅफिडेव्हिट करायचे...तीस दिवसांनंतर प्रमाणपत्र थेट तुमच्या हातात पडेल. त्यात पैसे एकदम द्यावे लागणार नाहीत. सुरुवातीला हजार आणि काम झाल्यावर हजार. तुमचे हेलपाटेही वाचतील.अर्जदार : या कामासाठी किती पैसे लागतील?एजंट : विवाहाचा हंगाम असेल, तर ३००० रुपये आणि आॅफ सिझनला २००० रुपये...अर्जदार : बापरे, एवढे का? थेट कार्यालयामध्ये यापेक्षा स्वस्तात काम होऊ शकते ना!एजंट : मॅडम, थोडं समजून घ्या; आतमध्ये गेलात तरी हजार रुपये लागतीलच. शिवाय, सारखे हेलपाटे मारावे लागणार. आम्ही केवळ १००० रुपयेच जास्त घेतो. त्यात, आतमध्येही चिरीमिरी द्यावी लागतेच ना; आमच्या खिशात जेमतेम ५००-६०० रुपये येणार...एजंटचा इतका मोठ्या प्रमाणावर कार्यालयाच्या बाहेर सुळसुळाट असणे, याला कार्यालयातील अधिकाऱ्यांचाही तितकाच छुपा पाठिंबा आहे, हे एजंटशी साधलेल्या संवादातून समोर आले. आम्हाला जेमतेम ८००-१००० रुपये मिळतात, बाकी काय ते तुम्हीच समजून घ्या’, असे एजंटने नकळतपणे सांगितले.विवाह निबंधक कार्यालयात चौकशी केली असता, विवाह नोंदणीसाठी केवळ १५० रुपये लागतात आणि अगदीच उशीर झाला, तर लग्न झाल्यापासून प्रत्येक महिन्याचा १०० रुपये दंड याप्रमाणे पैसे भरावे लागतात, अशी माहिती मिळाली. इथेही, कागदपत्रे दाखल केल्यानंतर ३० दिवसांनंतर नोंदणीची तारीख मिळते. केवळ, कागदपत्रांचा काही गोंधळ असेल, तर कार्यालयाने सांगितलेल्या दिवशी कागदपत्रे घेऊन हजर राहावे लागते. असे असतानाही, एजंटमार्फत विवाह नोंदणी काढण्याचे प्रमाण वाढत असल्याचे ‘लोकमत’ पाहणीतून समोर आले आहे.आता क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हा अर्ज आणि नोंदणी यासाठी १४० रूपये मोजावे लागतात. याआधी विवाह नोंदणी कधी करावी यासाठी कोणतीही अट नव्हती. आता सहा महिन्यांच्या आत नोंदणी करणे बंधनकारक आहे. अर्जावर विवाह लावलेल्या गुरूजींची सही असणे आवश्यक आहे. वधू-वरांनी लग्नापूर्वीच अर्ज आणून ठेवला असेल, तर तत्काळ सही दिली जाते. मात्र, नसल्यास सहा महिन्यांच्या आत सही घेतली जाते.- संतोष वझे, गुरूजी क्षेत्रीय कार्यालयामध्ये विवाह नोंदणी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. वयाचा दाखला, निवासी पुरावा आदी कागदपत्रे, साक्षीदार यांची जमवाजमव केल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयामध्ये नोंदणी केली जाते. कार्यालयातर्फे ठराविक तारीख दिली जाते. त्यादिवशी उपस्थित राहून नोंदणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच प्रमाणपत्र मिळते. ३ महिन्यांच्या आत नोंदणी केल्यास ११० रुपये, १ वर्षाच्या आत २१० रुपये आणि त्यानंतर नोंदणी केल्यास ३१० रुपये शुल्क आकारले जाते.- विवाह निबंधक, विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय