शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

पुणे आकाशवाणीसह ७ शहरांत प्रादेशिक बातमीपत्र चालूच

By admin | Updated: August 12, 2016 04:41 IST

पुणे, धारवाड, इंदूर, त्रिची आणि अन्य काही शहरांतील आकाशवाणी केंद्रांचे प्रादेशिक बातमीपत्र बंद न करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे.

नवी दिल्ली : पुणे, धारवाड, इंदूर, त्रिची आणि अन्य काही शहरांतील आकाशवाणी केंद्रांचे प्रादेशिक बातमीपत्र बंद न करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे. ही प्रादेशिक बातमीपत्रे सुरूच ठेवण्याचे निर्देश प्रसार भारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश यांनी दिल्याचे समजते.आकाशवाणीचे महासंचालक (वृत्त) सीतांशू यांनी जारी केल्या पत्रकानुसार पुणे, इंदूर, भूज, धारवाड, दिब्रूगड, त्रिची आणि कोझीकोड येथील आकाशवाणी केंद्रांचे प्रादेशिक वृत्त विभागाच्या बातमीपत्र, मुख्य बातम्या आणि कार्यक्रम यासारख्या सेवा नेहमीप्रमाणे चालू राहतील. अलाहाबाद, पौडी, जालंधर, पटियाला, कोइम्बतूर आणि कोची येथील बातमीदार पुढील आदेशापर्यंत या भागात आपले काम करीत राहतील. माहिती आणि नभोवाणी मंत्रालय काही शहरांतील आकाशवाणी केंद्रातील अनेक दशकांपासूनची वृत्तसेवा बंद करणार, असे वृत्त आल्याने आकाशवणीचे श्रोते नाराज झाले होते.सूर्यप्रकाश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही सेवा सुरूच राहणार असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. यासाठी मी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंतीही करीन, असेही ते म्हणाले.मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार आकाशवाणी केंद्रांतून प्रादेशिक बातम्या देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. (वृत्तसंस्था)