शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

प्रादेशिक उद्यानाची जमीन बिल्डरांच्या घशात

By admin | Updated: April 26, 2016 03:09 IST

अडवली - भुतावली परिसरातील प्रस्तावित प्रादेशिक उद्यानाच्या कार्यक्षेत्रामधील मूळ ग्रामस्थांची व खासगी वनासाठी राखीव जमीन व्यावसायिकांनी विकत घेतली आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई -अडवली - भुतावली परिसरातील प्रस्तावित प्रादेशिक उद्यानाच्या कार्यक्षेत्रामधील मूळ ग्रामस्थांची व खासगी वनासाठी राखीव जमीन व्यावसायिकांनी विकत घेतली आहे. या परिसरामध्ये गृहनिर्माण प्रकल्प उभारून करोडो रूपयांची कमाई करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. या परिसरातील एकमेव ग्रीन बेल्टचे अस्तित्व धोक्यात आले असून येथील जमीन खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे. विकासाच्या नावाखाली नवी मुंबईमधील नैसर्गिक संपत्ती नष्ट करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. दगडखाणीसाठी डोंगर रांगांचा बळी देण्यात आला आहे. मँग्रोजवर भराव टाकला जात आहे. सद्यस्थितीमध्ये ठाणे व कल्याणच्या सीमेवर असलेला अडवली भुतावली परिसर हा एकमेव ग्रीनबेल्ट शिल्लक राहिला आहे. पालिकेची स्थापना झाल्यानंतर नोव्हेंबर १९९५ मध्येच अडवली व बोरीवली परिसरातील तब्बल ६४४ हेक्टर जमिनीवर प्रादेशिक उद्यान उभारण्याचा ठराव केला होता. मार्च २००६ मध्ये येथील खासगी मालकीची १३० हेक्टर व वनविभागाची ५१३ हेक्टर जमीन हस्तांतर करून घेण्याचा प्रस्तावही सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. परंतु यानंतर जमिनीचे हस्तांतर झालेच नाही. उलट येथील वैयक्तिक मालकीची व खासगीसह वने यासाठी राखीव जमिनी बिल्डर व धनदांडग्यांना विकण्यास सुरवात झाली. एकाच कंपनीने शंभर एकरपेक्षा जास्त जमीन खरेदी केली आहे. विशेष म्हणजे कूळ जमिनीही विकत घेतल्या आहेत. खासगी वनांसाठीच्या जमिनीचा विकास करता येणार नाही असे सांगून शेतकऱ्यांकडून त्या अत्यंत अल्प किमतीमध्ये विकत घेतल्या आहेत. काही नागरिकांनी गृहनिर्माण संस्था तयार करून मोठ्याप्रमाणात जमीन खरेदी केली आहे. पालिकेने प्रादेशिक वन बनविण्याचे निश्चित केल्यानंतर बहुतांश व्यवहार झाले आहेत. पालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठराव मंजूर केल्यानंतर या परिसरातील जमिनींची विक्री झालीच कशी असा प्रश्न निर्माण होत आहे. पालिका तेथील शेतकऱ्यांची व वनविभागाची जमीन घेवून प्रादेशिक उद्यान तयार करणार होती. मग बिल्डर व मोठ्या व्यावसायिकांनी जमिनीच्या खरेदीचे व्यवहार सुरू केल्यानंतर ते थांबविण्यासाठी प्रयत्न का झाले नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेने या व्यावसायिकांचीही जमीन ताब्यात घेवून तेथे उद्यान विकसित केले पाहिजे अशी मागणी केली जात आहे. या ठिकाणी जमीन खरेदी- विक्री करण्यामध्ये राजकीय व प्रशासकीय वरदहस्त आहे का याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. महापालिकेकडे एका व्यावसायिकाने गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. वास्तविक राजकीय किंवा तितक्याच महत्वाच्या शक्तीचा वरदहस्त असल्याशिवाय प्रस्तावित उद्यानाची जागा कोणी खरेदी करण्याचे धाडस करणार नाही. यामुळे शासनाने येथील खरेदी - विक्रीच्या व्यवहाराची विशेष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

अडवली - भुतावली परिसरातील सर्व जमिनीचे सात - बारा उतारे लोकमतला मिळाले आहेत. या उता:यामधून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. कूळ कायद्याखाली देण्यात आलेल्या जमिनीचीही विक्री केली आहे. या परिसरात तब्बल 513 हेक्टर वन जमीन आहे. यामधील 9क् टक्के खासगी वन जमिनीची खरेदी व्यावसायिकांनी केली आहे. ठरावीक श्रीमंत व्यक्ती व संस्थांनी याठिकाणी गुंतवणूक केली असल्याचे या कागदपत्रंवरून स्पष्ट होवू लागले आहे.