शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

विधिमंडळात प्रादेशिक फूट!

By admin | Updated: April 8, 2015 01:43 IST

महाराष्ट्राचा विभागवार अनुशेष दूर व्हावा यासाठी नेमलेल्या केळकर समितीच्या अहवालावरील चर्चेने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रादेशिक फुटीची बीजं रोवली

अतुल कुलकर्ण, मुंबईमहाराष्ट्राचा विभागवार अनुशेष दूर व्हावा यासाठी नेमलेल्या केळकर समितीच्या अहवालावरील चर्चेने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रादेशिक फुटीची बीजं रोवली. शिवाय पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून नेत्यांना आपापल्या भागांचे प्रतिनिधित्व करण्यासही या समितीच्या अहवालाने भाग पाडल्याचे चित्र आज राज्यासमोर आले. विधानसभेत काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या अहवालाच्या काही शिफारशी नक्कीच मान्य केल्या पाहिजेत, असे सांगत अभ्यासपूर्ण विवेचन केले; मात्र त्यांच्याच पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विधान परिषदेत पक्षीय अस्मिता बाजूला सारत संपूर्ण अहवाल केराच्या टोपलीत टाकण्याची मागणी केली. विधानसभेत भाजपा सदस्य राजेंद्र पाटणी, डॉ. अनिल बोंडे यांनी अहवालावर कडाडून टीका केली तर याच पक्षाच्या नेत्या शोभाताई फडणवीस यांनी मात्र हा अहवाल स्वीकारण्याची मागणी केली. दोन्ही पक्षांच्या सदस्यांमधील हे टोकाचे मतभेद दोन्ही सभागृहांत दिसत असताना राज्यमंत्री असणारे शिवसेनेचे विजय शिवतरे यांनी पश्चिम महाराष्ट्राची बाजू घेत अवघ्या विदर्भाचे सदस्य अंगावर घेतले. माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात या विषयावर चर्चा करताना प्रादेशिक फुटीची बीजं रोवली जाऊ नयेत, अशी अपेक्षा केली खरी; पण दोन्ही सभागृहांमधील भाषणांनी केवळ फुटीचीच नाहीतर पक्षातल्या सदस्यांनादेखील एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचे काम केले आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी पश्चिम महाराष्ट्राची बाजू घेतली तेव्हा भाजपाचेच सदस्य त्यांच्या अंगावर धावून गेले. विदर्भाकडे मुख्यमंत्री पद असताना विदर्भाच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेण्याच्या तयारीत विदर्भाचे आमदार नव्हते. तर उर्वरित महाराष्ट्र म्हणजे फक्त पश्चिम महाराष्ट्र नाही, त्यात खानदेश आणि कोकणसुद्धा येतो असे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना सांगावे लागत होते. टोकाचा विरोधाभास केळकर समितीने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उभे करण्यात मात्र यश मिळवले. उद्यादेखील या अहवालावर चर्चा होणार आहे. सरकारने हा अहवाल स्वीकारला किंवा नाकारलेला नाही. दोन्ही सभागृहांतील सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकार यावरील ‘अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट’ तयार करेल आणि केळकर समितीच्या शिफारशी मान्य करायच्या की नाही याचा अंतिम निर्णय सरकार घेईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले आहे.