शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

राजसत्ता भोंदूबाबाच्या चरणी

By admin | Updated: October 19, 2016 05:47 IST

नरेंद्र महाराजांच्या दरबारातील मुख्यंत्र्यांची उपस्थिती म्हणजे सध्या राजसत्ता भोंदूबाबांच्या चरणी गेल्याचे निदर्शक आहे

करमाळा (जि. सोलापूर) : नरेंद्र महाराजांच्या दरबारातील मुख्यंत्र्यांची उपस्थिती म्हणजे सध्या राजसत्ता भोंदूबाबांच्या चरणी गेल्याचे निदर्शक आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर मंगळवारी तोफ डागली. राज्यात गुन्हेगारी व पोलिसांवरील वाढलेले हल्ले, हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे, असेही पवार यांनी सांगितले.येत्या नगर परिषदा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करमाळा तालुक्यातील पक्ष पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार शामलताई बागल उपस्थित होत्या. आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ६० टक्के युवक व नवीन चेहऱ्यांना तिकीट दिले जाईल. अवैध धंदेवाले, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी देऊ नका, असे स्पष्ट आदेश पक्षाचे सर्वेसर्वा श्रद पवार यांनी दिले असून, यामुळे पक्षाचा संदेश जनतेत चांगला जाईल, असे अजित पवार म्हणाले. जे पक्षाशी मागील निवडणुकीत गद्दारी करून अद्यापही पक्षाच्या पदावर आहेत अशांना जिल्हाध्यक्षांनी पदावरून काढून टाकावे, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या. बडतर्फीची कारणेजिथे नगरपालिकेची निवडणूक आहे तेथेच आचारसंहिता लागू करावी. महापालिका व ग्रामीण क्षेत्रात विनाकारण आचारसंहिता लागू केल्याने विकासकामांवर याचा परिणाम होणार असून, निवडणूक आयोगाने यासंबंधीचा निर्णय घ्यावा, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. मुख्यमंत्री व मंत्री शहरात गेले की साखर, दूध, कांदा स्वस्त व्हायला पाहिजे असे सांगतात तर ग्रामीण भागात आले की ते शेतकऱ्यांच्या बाजूने उसाला, दुधाला व कांद्याला जास्तीचा भाव मिळाला पाहिजे, अशा दोन्ही बाजूने बोलतात. सत्ताधारी बनवाबनवी करून जनतेची फसवणूक करीत आहेत.महागाई कमी करू, धनगर समाजास आरक्षण देऊ, अशी खोटी आश्वासने देऊन हे सरकार सत्तेवर आले आहे. ते आता नगर परिषद व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये घुसू पाहत असून, त्यांना वेळीच रोखा, असे आवाहनही पवार यांनी केले. (वार्ताहर)>पूर्वी पन्नास लाखांत आमदार फुटायचेनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेकांच्या पक्षांतर्गत कोलांटउड्या सुरू आहेत. त्यावर भाष्य करताना पूर्वी ५० लाख रुपयांमध्ये आमदार फुटायचे. मात्र, आता तेवढ्या पैशात नगरसेवकदेखील फुटत नाहीत, अशी टिप्पणीही पवार यांनी केली.