शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राजसत्ता भोंदूबाबाच्या चरणी

By admin | Updated: October 19, 2016 05:47 IST

नरेंद्र महाराजांच्या दरबारातील मुख्यंत्र्यांची उपस्थिती म्हणजे सध्या राजसत्ता भोंदूबाबांच्या चरणी गेल्याचे निदर्शक आहे

करमाळा (जि. सोलापूर) : नरेंद्र महाराजांच्या दरबारातील मुख्यंत्र्यांची उपस्थिती म्हणजे सध्या राजसत्ता भोंदूबाबांच्या चरणी गेल्याचे निदर्शक आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर मंगळवारी तोफ डागली. राज्यात गुन्हेगारी व पोलिसांवरील वाढलेले हल्ले, हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे, असेही पवार यांनी सांगितले.येत्या नगर परिषदा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करमाळा तालुक्यातील पक्ष पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार शामलताई बागल उपस्थित होत्या. आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ६० टक्के युवक व नवीन चेहऱ्यांना तिकीट दिले जाईल. अवैध धंदेवाले, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी देऊ नका, असे स्पष्ट आदेश पक्षाचे सर्वेसर्वा श्रद पवार यांनी दिले असून, यामुळे पक्षाचा संदेश जनतेत चांगला जाईल, असे अजित पवार म्हणाले. जे पक्षाशी मागील निवडणुकीत गद्दारी करून अद्यापही पक्षाच्या पदावर आहेत अशांना जिल्हाध्यक्षांनी पदावरून काढून टाकावे, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या. बडतर्फीची कारणेजिथे नगरपालिकेची निवडणूक आहे तेथेच आचारसंहिता लागू करावी. महापालिका व ग्रामीण क्षेत्रात विनाकारण आचारसंहिता लागू केल्याने विकासकामांवर याचा परिणाम होणार असून, निवडणूक आयोगाने यासंबंधीचा निर्णय घ्यावा, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. मुख्यमंत्री व मंत्री शहरात गेले की साखर, दूध, कांदा स्वस्त व्हायला पाहिजे असे सांगतात तर ग्रामीण भागात आले की ते शेतकऱ्यांच्या बाजूने उसाला, दुधाला व कांद्याला जास्तीचा भाव मिळाला पाहिजे, अशा दोन्ही बाजूने बोलतात. सत्ताधारी बनवाबनवी करून जनतेची फसवणूक करीत आहेत.महागाई कमी करू, धनगर समाजास आरक्षण देऊ, अशी खोटी आश्वासने देऊन हे सरकार सत्तेवर आले आहे. ते आता नगर परिषद व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये घुसू पाहत असून, त्यांना वेळीच रोखा, असे आवाहनही पवार यांनी केले. (वार्ताहर)>पूर्वी पन्नास लाखांत आमदार फुटायचेनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेकांच्या पक्षांतर्गत कोलांटउड्या सुरू आहेत. त्यावर भाष्य करताना पूर्वी ५० लाख रुपयांमध्ये आमदार फुटायचे. मात्र, आता तेवढ्या पैशात नगरसेवकदेखील फुटत नाहीत, अशी टिप्पणीही पवार यांनी केली.