शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राजसत्ता भोंदूबाबाच्या चरणी

By admin | Updated: October 19, 2016 05:47 IST

नरेंद्र महाराजांच्या दरबारातील मुख्यंत्र्यांची उपस्थिती म्हणजे सध्या राजसत्ता भोंदूबाबांच्या चरणी गेल्याचे निदर्शक आहे

करमाळा (जि. सोलापूर) : नरेंद्र महाराजांच्या दरबारातील मुख्यंत्र्यांची उपस्थिती म्हणजे सध्या राजसत्ता भोंदूबाबांच्या चरणी गेल्याचे निदर्शक आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर मंगळवारी तोफ डागली. राज्यात गुन्हेगारी व पोलिसांवरील वाढलेले हल्ले, हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे, असेही पवार यांनी सांगितले.येत्या नगर परिषदा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करमाळा तालुक्यातील पक्ष पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार शामलताई बागल उपस्थित होत्या. आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ६० टक्के युवक व नवीन चेहऱ्यांना तिकीट दिले जाईल. अवैध धंदेवाले, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी देऊ नका, असे स्पष्ट आदेश पक्षाचे सर्वेसर्वा श्रद पवार यांनी दिले असून, यामुळे पक्षाचा संदेश जनतेत चांगला जाईल, असे अजित पवार म्हणाले. जे पक्षाशी मागील निवडणुकीत गद्दारी करून अद्यापही पक्षाच्या पदावर आहेत अशांना जिल्हाध्यक्षांनी पदावरून काढून टाकावे, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या. बडतर्फीची कारणेजिथे नगरपालिकेची निवडणूक आहे तेथेच आचारसंहिता लागू करावी. महापालिका व ग्रामीण क्षेत्रात विनाकारण आचारसंहिता लागू केल्याने विकासकामांवर याचा परिणाम होणार असून, निवडणूक आयोगाने यासंबंधीचा निर्णय घ्यावा, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. मुख्यमंत्री व मंत्री शहरात गेले की साखर, दूध, कांदा स्वस्त व्हायला पाहिजे असे सांगतात तर ग्रामीण भागात आले की ते शेतकऱ्यांच्या बाजूने उसाला, दुधाला व कांद्याला जास्तीचा भाव मिळाला पाहिजे, अशा दोन्ही बाजूने बोलतात. सत्ताधारी बनवाबनवी करून जनतेची फसवणूक करीत आहेत.महागाई कमी करू, धनगर समाजास आरक्षण देऊ, अशी खोटी आश्वासने देऊन हे सरकार सत्तेवर आले आहे. ते आता नगर परिषद व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये घुसू पाहत असून, त्यांना वेळीच रोखा, असे आवाहनही पवार यांनी केले. (वार्ताहर)>पूर्वी पन्नास लाखांत आमदार फुटायचेनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेकांच्या पक्षांतर्गत कोलांटउड्या सुरू आहेत. त्यावर भाष्य करताना पूर्वी ५० लाख रुपयांमध्ये आमदार फुटायचे. मात्र, आता तेवढ्या पैशात नगरसेवकदेखील फुटत नाहीत, अशी टिप्पणीही पवार यांनी केली.