शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

भारत-पाक अंतिम सामना "फिक्स" असल्याची शंका, चौकशी व्हावी: रामदास आठवले

By admin | Updated: July 2, 2017 08:15 IST

उलट-सुलट विधानं करुन नेहमीच चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केलं आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 2 - उलट-सुलट विधानं करुन नेहमीच चर्चेत राहणारे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केलं आहे.  नुकत्याच झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाककडून भारताचा दारुण पराभव झाला. भारताचा इतक्या लाजिरवाण्या पद्धतीने पराभव होणे, हे संशयास्पद आहे. तो सामना ‘फिक्स’ तर नव्हता ना? अशी शंका येते. त्यामुळे त्या सामन्याची सखोल चौकशी व्हावी, असं आठवले म्हणाले. शनिवारी एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता रविभवनात ते पत्रकारांशी बोलत होते. 
 
यावेळी बोलताना क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या खेळाडूंना २५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणीही आठवलेंनी केली.  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याविषयी बोलताना, साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यात भारताने पाकचा एकतर्फी पराभव केला होता. असे असताना अंतिम सामन्यात भारताचा इतक्या लाजिरवाण्या पद्धतीने पराभव होणे, हे संशयास्पद आहे. तो सामना ‘फिक्स’ तर नव्हता ना? अशी शंका येते. त्यामुळे त्या सामन्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.  
 
तसेच शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करताना विविध मागासवर्गीय महामंडळातील कर्जही माफ करण्यात यावे, याचा पुनरुच्चार आठवले यांनी केला. याशिवाय स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर रिपाइंची भूमिका स्पष्ट असून, येत्या २५ ऑगस्टपासून आंदोलन सुरू केले जाईल, असेही रामदास आठवले यांनी सांगितले. गोरक्षकांचा जो हैदोस सुरू आहे, त्याचा निषेध करीत गोवंश हत्या या शब्दातून ‘वंश’ हा शब्द काढण्यात यावा, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गोहत्येला प्रतिबंध करणाऱ्या जुन्याच कायद्याची अंमलबजावणी व्हावी, असेही ते म्हणाले.