शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

भारत-पाक अंतिम सामना "फिक्स" असल्याची शंका, चौकशी व्हावी: रामदास आठवले

By admin | Updated: July 2, 2017 08:15 IST

उलट-सुलट विधानं करुन नेहमीच चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केलं आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 2 - उलट-सुलट विधानं करुन नेहमीच चर्चेत राहणारे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केलं आहे.  नुकत्याच झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाककडून भारताचा दारुण पराभव झाला. भारताचा इतक्या लाजिरवाण्या पद्धतीने पराभव होणे, हे संशयास्पद आहे. तो सामना ‘फिक्स’ तर नव्हता ना? अशी शंका येते. त्यामुळे त्या सामन्याची सखोल चौकशी व्हावी, असं आठवले म्हणाले. शनिवारी एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता रविभवनात ते पत्रकारांशी बोलत होते. 
 
यावेळी बोलताना क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या खेळाडूंना २५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणीही आठवलेंनी केली.  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याविषयी बोलताना, साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यात भारताने पाकचा एकतर्फी पराभव केला होता. असे असताना अंतिम सामन्यात भारताचा इतक्या लाजिरवाण्या पद्धतीने पराभव होणे, हे संशयास्पद आहे. तो सामना ‘फिक्स’ तर नव्हता ना? अशी शंका येते. त्यामुळे त्या सामन्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.  
 
तसेच शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करताना विविध मागासवर्गीय महामंडळातील कर्जही माफ करण्यात यावे, याचा पुनरुच्चार आठवले यांनी केला. याशिवाय स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर रिपाइंची भूमिका स्पष्ट असून, येत्या २५ ऑगस्टपासून आंदोलन सुरू केले जाईल, असेही रामदास आठवले यांनी सांगितले. गोरक्षकांचा जो हैदोस सुरू आहे, त्याचा निषेध करीत गोवंश हत्या या शब्दातून ‘वंश’ हा शब्द काढण्यात यावा, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गोहत्येला प्रतिबंध करणाऱ्या जुन्याच कायद्याची अंमलबजावणी व्हावी, असेही ते म्हणाले.