शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

विभागनिहाय वीज कंपन्या स्थापन्यास विरोध

By admin | Updated: April 28, 2015 01:32 IST

विजेची वाढती तूट आणि वीजबिलाची न होणारी वसुली यातून मार्ग काढण्यासाठी आता विभागनिहाय स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत़

यवतमाळ : विजेची वाढती तूट आणि वीजबिलाची न होणारी वसुली यातून मार्ग काढण्यासाठी आता विभागनिहाय स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत़ परंतु या निर्णयाला वीज कर्मचाऱ्यांच्या सात संघटनांनी रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत तीव्र विरोध दर्शविला आहे. एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे उपमहासचिव कृष्णा भोयर म्हणाले, भाजपा-सेना युती सरकार स्थापन झाल्यापासून ऊर्जामंत्र्यांनी कधीही वीज कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही संघटनेला चर्चेसाठी बोलावले नाही़ त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या नाहीत. वीज कंपनीत आधीच मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची वानवा आहे. त्यावर मात करून मासिक महसूल साडेचार हजार कोटींवर पोहोचविला गेला असून, विजेची तूट १४ टक्क्यांपर्यंत खाली आणली गेली आहे. त्यानंतरही आता विभागनिहाय वीज कंपन्या स्थापण्याचा निर्णय परस्परच घेतला गेला आहे. तीनही कंपन्यांचे व्यवस्थापन चांगले असताना महावितरणच्या विभाजनाचा हा निर्णय नुकसानकारक ठरणार आहे. या विभाजनामुळे अधिकारी आणि कार्यालयांची संख्या वाढणार असून, मुळात आवश्यकता असलेल्या कामगारांची संख्या मात्र तेवढीच राहणार आहे. ४० ते ६० टक्के वीज हानी असलेल्या फिडरवर फ्रँचायझीचा निर्णय घेतला गेला आहे. २० एप्रिलला त्यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आले. मात्र या वीज हानीसाठी विजेची थेट होणारी चोरी, ग्राहकांनी देयक न भरणे आणि कारवाईसाठी गेल्यास त्यात राजकीय हस्तक्षेप होणे ही प्रमुख कारणे जबाबदार असल्याचे भोयर यांनी स्पष्ट केले. सातही वीज संघटनांनी प्रादेशिक वीज कंपन्या, फ्रँचायझी तसेच अन्य विविध मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली. ऊर्जा मंत्रालयाने दोन आठवड्यांत यासंबंधी चर्चेसाठी संघटनांना पाचारण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भोयर यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)