शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विभागनिहाय वीज कंपन्या स्थापन्यास विरोध

By admin | Updated: April 28, 2015 01:32 IST

विजेची वाढती तूट आणि वीजबिलाची न होणारी वसुली यातून मार्ग काढण्यासाठी आता विभागनिहाय स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत़

यवतमाळ : विजेची वाढती तूट आणि वीजबिलाची न होणारी वसुली यातून मार्ग काढण्यासाठी आता विभागनिहाय स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत़ परंतु या निर्णयाला वीज कर्मचाऱ्यांच्या सात संघटनांनी रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत तीव्र विरोध दर्शविला आहे. एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे उपमहासचिव कृष्णा भोयर म्हणाले, भाजपा-सेना युती सरकार स्थापन झाल्यापासून ऊर्जामंत्र्यांनी कधीही वीज कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही संघटनेला चर्चेसाठी बोलावले नाही़ त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या नाहीत. वीज कंपनीत आधीच मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची वानवा आहे. त्यावर मात करून मासिक महसूल साडेचार हजार कोटींवर पोहोचविला गेला असून, विजेची तूट १४ टक्क्यांपर्यंत खाली आणली गेली आहे. त्यानंतरही आता विभागनिहाय वीज कंपन्या स्थापण्याचा निर्णय परस्परच घेतला गेला आहे. तीनही कंपन्यांचे व्यवस्थापन चांगले असताना महावितरणच्या विभाजनाचा हा निर्णय नुकसानकारक ठरणार आहे. या विभाजनामुळे अधिकारी आणि कार्यालयांची संख्या वाढणार असून, मुळात आवश्यकता असलेल्या कामगारांची संख्या मात्र तेवढीच राहणार आहे. ४० ते ६० टक्के वीज हानी असलेल्या फिडरवर फ्रँचायझीचा निर्णय घेतला गेला आहे. २० एप्रिलला त्यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आले. मात्र या वीज हानीसाठी विजेची थेट होणारी चोरी, ग्राहकांनी देयक न भरणे आणि कारवाईसाठी गेल्यास त्यात राजकीय हस्तक्षेप होणे ही प्रमुख कारणे जबाबदार असल्याचे भोयर यांनी स्पष्ट केले. सातही वीज संघटनांनी प्रादेशिक वीज कंपन्या, फ्रँचायझी तसेच अन्य विविध मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली. ऊर्जा मंत्रालयाने दोन आठवड्यांत यासंबंधी चर्चेसाठी संघटनांना पाचारण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भोयर यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)