शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
7
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
8
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
9
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
10
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
11
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
12
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
13
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
14
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
15
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
16
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
18
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
19
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
20
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे

कारवाई पुढे ढकलण्यास नकार

By admin | Updated: January 13, 2016 01:50 IST

मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका बळकवणाऱ्यांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. घरे खाली करा किंवा जबरदस्तीने खाली

मुंबई : मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका बळकवणाऱ्यांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. घरे खाली करा किंवा जबरदस्तीने खाली करण्यात येतील, अशी तंबी राज्य सरकारने दिल्याने आठ जणांनी ही कारवाई थांबवण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाने ही कारवाई पुढे ढकलण्यास नकार दिला.मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातून नेते, त्यांचे नातेवाईक, सनदी अधिकारी आणि पत्रकारांनी बेकायदेशीरपणे दोन व त्यापेक्षा अधिक सदनिका बळकवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे होती.उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जे. ए. पाटील यांच्या समितीने केलेल्या शिफारशींनुसार कारवाई करण्यास सुरुवात करा, असा आदेश खंडपीठाने गेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारला दिला होता. त्या आदेशाची अंमलबजावणी करत राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे अधिकारी घनश्याम मेष्टा, एलआयसी अधिकारी सचिन वर्तक, पोलीस अधिकारी मधुकर सूर्यवंशी, प्रशांत झवेरी, राहुल पाटील, अनिल वोरा, तानाजी माने आणि कांताबाई बोहरा यांना घरे खाली करा किंवा जबरदस्तीने खाली करण्यात येतील, अशी तंबी राज्य सरकारने दिली. त्यामुळे या आठही जणांनी आठ आठवडे ही कारवाई पुढे ढकलण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. (प्रतिनिधी)अहवालाची केली मागणीसमितीचा अहवाल आम्हाला देण्यात यावा. आम्ही संबंधित प्राधिकरणापुढे या अहवालाला आव्हान देऊ, यासाठी आम्हाला आठ आठवड्यांची मुदत द्या. तोपर्यंत या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी विनंती आठही जणांच्या वकिलांनी खंडपीठाला केली. त्यावर खंडपीठाने अहवाल मिळवण्यासाठी एक अर्ज करा, असे सांगत कारवाईला आठ आठवड्यांची स्थगिती देण्यास नकार दिला.