शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
2
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
3
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
4
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
5
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
6
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
7
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
8
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
9
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
10
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
11
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
12
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
13
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
14
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
15
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
16
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
17
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
18
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
19
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
20
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज

माध्यमात हवे बदलाचे प्रतिबिंब

By admin | Updated: May 8, 2017 03:13 IST

गेल्या काही वर्षांमध्ये देशात आमूलाग्र बदल होत आहेत. शासन व्यवस्थेपासून समाजमनापर्यंत हे बदल होत आहेत. देशामधून भ्रष्टाचार हद्दपार

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गेल्या काही वर्षांमध्ये देशात आमूलाग्र बदल होत आहेत. शासन व्यवस्थेपासून समाजमनापर्यंत हे बदल होत आहेत. देशामधून भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना जनतेने स्वीकारल्या आहेत. यामधून एक नवी मानसिकता घडत आहे. देश बदलत असताना त्याचे प्रतिबिंब मात्र प्रसारमाध्यमांमध्ये दिसत नसल्याची खंत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ज. स. करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जावडेकर यांचे ‘बदलता भारत आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संघाचे अध्यक्ष गजेंद्र बढे, सरचिटणीस अजय कांबळे उपस्थित होते. जावडेकर म्हणाले, ‘देशामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर मोदी सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. ग्रामीण विकास, दिव्यांगांसाठी योजना, कृषी विमा, साक्षरता, ऊर्जा अशा विविध क्षेत्रांत योजना राबविल्या आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, असे त्यांनी सांगितले. एकीकडे शालेय मुले स्वच्छ भारताचे दूत बनून गावकऱ्यांसह आई-वडिलांनाही स्वच्छतेचे धडे देत आहेत. आतापर्यंत एक लाखाहून अधिक गावे हगणदरीमुक्त झाली आहेत, तर दुसरीकडे लालबहादूर शास्त्रींच्या आवाहनावरून देशवासीयांना सोमवारी उपवास सुरू केले होते. मोदींच्या आवाहनानंतर सव्वा लाख नागरिकांनी गॅस सिलिंडरवरील सबसिडी सोडली. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत सर्वांचेच अंदाज चुकीचे ठरले. मायावतींनी भाजपाला मुस्लिम मते मिळणार नाहीत, असे म्हटले होते. मात्र, देशाची प्रगती आणि विकासात वाटा हवा असलेल्या नागरिकांनी भाजपाला मते दिली. संघाचे अध्यक्ष गजेंद्र बढे यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार संघाचे सदस्य लक्ष्मण मोरे यांनी सूत्रसंचालन केले. सागर येवले यांनी आभार मानले....तर माध्यमे मागे पडतीलएलईडी दिव्यांनी वीजबचत होते, तसेच बिलही कमी येते. मात्र तीन वर्षांपूर्वी ३५० रुपये किंमत असणारे बल्ब आता ७० रुपयांना मिळत आहेत. सरकारने जगातल्या सर्व उत्पादकांना एकत्र बोलावून पाच वर्षांत १०० कोटी बल्बची आॅर्डर देतो, असे सांगत किमती कमी करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. पूर्वी वैयक्तिक खिसे भरण्यासाठी ‘बार्गेनिंग’ व्हायचे; आता जनतेला किती देता यावर होते. मागील ७० वर्षांत व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी जे झाले नाही ते मोदी सरकारने लाल दिवे काढून करून दाखवले. मात्र, हे बदल प्रसारमाध्यमांना दिसत नाहीत. हे बदल टिपले नाहीत तर माध्यमे मागे पडतील, असे जावडेकर म्हणाले.