शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमात हवे बदलाचे प्रतिबिंब

By admin | Updated: May 8, 2017 03:13 IST

गेल्या काही वर्षांमध्ये देशात आमूलाग्र बदल होत आहेत. शासन व्यवस्थेपासून समाजमनापर्यंत हे बदल होत आहेत. देशामधून भ्रष्टाचार हद्दपार

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गेल्या काही वर्षांमध्ये देशात आमूलाग्र बदल होत आहेत. शासन व्यवस्थेपासून समाजमनापर्यंत हे बदल होत आहेत. देशामधून भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना जनतेने स्वीकारल्या आहेत. यामधून एक नवी मानसिकता घडत आहे. देश बदलत असताना त्याचे प्रतिबिंब मात्र प्रसारमाध्यमांमध्ये दिसत नसल्याची खंत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ज. स. करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जावडेकर यांचे ‘बदलता भारत आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संघाचे अध्यक्ष गजेंद्र बढे, सरचिटणीस अजय कांबळे उपस्थित होते. जावडेकर म्हणाले, ‘देशामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर मोदी सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. ग्रामीण विकास, दिव्यांगांसाठी योजना, कृषी विमा, साक्षरता, ऊर्जा अशा विविध क्षेत्रांत योजना राबविल्या आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, असे त्यांनी सांगितले. एकीकडे शालेय मुले स्वच्छ भारताचे दूत बनून गावकऱ्यांसह आई-वडिलांनाही स्वच्छतेचे धडे देत आहेत. आतापर्यंत एक लाखाहून अधिक गावे हगणदरीमुक्त झाली आहेत, तर दुसरीकडे लालबहादूर शास्त्रींच्या आवाहनावरून देशवासीयांना सोमवारी उपवास सुरू केले होते. मोदींच्या आवाहनानंतर सव्वा लाख नागरिकांनी गॅस सिलिंडरवरील सबसिडी सोडली. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत सर्वांचेच अंदाज चुकीचे ठरले. मायावतींनी भाजपाला मुस्लिम मते मिळणार नाहीत, असे म्हटले होते. मात्र, देशाची प्रगती आणि विकासात वाटा हवा असलेल्या नागरिकांनी भाजपाला मते दिली. संघाचे अध्यक्ष गजेंद्र बढे यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार संघाचे सदस्य लक्ष्मण मोरे यांनी सूत्रसंचालन केले. सागर येवले यांनी आभार मानले....तर माध्यमे मागे पडतीलएलईडी दिव्यांनी वीजबचत होते, तसेच बिलही कमी येते. मात्र तीन वर्षांपूर्वी ३५० रुपये किंमत असणारे बल्ब आता ७० रुपयांना मिळत आहेत. सरकारने जगातल्या सर्व उत्पादकांना एकत्र बोलावून पाच वर्षांत १०० कोटी बल्बची आॅर्डर देतो, असे सांगत किमती कमी करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. पूर्वी वैयक्तिक खिसे भरण्यासाठी ‘बार्गेनिंग’ व्हायचे; आता जनतेला किती देता यावर होते. मागील ७० वर्षांत व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी जे झाले नाही ते मोदी सरकारने लाल दिवे काढून करून दाखवले. मात्र, हे बदल प्रसारमाध्यमांना दिसत नाहीत. हे बदल टिपले नाहीत तर माध्यमे मागे पडतील, असे जावडेकर म्हणाले.