शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पोलिसांवरील कामाचा ताण कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 01:34 IST

राज्यातील पोलीस आठवड्याचे सातही दिवस २४ तास काम करीत असतात. त्यामुळे त्यांचे कामाचे तास कमी करून त्यांच्यावरील ताण कमी करा, असे म्हणत उच्च न्यायालयाने

मुंबई : राज्यातील पोलीस आठवड्याचे सातही दिवस २४ तास काम करीत असतात. त्यामुळे त्यांचे कामाचे तास कमी करून त्यांच्यावरील ताण कमी करा, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला यासंदर्भात धारेवर धरले. त्याशिवाय दहशतवादी व गुंड एके-४७सारखी अत्याधुनिक शस्त्रे वापरत असताना पोलीस मात्र जुनी-पुराणी रिव्हॉल्व्हर वापरत आहेत, त्यांनाही आॅटोमॅटिक शस्त्रे द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. अन्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांनाही सर्व सुविधा व भत्ते द्या. त्यांच्या पदोन्नतीसाठी प्रभावी धोरण आखा. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढेल. कॉन्स्टेबल पदावरचा माणूस हेड कॉन्स्टेबल होऊन निवृत्त होतो. त्यामुळे दर १२ वर्षांनी पदोन्नती द्या. चांगले काम करणाऱ्या पोलिसांना काम करण्यासाठी उत्तम वातावरण उपलब्ध करून द्या, असेही खंडपीठाने म्हटले. पुण्याच्या अश्विनी राणे यांनी त्यांचे पती निखिल राणे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. व्यवसायाने विकासक असलेले राणे यांची हत्या २३ नोव्हेंबर २००९ रोजी गोळ्या झाडून करण्यात आली. स्थानिक पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याने अश्विनी राणे यांनी या केसचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सीबीआयही या प्रकरणाचा तपास करण्यामध्ये अपयशी ठरली. त्यामुळे उच्च न्यायालयाने पोलीस दलातील त्रुटी दूर करण्यासाठी ही याचिका निकाली न काढता याचिकेची व्याप्ती वाढवली.न्यायालयाने फटकारलेया याचिकेच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी मुंबईत सध्या प्रायोगिक तत्त्वावर पोलिसांना आठ तास ड्युटी लावल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने हे धोरण राज्यभर राबवा, अशी सूचना सरकारला केली.‘आपल्याकडे पोलीस आठवड्याचे सातही दिवस २४ तास काम करीत असतात. त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करा. याबाबतही धोरण आखण्याचा विचार राज्य सरकारने करावा,’ असेही खंडपीठ हटले.