शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पोलिसांवरील कामाचा ताण कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 01:34 IST

राज्यातील पोलीस आठवड्याचे सातही दिवस २४ तास काम करीत असतात. त्यामुळे त्यांचे कामाचे तास कमी करून त्यांच्यावरील ताण कमी करा, असे म्हणत उच्च न्यायालयाने

मुंबई : राज्यातील पोलीस आठवड्याचे सातही दिवस २४ तास काम करीत असतात. त्यामुळे त्यांचे कामाचे तास कमी करून त्यांच्यावरील ताण कमी करा, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला यासंदर्भात धारेवर धरले. त्याशिवाय दहशतवादी व गुंड एके-४७सारखी अत्याधुनिक शस्त्रे वापरत असताना पोलीस मात्र जुनी-पुराणी रिव्हॉल्व्हर वापरत आहेत, त्यांनाही आॅटोमॅटिक शस्त्रे द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. अन्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांनाही सर्व सुविधा व भत्ते द्या. त्यांच्या पदोन्नतीसाठी प्रभावी धोरण आखा. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढेल. कॉन्स्टेबल पदावरचा माणूस हेड कॉन्स्टेबल होऊन निवृत्त होतो. त्यामुळे दर १२ वर्षांनी पदोन्नती द्या. चांगले काम करणाऱ्या पोलिसांना काम करण्यासाठी उत्तम वातावरण उपलब्ध करून द्या, असेही खंडपीठाने म्हटले. पुण्याच्या अश्विनी राणे यांनी त्यांचे पती निखिल राणे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. व्यवसायाने विकासक असलेले राणे यांची हत्या २३ नोव्हेंबर २००९ रोजी गोळ्या झाडून करण्यात आली. स्थानिक पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याने अश्विनी राणे यांनी या केसचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सीबीआयही या प्रकरणाचा तपास करण्यामध्ये अपयशी ठरली. त्यामुळे उच्च न्यायालयाने पोलीस दलातील त्रुटी दूर करण्यासाठी ही याचिका निकाली न काढता याचिकेची व्याप्ती वाढवली.न्यायालयाने फटकारलेया याचिकेच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी मुंबईत सध्या प्रायोगिक तत्त्वावर पोलिसांना आठ तास ड्युटी लावल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने हे धोरण राज्यभर राबवा, अशी सूचना सरकारला केली.‘आपल्याकडे पोलीस आठवड्याचे सातही दिवस २४ तास काम करीत असतात. त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करा. याबाबतही धोरण आखण्याचा विचार राज्य सरकारने करावा,’ असेही खंडपीठ हटले.