शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या निविदेला लालफितीचा विळखा

By admin | Updated: June 8, 2017 06:31 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचा ठेका जी.व्ही.के. कंपनीला देण्यात आला आहे

कमलाकर कांबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई: आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचा ठेका जी.व्ही.के. कंपनीला देण्यात आला आहे. परंतु चार महिने झाले तरी या निविदेला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळालेली नाही. निविदेला पडलेल्या लालफितीच्या विळख्यामुळे विमानतळाचे टेक आॅफ लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे सिडकोने गावांच्या स्थलांतरासह विमानतळपूर्व कामांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आवश्यक असलेल्या पर्यावरणविषयक मंजुरीही प्राप्त झाल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे. चार महिन्यांपूर्वी विमानतळ उभारणीच्या कामासाठी जीव्हीकेची निविदा या प्रकल्पाच्या उभारणीसाठी ग्राह्य धरण्यात आली आहे. परंतु त्यावर राज्य मंत्रिमंडळाची मोहोर लागणे शिल्लक राहिले आहे. मंत्रिमंडळाची मान्यता न मिळाल्याने विमानतळ उभारणीचे काम रखडले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डिसेंबर २0१९ मध्ये विमानाचे पहिले टेकआॅफ होईल, असा दावा राज्य सरकारने केला आहे. त्याअनुषंगाने सिडकोने विमानतळपूर्व कामांना गती दिली आहे. या कामांसाठी सुमारे २000 कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. यात उलवा टेकडीची उंची कमी करणे, जमिनीचे सपाटीकरण, उलवे नदीचा प्रवाह बदलणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या स्थलांतरित करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामांना काही स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे ही कामे पूर्ण करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.एकूणच विमानतळाचा पहिला टप्पा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. परंतु राज्य मंत्रिमंडळाकडून ठेकेदार निवडीच्या निविदेला मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याने सिडकोची कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीतही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाचे पहिले उड्डाण निर्धारित कालावधीतच होईल, असा दावा सिडकोकडून केला जात आहे.>सिडकोचे सकारात्मक प्रयत्ननवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्धारित वेळेतच पूर्ण होईल, असा ठाम विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना वाटतो आहे. त्या दृष्टीने त्यांनी कंबर कसली आहे. स्थलांतरित होणाऱ्या गावांच्या पुनर्वसनासह विमानतळपूर्व कामांवर त्यांनी भर दिला.२000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पपूर्व कामांना गती देण्यात आली आहे. या कामांत कोणताही अडथळा निर्माण होवू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. एकूणच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना आखल्या जात आहेत.