शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

५१ टक्के रहिवाशांच्या संमतीवर पुनर्विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:56 IST

मोडकळीस आलेल्या म्हाडाच्या वा खासगी जमिनीवरील इमारतींमधील ५१ टक्के रहिवाशांनी संमती दिल्यास त्या इमारतीच्या पुनर्विकासाची परवानगी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : मोडकळीस आलेल्या म्हाडाच्या वा खासगी जमिनीवरील इमारतींमधील ५१ टक्के रहिवाशांनी संमती दिल्यास त्या इमारतीच्या पुनर्विकासाची परवानगी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.मुंबईसह राज्यातील महापालिका, नगरपालिकांची आर्थिक परिस्थिती आणि तेथील विकास कामांमध्ये येत असलेल्या अडथळ्यांबाबत विधानसभेमध्ये नियम २९३ अन्वये उपस्थित झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देत होते.मुंबई उपनगरात मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये, भाडेकरू व्याप्त इमारतींमध्ये पुनर्विकासासाठी प्रोत्साहनात्मक एफएसआय दिला जाईल, असे जाहीर करतानाच, या म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडालाच विशेष प्राधिकरण म्हणून जाहीर करण्याचा आणि त्याद्वारे पुनर्विकासात गतिमानता आणण्याचा शासनाचा विचार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एखादा विकासक पुनर्विकासात दिरंगाई करीत असेल, तर रहिवाशांना अन्य विकासकास काम देता येईल, असे ते म्हणाले. महाराष्टÑ ओनरशिप अ‍ॅक्टनुसार सध्या १०० टक्के रहिवाशांच्या संमतीनेच पुनर्विकास करता येतो.मुंबई महानगर क्षेत्रासाठी (एमएमआर) एकच विकास नियंत्रण नियमावली चालू वर्षाअखेर लागू केली जाईल. विकासामध्ये सुसूत्रता येण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.२०१९ पर्यंत पुणे करणार डम्पिंगमुक्त-पुणे शहर २०१९ च्या अखेर डम्पिंगमुक्त करून कचºयाची त्याच दिवशी प्रक्रिया केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले की, वडगाव खुर्द येथे एक प्रकल्प उभारला जात आहे. रामटेकडी येथे दीड वर्षांत ७५० मेट्रिक टन क्षमतेचा कचºयापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभा राहील. आणखी एका प्रकल्पासाठी जागा दिलेली आहे.इमारत बांधकामासाठी आॅनलाइन परवानगीइमारतींच्या बांधकामासाठीची परवानगी आॅनलाइन दिली जाईल. राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये ही पद्धत चालू वर्षाअखेर सुरू होईल. त्यानंतर, ड वर्ग, क वर्ग व इतर महापालिकांमध्ये ती लागू केली जाईल. मुंबई महापालिकेने तशी सुरुवात आधीच केली आहे. बांधकाम परवानगीतील मानवी हस्तक्षेप संपविला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.विश्वास पाटील यांच्या निर्णयांची चौकशी-एसआरएचे सीईओ असताना विश्वास पाटील यांनी जून २०१७ या एकाच महिन्यात एसआरए प्रकल्पाच्या १३७ फायली काढल्या या आरोपांबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे, ती सखोल चौकशी करेल.१३७ पैकी ६४ प्रकरणांची छाननी झाली आहे. त्यातील कुठलाही प्रकल्प हा कार्यान्वित झालेला नाही. झालेल्या निर्णयांत अनियमितता आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. चौकशी अहवाल येत्या १५ दिवसांत आपल्याकडे येईल.