शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

उद्योगांना सांडपाण्याचा पुनर्वापर अनिवार्य

By admin | Updated: May 10, 2016 03:55 IST

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पाणी वाटपबाबत प्राधान्य कोणाला यावरून वातावरण तापले असताना आता सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणे उद्योगांना अनिवार्य करण्यात येणार आहे

मुंबई : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पाणी वाटपबाबत प्राधान्य कोणाला यावरून वातावरण तापले असताना आता सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणे उद्योगांना अनिवार्य करण्यात येणार आहे. या बाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज लोकमतला सांगितले. उद्योगांनी सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयोग मुंबई नजीकच्या तळोजा एमआयडीसीमध्ये यशस्वी झाला आहे. या नंतर पहिल्या टप्प्यात राज्यातील मोठ्या एमआयडीसींमध्ये सांडपाणी पुनर्वापरासाठीचे प्रकल्प उभारण्यात येतील. तसेच, उद्योगांनीही ते उभारावेत यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. असा पुनर्वापर मोठ्या प्रमाणात झाल्यास पिण्यासाठी आणि शेतीसाठी अधिक पाणी देणे शक्य होईल, असे देसाई म्हणाले. आपल्याकडे वापरलेल्या पाण्यापैकी ७० टक्के पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे. अनेक देशांमध्ये असा पुनर्वापर केला जातो. सिंगापूर हे त्यासाठीचे मॉडेल मानले जाते. तेथील पाणी पुनर्वापराचा अभ्यास करण्यासाठी एमआयडीसीची एक चमू लवकरच त्या ठिकाणी जाणार आहे, असे देसाई यांनी सांगितले. उद्योगांना पाणी दिल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याबाबत अन्याय होतो, अशी टीका बरेचदा होते. या बाबत देसाई म्हणाले की, पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम ठरलेला आहे. त्या नसुारच वाटप होत असते.उद्योगांवर पाणी पळविण्याचा आरोप होतो पण आज नवीमुंबई, मीरा भार्इंदर, ठाणे,उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, उरण व उरण तालुक्यातील २७ग्राम पंचायतींना एमआयडीसी स्वत:च्या पाणीसाठ्यांमधून पिण्याचे पाणी पुरविते. अशी राज्यात इतरत्रही अनेक उदाहरणे आहेत. (विशेष प्रतिनिधी)