शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
4
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
5
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
6
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
7
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
8
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
9
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
10
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
11
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
12
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
13
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
14
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले
15
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
16
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
17
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
18
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
19
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
20
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...

उद्योगांना सांडपाण्याचा पुनर्वापर अनिवार्य

By admin | Updated: May 10, 2016 03:55 IST

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पाणी वाटपबाबत प्राधान्य कोणाला यावरून वातावरण तापले असताना आता सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणे उद्योगांना अनिवार्य करण्यात येणार आहे

मुंबई : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पाणी वाटपबाबत प्राधान्य कोणाला यावरून वातावरण तापले असताना आता सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणे उद्योगांना अनिवार्य करण्यात येणार आहे. या बाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज लोकमतला सांगितले. उद्योगांनी सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयोग मुंबई नजीकच्या तळोजा एमआयडीसीमध्ये यशस्वी झाला आहे. या नंतर पहिल्या टप्प्यात राज्यातील मोठ्या एमआयडीसींमध्ये सांडपाणी पुनर्वापरासाठीचे प्रकल्प उभारण्यात येतील. तसेच, उद्योगांनीही ते उभारावेत यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. असा पुनर्वापर मोठ्या प्रमाणात झाल्यास पिण्यासाठी आणि शेतीसाठी अधिक पाणी देणे शक्य होईल, असे देसाई म्हणाले. आपल्याकडे वापरलेल्या पाण्यापैकी ७० टक्के पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे. अनेक देशांमध्ये असा पुनर्वापर केला जातो. सिंगापूर हे त्यासाठीचे मॉडेल मानले जाते. तेथील पाणी पुनर्वापराचा अभ्यास करण्यासाठी एमआयडीसीची एक चमू लवकरच त्या ठिकाणी जाणार आहे, असे देसाई यांनी सांगितले. उद्योगांना पाणी दिल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याबाबत अन्याय होतो, अशी टीका बरेचदा होते. या बाबत देसाई म्हणाले की, पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम ठरलेला आहे. त्या नसुारच वाटप होत असते.उद्योगांवर पाणी पळविण्याचा आरोप होतो पण आज नवीमुंबई, मीरा भार्इंदर, ठाणे,उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, उरण व उरण तालुक्यातील २७ग्राम पंचायतींना एमआयडीसी स्वत:च्या पाणीसाठ्यांमधून पिण्याचे पाणी पुरविते. अशी राज्यात इतरत्रही अनेक उदाहरणे आहेत. (विशेष प्रतिनिधी)